शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारच्या पूर्ण कामांवर माहिती फलक

By admin | Updated: September 6, 2015 02:07 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील २१४ गावांमध्ये विविध यंत्रणा तसेच लोकसहभागातून तयार झालेल्या कामांतून शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ घेणे शक्य झाले.

आशुतोष सलील यांच्या सूचना : तपशिलासह छायाचित्राचा अहवाल होणार तयार वर्धा : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील २१४ गावांमध्ये विविध यंत्रणा तसेच लोकसहभागातून तयार झालेल्या कामांतून शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ घेणे शक्य झाले. जिल्ह्यात पूर्ण झालेल्या कामांची संपूर्ण माहिती फलकावर प्रदर्शित करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी शनिवारी दिल्यात.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलयुक्त शिवार कामांचा आढावा आशुतोष सलील यांनी घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा समितीचे सहअध्यक्ष मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीना, अतिरक्त मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार, समितीचे तज्ज्ञ सदस्य एम.टी. सोमनाथे, सदस्य सचिव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, भाऊसाहेब बऱ्हाटे, उपजिल्हाधिकारी दीपक नलावडे तसेच विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियांतर्गत २१४ गावांमध्ये १,५०८ कामे पूर्ण झाली असून ३३८ कामे प्रगतिपथावर आहेत. यासाठी जिल्हा नियोजन मंडळ तसेच विविध यंत्रणांमार्फत ३७ कोटी ७७ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. जलयुक्त शिवार अभियानामध्ये पूर्ण झालेल्या कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी झाल्यानंतरच कामांचे अंतिम देयक देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. प्रत्येक कामांचे छायाचित्र तसेच काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या प्रतिक्रियाही घेण्यात याव्यात. अभियानांतर्गत जिल्हा समितीने प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांसंदर्भात अपूर्ण राहिलेली कामे व अद्याप सुरू न झालेल्या कामांचा आढावा घेऊन ही कामे पूर्ण करण्यासंदर्भात यंत्रणांनी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.