शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

जलयुक्त शिवारच्या पूर्ण कामांवर माहिती फलक

By admin | Updated: September 6, 2015 02:07 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील २१४ गावांमध्ये विविध यंत्रणा तसेच लोकसहभागातून तयार झालेल्या कामांतून शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ घेणे शक्य झाले.

आशुतोष सलील यांच्या सूचना : तपशिलासह छायाचित्राचा अहवाल होणार तयार वर्धा : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील २१४ गावांमध्ये विविध यंत्रणा तसेच लोकसहभागातून तयार झालेल्या कामांतून शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ घेणे शक्य झाले. जिल्ह्यात पूर्ण झालेल्या कामांची संपूर्ण माहिती फलकावर प्रदर्शित करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी शनिवारी दिल्यात.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलयुक्त शिवार कामांचा आढावा आशुतोष सलील यांनी घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा समितीचे सहअध्यक्ष मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीना, अतिरक्त मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार, समितीचे तज्ज्ञ सदस्य एम.टी. सोमनाथे, सदस्य सचिव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, भाऊसाहेब बऱ्हाटे, उपजिल्हाधिकारी दीपक नलावडे तसेच विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियांतर्गत २१४ गावांमध्ये १,५०८ कामे पूर्ण झाली असून ३३८ कामे प्रगतिपथावर आहेत. यासाठी जिल्हा नियोजन मंडळ तसेच विविध यंत्रणांमार्फत ३७ कोटी ७७ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. जलयुक्त शिवार अभियानामध्ये पूर्ण झालेल्या कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी झाल्यानंतरच कामांचे अंतिम देयक देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. प्रत्येक कामांचे छायाचित्र तसेच काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या प्रतिक्रियाही घेण्यात याव्यात. अभियानांतर्गत जिल्हा समितीने प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांसंदर्भात अपूर्ण राहिलेली कामे व अद्याप सुरू न झालेल्या कामांचा आढावा घेऊन ही कामे पूर्ण करण्यासंदर्भात यंत्रणांनी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.