शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

३०० शेतकऱ्यांच्या सहभागातून तरूणांनी साकारला उद्योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 23:45 IST

शेती व्यवसाय कमी खर्चात अधिक उत्पादनाचा करण्याच्या दृष्टीकोनातून घोराड येथील तरूणांनी एकत्र येऊन अ‍ॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. त्या माध्यमातून ३०० शेतकऱ्यांच्या सहभागातून त्यांनी कृषी व्यवसायातून उन्नतीचा मार्ग शोधला.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक : कृषी व्यवसायातून शोधला उन्नतीचा मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : शेती व्यवसाय कमी खर्चात अधिक उत्पादनाचा करण्याच्या दृष्टीकोनातून घोराड येथील तरूणांनी एकत्र येऊन अ‍ॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. त्या माध्यमातून ३०० शेतकऱ्यांच्या सहभागातून त्यांनी कृषी व्यवसायातून उन्नतीचा मार्ग शोधला. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या उद्योगाला भेट देवून या तरूणांचे कौतुक केले आहे.महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पामार्फत (आत्मा) २६ डिसेंबर २०१६ ला केजाजी अ‍ॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना करण्यात आली. कृषी पदवीका व कृषी डिप्लोमा धारक युवक एकत्रित आले. यामध्ये ३०० शेतकरी सहभागी झाले. त्यांच्या एकजुटीने १० आर. शेती २५ वर्षांच्या लिजवर घेऊन येथे सामूहिक उद्योग उभा करण्यात आला. सामूहिक धान्य साफसफाई, प्रतवारी केंद्र सुरू केले. कमी दरात शेतकºयांना कृषी अवजारे उपलब्ध करून देणे, कृषी केंद्र सुरू करून रासायनिक खत, बियाणे, स्वस्त दरात पुरविणे, अमोनिया अ‍ॅसीड तयार करून शेतकऱ्यांना स्वस्तात उपलब्ध करून देणे आदी उपक्रम या कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आले. शेतकरी ते ग्राहक धान्य विक्री करून अधिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या युवकांना शेतकºयांची मिळालेली साथ व कंपनीच्या एक वर्षांच्या वाटचालीनंतर आता व्यवसायाच्या माध्यमातून थेट लाभ शेतकऱ्यांना मिळावा म्हणून धान्य विक्रीलाही सुरूवात करण्यात येणार आहे. सामूहिक रेशीम उद्योग, शेतमाल उत्पादीत उद्योगाला गुरुवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, तहसीलदार महेंद्र सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, तालुका कृषी अधिकारी बाबुराव वाघमारे आदींनी भेट देवून तरूणांच्या या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी तरुणांचे कौतुक केले. यावेळी अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विवेक माहुरे, सचिन शैलेश राऊत व संचालक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. या उद्योग समुहाच्यावतीने वर्धा रेल्वे स्टेशनवरील मॉलमध्ये व सेवाग्राम येथील डॉक्टर कॉलनी आणि गिताई मंदिर परिसरात आठवडी बाजार लावून थेट शेतकरी ते ग्राहक अशी धान्यविक्री करण्यात येणार आहे. नवीन वर्षांत उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती उद्योग समुहातर्फे देण्यात आली आहे.