शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

कपाशीच्या शंभर वाणांच्या तपासणीचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 23:36 IST

कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे गत खरीप हंगामात कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच हैराण झाला होता. यामुळे शासनाच्यावतीने कापूस बियाण्यांच्या निम्या वाणांवर बंदी आणली. या बंदीनंतर बाजारात आलेल्या कपाशीच्या बियाण्यांबाबत शासन चांगलेच सतर्क असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देदर्जाबाबत शासन गंभीर : नागपूरच्या प्रयोगशाळेतील अहवालावर अनेकांच्या नजरा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे गत खरीप हंगामात कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच हैराण झाला होता. यामुळे शासनाच्यावतीने कापूस बियाण्यांच्या निम्या वाणांवर बंदी आणली. या बंदीनंतर बाजारात आलेल्या कपाशीच्या बियाण्यांबाबत शासन चांगलेच सतर्क असल्याचे दिसत आहे. शासनाने दिलेले निर्देश या बियाणे कंपन्यांनी पाळले अथवा नाही याची दक्षता घेण्याकरिता वर्धेत कपाशीच्या शंभरावर बियाण्यांचे नमुने घेण्यात आले आहे. ते नमुने तपासणीकरिता नागपूर येथील प्रयोग शाळेत रवाना करण्यात आले आहे.यंदाच्या खरीपात कपाशीवर बोंडअळी सारखी किड येणार नाही, याची दक्षता शासनाच्यावतीने घेण्यात येत आहे. गत वर्षी कपाशीच्या संकरीत बियाण्यांवर आलेल्या बोंड अळीमुळे बियाण्यांच्या दर्जावर प्रश्न निर्माण झाला होता. परिणामी शासनाने कपाशीच्या बियाण्यांवरच निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला. गत वर्षी बाजारात असलेल्या बियाण्यांपैकी निम्मे वाण कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतला. यात तपासणी अंती राज्यात ४२ कंपनीच्या ३७० वाणांना परवाना देण्यात आला आहे. असा परवाना मिळालेले बियाणे जिल्ह्यात दाखल झाले आहे.जिल्ह्यात आलेल्या बियाण्यांनी त्यांना दिलेल्या सूचना पाळल्या अथवा नाही याची तपासणी करण्याकरिता कृषी विभागाच्यावतीने त्यांचे नमुने घेण्यात आले आहे. वर्धेत घेण्यात आलेल्या कपाशीच्या बियाण्यांचे नमुने नागपूर येथील प्रयोग शाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. या बियाण्यांच्या तपासणीअंती यात त्रुटी आढळल्यास सदर कंननीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. बाजारात आलेल्या बियाण्यांबाबत यंदाच्या खरीपात शासन गंभीर असल्याचे दिसून आले आहे. कपाशीच्या बियाण्यांतून शेतकऱ्यांना अतिरिक्त फटका बसणार नाही यादी दक्षता कृषी विभागाच्यावतीने घेण्यात येत आहे. सोबतच बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांना सतर्कता बाळगावी असे आवाहनही कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. परवाना प्राप्त कृषी केंद्रातून बियाणे घ्यावे व त्याचे पक्के देयक घेण्याचासही सल्लाही देण्यात आला आहे.बियाणे कंपन्यांची झाडाझडतीवर्धा शहरालगत कपाशी बियाण्यांची निर्मिती करणाऱ्या दोन मोठ्या कंपन्या आहेत. त्यांच्या गोदामाची तपासणी कृषी विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. या कंपनीत असलेल्या बियाण्यांचे नमुने कृषी विभागाने घेतले आहे. तेही तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे. या नमुन्यात जर शासनाच्या निकषांना बगल दिल्याचे दिसून आले तर या कंपन्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश शासनाच्यावतीने देण्यात आले आहेत.जिल्ह्यात कपाशीची ३ लाख ५० हजार पाकिटे दाखलशेतकऱ्यांकडून मशागतीची कामे आटोपली असून त्यांच्याकडून बियाण्यांच्या वाणाची आणि त्यांच्या दराची विचारणा करण्यात येत आहे. या काळात शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेत शासनाकडून ही मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नव्या नियमानुसार प्रमाणित करण्यात आलेली बियाणेच खरेदी करावे असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात कपाशीच्या ३ लाख ५० हजार पाकिटे दाखल झाली आहे.सोयाबीनच्या बियाण्यांचेही घेतले नमुनेकृषी विभागाच्यावतीने कपाशीच्याच नाही तर सोयाबीनच्या बियाण्यांचेही नमुने घेण्यात आले आहे. सोयाबीनच्या पाच वाणांचे नमुने कृषी विभागाने घेतले आहे. तेही तपासणीकरिता नागपूर येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहे. बाजारात आतापर्यंत सोयाबीनचे १४ हजार क्विंटल बियाणे दाखल झाले आहेत.

टॅग्स :cottonकापूस