शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

‘त्या’ बियाण्यांप्रकरणी अखेर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:33 IST

कपाशीच्या बीटी बियाण्यांवर किमान १२० दिवस अळ्यांचा आणि कुठल्याही किडीचा हल्ला होत नाही, असे सांगून शेतकºयांना कावेरी सिड्स व बायर इंडिया लिमी. या कंपनीने बियाणे दिले.

ठळक मुद्देशेतकºयांची तक्रार : १२० दिवसात बीटीवर बोंडअळी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कपाशीच्या बीटी बियाण्यांवर किमान १२० दिवस अळ्यांचा आणि कुठल्याही किडीचा हल्ला होत नाही, असे सांगून शेतकºयांना कावेरी सिड्स व बायर इंडिया लिमी. या कंपनीने बियाणे दिले. या बियाण्यांवर वेळेच्या पूर्वीच अळ्यांनी हल्ला चढविला. यामुळे शेतकºयांनी या कंपनीविरोधात सामुहिक तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाअंती या कंपनीवर गुरुवारी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील कारवाईचा निर्णय झाला आहे.विजयगोपाल, देवळी परिसरातील शेतकरी विजय पेटकर व अशोक मारोटकर या शेतकºयांनी त्यांच्या शेतात मे. कावेरी सिड कंपनी लि. या कंपनीचे कापूस बियाणे मनीमेकर बी.जी. २, लॉट नं. १३००९ या वाणाची लागवड केली. कंपनीच्या दाव्याच्या विपरीत १२० दिवसांच्या आत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होवून कापूस पिकांचे नुकसान झाले. या व्यतिरिक्त याच परिसरातील शेतकरी विजय पेटकर, अशोक मारोटकर व श्रीकांत शिरे यांनी त्याच्या शेतातील इतर जागेत मे. बायर इंडिया लिमी. या उत्पादक कंपनीचे कापूस बियाणे सुपर्ब बी.जी. २, लॉट नं. ४७२९००५ व बायर ७५७६, लॉट नं. १७४९६००१४ या वाणांची लागवड केल्याने कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव १२० दिवसाच्या आत होवून नुकसान झाल्याने एकूण ३६ शेतकºयांनी सामुहिक तक्रार जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे.तक्रारीवरुन बीज निरीक्षक तथा कृषी अधिकाºयांनी प्राथमिक व नंतर जिल्हास्तरीय समितीने केलेल्या पाहणी दरम्यान कावेरी सिड व मे. बायर क्रॉप सायन्स लिमी. मुंबई या कंपनीचे बियाणे शेतकºयाने लागवड केल्याने पिकांवर १२० दिवसाच्या आत गुलाबी बोंड अळींचा प्रादुर्भाव झाल्याने पीक नष्ट झाल्याचे स्पष्ट झाले.झालेल्या चौकशीअंती कावेरी सिड व मे. बायर क्रॉप सायन्स लिमी. मुंबई यांनी बियाणे कायदा १६६ चे कलम ६(ए), ६(बी), ७(ए), ६(सी) बियाणे नियम १९६८ चे नियम ७, ८ महाराष्ट्र कापूस बि बियाणे (पुरवठा, वितरण, विक्री व विक्रीच्या मितीचे निश्चितकरण यांचे विनियमन) अधिनियम २००९ चे कलम ४(१)(२), १२(१),१२(२)(ए), १२(२)(डी), १२(२)(एफ), १२(२)(जी) तसेच नियम २०१० चे ३(१)व ३(२) चे पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ अंतर्गत पर्यावरण संरक्षण अधिसुचना दि. ५ डिसेंबर १९८९ कलम ७, ८,९,१० चे आय पी सी ४०६ व ४२० चे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले.जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक प्रदीप म्हसकर तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय वर्धा यांनी कावेरी सिड कंपनी लि. व मे. बायर क्रॉप सायन्स लि. या कंपन्यांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरुन देवळी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. सदर प्रकरणी न्यायालयाची परवानगी घेवून पुढील तपास करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी कळविले आहे.पाशा पटेल यांनी दिली होती भेटदेवळी तालुक्यातील विजयगोपाल येथील शेतकºयांनी त्यांच्या शेतात लावलेल्या बीटी कपाशीवर बोंडअळी आली होती. याची तक्रार पोलिसात करूनही गुन्हा दाखल केला नसल्याचे समोर आले. यामुळे अखेर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी या शेतकºयांच्या शेताला भेट देऊन पाहणी केली. येथूनच त्यांनी या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्याची माहिती आहे.