शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

नापिकीने कर्ज थकले, बँक सिस्टिमने खाते केले बुडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 17:55 IST

७१ हजार ७६३ खाते एनपीए : बँकिंग प्रणालीचा बसतोय फटका

चेतन बेलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दरवर्षी जिल्ह्यात पीककर्जाचे वितरण राष्ट्रीयीकृत बँकेसह खासगी बँकेकडून केले जाते. मात्र, नापिकी व अन्य कारणांनी कर्जाची परतफेड बरेचदा करता येत नाही. त्यामुळे अशा खात्यावरील व्याजाचा भुर्दंड कमी करण्यासाठी बँक सिस्टीम ही खाती एनपीए करतात. जिल्ह्यातील अशा राष्ट्रीयीकृत बँकांकडे असलेल्या ७१ हजार ७६३ शेतकऱ्यांकडे ८५० कोटी रुपये थकलेले असल्याने ही खाते सीस्टीमद्वारे एनपीए करण्यात आली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना सुरळीत व्यवहार करताना बसतो आहे. 

शेतकऱ्यांसह बँकेच्या ग्राहकांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी राष्ट्रीयकृत, खासगी बँका ग्राहकांना सिबील स्कोअर पाहून कर्ज देते. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्यांना वाढीव कर्ज दिले जाते. शिवाय ३६५ दिवसांच्या आत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजात केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने सूट दिली जाते. तर कर्ज घेणाऱ्या ग्राहकांकडून कर्जाची परतफेड ३६५ दिवसांत करता आली नाही तर कर्जधारकाला व्याजात मिळणारी सूट मिळत नाहीच. शिवाय बँकेकडून निकषानुसार पेनॉल्टी लावली जाते. खात्यावर कर्जावर चक्रवाढ व्याज लागत असल्याने कर्जाची वाढणारी रक्कम कमी करण्यासाठी आरबीआयच्या नियमानुसार अशी थकलेली खाती एनपीए सिस्टिममध्ये टाकली जातात. थकीत बँक खात्याशी ग्राहकाचे पॅनकार्ड जोडले असल्याने त्याचे त्या बँकेतील सर्व खात्यावरील व्यवहार ठप्प होतात. त्यामुळे सुरळीत व्यवहार करता येत नसल्याचे बँकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रणाली अपडेट करण्यावर भरथकीत कर्जावरील रकमेवर व्याज लागू नये यासाठी खाती एनपीए केली जाते. पॅनकार्ड प्रत्येक खात्याशी जोडल्याने एनपीए झालेल्या सध्या एकाच बँकेच्या इतर शाखेतील खात्यावरील व्यवहार ठप्प होतात. मात्र पुढे विविध राष्ट्रीयीकृत बँकेत असलेली खाती गोठविण्यासाठी बँकेकडून डेटा गोळा केला जात आहे असल्याची माहिती आहे. यासाठी आरबीआय सिस्टीम अपडेट करण्यावर भर दिला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

कर्जमाफीच्या प्रतीक्षेत रखडले कर्जदेशात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय पक्षांकडून कर्जमाफीचे आश्वासन दिले जात आहे. आपल्यालाही कर्जमाफी मिळेल या हेतून अनेकांनी कर्जाची उचल करून पुन्हा परतफेड केलीच नाही. पीककर्ज घेणाऱ्यांमध्ये अशा ५१ हजार ५१९ शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. वर्ष २०१७ मध्ये शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्यात आली होती. मात्र अद्यापही काही शेतकऱ्यांना या कर्जमाफीला लाभ मिळाला नाही. हेही विशेष.

"कर्जाची परतफेड न करणाऱ्या शेतकऱ्यांची खाती बँकेच्या सिस्टिमद्वारे होल्ड करण्यात येते. सेव्हिंग खात्याशी पॅनकार्ड, फॉर्म १६ लिंक असल्यामुळे सेव्हिंग खात्यावरील व्यवहारही ठप्प होतात. अनुदानाची रक्कम काढण्यास अडचणी येत असल्यास बँक व्यवस्थापकाला अर्ज करून खात्यावरील अनुदानाची रक्कम काढता येते. या अडचणी शेतकऱ्यांना येऊ नये यासाठी घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करावी."- चेतन शिरभाते, जिल्हा अग्रणी बँक, वर्धा.

टॅग्स :bankबँकwardha-acवर्धा