शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

"पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील भारत नव्या युगाकडे वाटचाल करतोय"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 18:31 IST

मोदी सरकारने गरीब कल्याण हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विविध कल्याणकारी योजना कार्यान्वित करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी केल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे, असे खासदार तडस म्हणाले.

ठळक मुद्दे केंद्रातील भाजप सरकारला आठ वर्षे पूर्ण

वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला आठ वर्षे पूर्ण झाले आहेत. या आठ वर्षांच्या काळात अनेक चढ-उतार पार करून भारत देश एका नव्या युगाकडे वाटचाल करीत आहे. शिवाय जगभर वेगळी छबी भारताने निर्माण केली आहे, अशी प्रतिक्रिया खा. रामदास तडस यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.

खा. तडस म्हणाले, एकात्म मानववादाचे प्रणेते पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदयची कल्पना मोदी सरकारने खऱ्या अर्थाने राबवली आहे. कोविड संकट काळात गरजू आणि गरिबांना मोफत धान्य देण्यात आले. इतकेच नव्हे तर केंद्रातील मोदी सरकारने गरीब कल्याण हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विविध कल्याणकारी योजना कार्यान्वित करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी केल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे.

मोदींच्या नेतृत्वातच देशाची ओळख सुरक्षित भारत, प्रतिष्ठित भारत, आत्मनिर्भर भारत म्हणून विकसित होत आहे. जनधन, उज्ज्वला, स्टार्टअप, जल जीवन मिशन, पीएम आवास, प्रधानमंत्री किसान सन्मान आदी योजना अनेकांना दिलासा देणाऱ्याच आहेत. तर जम्मू कश्मीर येथील कलम ३७० रद्द करणे, तिहेरी तलाक, सर्जिकल स्ट्राइक, बालाकोट स्ट्राइक असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णयही मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने घेतले असल्याचे तडस म्हणाले.

शहीद भूमीतून निघणार विकास यात्रा

केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती गावपातळीवरही पोहोचावी या हेतूने भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहीद भूमी अशी ओळख असलेल्या आष्टी येथून ११ जून रोजी विकास यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेचा समारोप १४ जून रोजी सेवाग्राम येथे होणार आहे. शिवाय जिल्ह्यात सेवा सुशासन गरीब कल्याण पंधरवाडा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणRamdas Tadasरामदास तडसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी