शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

३०० शेतकऱ्यांच्या सहभागातून तरूणांनी साकारला उद्योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 23:45 IST

शेती व्यवसाय कमी खर्चात अधिक उत्पादनाचा करण्याच्या दृष्टीकोनातून घोराड येथील तरूणांनी एकत्र येऊन अ‍ॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. त्या माध्यमातून ३०० शेतकऱ्यांच्या सहभागातून त्यांनी कृषी व्यवसायातून उन्नतीचा मार्ग शोधला.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक : कृषी व्यवसायातून शोधला उन्नतीचा मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : शेती व्यवसाय कमी खर्चात अधिक उत्पादनाचा करण्याच्या दृष्टीकोनातून घोराड येथील तरूणांनी एकत्र येऊन अ‍ॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. त्या माध्यमातून ३०० शेतकऱ्यांच्या सहभागातून त्यांनी कृषी व्यवसायातून उन्नतीचा मार्ग शोधला. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या उद्योगाला भेट देवून या तरूणांचे कौतुक केले आहे.महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पामार्फत (आत्मा) २६ डिसेंबर २०१६ ला केजाजी अ‍ॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना करण्यात आली. कृषी पदवीका व कृषी डिप्लोमा धारक युवक एकत्रित आले. यामध्ये ३०० शेतकरी सहभागी झाले. त्यांच्या एकजुटीने १० आर. शेती २५ वर्षांच्या लिजवर घेऊन येथे सामूहिक उद्योग उभा करण्यात आला. सामूहिक धान्य साफसफाई, प्रतवारी केंद्र सुरू केले. कमी दरात शेतकºयांना कृषी अवजारे उपलब्ध करून देणे, कृषी केंद्र सुरू करून रासायनिक खत, बियाणे, स्वस्त दरात पुरविणे, अमोनिया अ‍ॅसीड तयार करून शेतकऱ्यांना स्वस्तात उपलब्ध करून देणे आदी उपक्रम या कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आले. शेतकरी ते ग्राहक धान्य विक्री करून अधिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या युवकांना शेतकºयांची मिळालेली साथ व कंपनीच्या एक वर्षांच्या वाटचालीनंतर आता व्यवसायाच्या माध्यमातून थेट लाभ शेतकऱ्यांना मिळावा म्हणून धान्य विक्रीलाही सुरूवात करण्यात येणार आहे. सामूहिक रेशीम उद्योग, शेतमाल उत्पादीत उद्योगाला गुरुवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, तहसीलदार महेंद्र सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, तालुका कृषी अधिकारी बाबुराव वाघमारे आदींनी भेट देवून तरूणांच्या या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी तरुणांचे कौतुक केले. यावेळी अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विवेक माहुरे, सचिन शैलेश राऊत व संचालक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. या उद्योग समुहाच्यावतीने वर्धा रेल्वे स्टेशनवरील मॉलमध्ये व सेवाग्राम येथील डॉक्टर कॉलनी आणि गिताई मंदिर परिसरात आठवडी बाजार लावून थेट शेतकरी ते ग्राहक अशी धान्यविक्री करण्यात येणार आहे. नवीन वर्षांत उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती उद्योग समुहातर्फे देण्यात आली आहे.