शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

कपाशीच्या शंभर वाणांच्या तपासणीचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 23:36 IST

कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे गत खरीप हंगामात कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच हैराण झाला होता. यामुळे शासनाच्यावतीने कापूस बियाण्यांच्या निम्या वाणांवर बंदी आणली. या बंदीनंतर बाजारात आलेल्या कपाशीच्या बियाण्यांबाबत शासन चांगलेच सतर्क असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देदर्जाबाबत शासन गंभीर : नागपूरच्या प्रयोगशाळेतील अहवालावर अनेकांच्या नजरा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे गत खरीप हंगामात कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच हैराण झाला होता. यामुळे शासनाच्यावतीने कापूस बियाण्यांच्या निम्या वाणांवर बंदी आणली. या बंदीनंतर बाजारात आलेल्या कपाशीच्या बियाण्यांबाबत शासन चांगलेच सतर्क असल्याचे दिसत आहे. शासनाने दिलेले निर्देश या बियाणे कंपन्यांनी पाळले अथवा नाही याची दक्षता घेण्याकरिता वर्धेत कपाशीच्या शंभरावर बियाण्यांचे नमुने घेण्यात आले आहे. ते नमुने तपासणीकरिता नागपूर येथील प्रयोग शाळेत रवाना करण्यात आले आहे.यंदाच्या खरीपात कपाशीवर बोंडअळी सारखी किड येणार नाही, याची दक्षता शासनाच्यावतीने घेण्यात येत आहे. गत वर्षी कपाशीच्या संकरीत बियाण्यांवर आलेल्या बोंड अळीमुळे बियाण्यांच्या दर्जावर प्रश्न निर्माण झाला होता. परिणामी शासनाने कपाशीच्या बियाण्यांवरच निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला. गत वर्षी बाजारात असलेल्या बियाण्यांपैकी निम्मे वाण कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतला. यात तपासणी अंती राज्यात ४२ कंपनीच्या ३७० वाणांना परवाना देण्यात आला आहे. असा परवाना मिळालेले बियाणे जिल्ह्यात दाखल झाले आहे.जिल्ह्यात आलेल्या बियाण्यांनी त्यांना दिलेल्या सूचना पाळल्या अथवा नाही याची तपासणी करण्याकरिता कृषी विभागाच्यावतीने त्यांचे नमुने घेण्यात आले आहे. वर्धेत घेण्यात आलेल्या कपाशीच्या बियाण्यांचे नमुने नागपूर येथील प्रयोग शाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. या बियाण्यांच्या तपासणीअंती यात त्रुटी आढळल्यास सदर कंननीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. बाजारात आलेल्या बियाण्यांबाबत यंदाच्या खरीपात शासन गंभीर असल्याचे दिसून आले आहे. कपाशीच्या बियाण्यांतून शेतकऱ्यांना अतिरिक्त फटका बसणार नाही यादी दक्षता कृषी विभागाच्यावतीने घेण्यात येत आहे. सोबतच बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांना सतर्कता बाळगावी असे आवाहनही कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. परवाना प्राप्त कृषी केंद्रातून बियाणे घ्यावे व त्याचे पक्के देयक घेण्याचासही सल्लाही देण्यात आला आहे.बियाणे कंपन्यांची झाडाझडतीवर्धा शहरालगत कपाशी बियाण्यांची निर्मिती करणाऱ्या दोन मोठ्या कंपन्या आहेत. त्यांच्या गोदामाची तपासणी कृषी विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. या कंपनीत असलेल्या बियाण्यांचे नमुने कृषी विभागाने घेतले आहे. तेही तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे. या नमुन्यात जर शासनाच्या निकषांना बगल दिल्याचे दिसून आले तर या कंपन्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश शासनाच्यावतीने देण्यात आले आहेत.जिल्ह्यात कपाशीची ३ लाख ५० हजार पाकिटे दाखलशेतकऱ्यांकडून मशागतीची कामे आटोपली असून त्यांच्याकडून बियाण्यांच्या वाणाची आणि त्यांच्या दराची विचारणा करण्यात येत आहे. या काळात शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेत शासनाकडून ही मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नव्या नियमानुसार प्रमाणित करण्यात आलेली बियाणेच खरेदी करावे असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात कपाशीच्या ३ लाख ५० हजार पाकिटे दाखल झाली आहे.सोयाबीनच्या बियाण्यांचेही घेतले नमुनेकृषी विभागाच्यावतीने कपाशीच्याच नाही तर सोयाबीनच्या बियाण्यांचेही नमुने घेण्यात आले आहे. सोयाबीनच्या पाच वाणांचे नमुने कृषी विभागाने घेतले आहे. तेही तपासणीकरिता नागपूर येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहे. बाजारात आतापर्यंत सोयाबीनचे १४ हजार क्विंटल बियाणे दाखल झाले आहेत.

टॅग्स :cottonकापूस