शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

"पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील भारत नव्या युगाकडे वाटचाल करतोय"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 18:31 IST

मोदी सरकारने गरीब कल्याण हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विविध कल्याणकारी योजना कार्यान्वित करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी केल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे, असे खासदार तडस म्हणाले.

ठळक मुद्दे केंद्रातील भाजप सरकारला आठ वर्षे पूर्ण

वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला आठ वर्षे पूर्ण झाले आहेत. या आठ वर्षांच्या काळात अनेक चढ-उतार पार करून भारत देश एका नव्या युगाकडे वाटचाल करीत आहे. शिवाय जगभर वेगळी छबी भारताने निर्माण केली आहे, अशी प्रतिक्रिया खा. रामदास तडस यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.

खा. तडस म्हणाले, एकात्म मानववादाचे प्रणेते पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदयची कल्पना मोदी सरकारने खऱ्या अर्थाने राबवली आहे. कोविड संकट काळात गरजू आणि गरिबांना मोफत धान्य देण्यात आले. इतकेच नव्हे तर केंद्रातील मोदी सरकारने गरीब कल्याण हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विविध कल्याणकारी योजना कार्यान्वित करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी केल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे.

मोदींच्या नेतृत्वातच देशाची ओळख सुरक्षित भारत, प्रतिष्ठित भारत, आत्मनिर्भर भारत म्हणून विकसित होत आहे. जनधन, उज्ज्वला, स्टार्टअप, जल जीवन मिशन, पीएम आवास, प्रधानमंत्री किसान सन्मान आदी योजना अनेकांना दिलासा देणाऱ्याच आहेत. तर जम्मू कश्मीर येथील कलम ३७० रद्द करणे, तिहेरी तलाक, सर्जिकल स्ट्राइक, बालाकोट स्ट्राइक असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णयही मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने घेतले असल्याचे तडस म्हणाले.

शहीद भूमीतून निघणार विकास यात्रा

केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती गावपातळीवरही पोहोचावी या हेतूने भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहीद भूमी अशी ओळख असलेल्या आष्टी येथून ११ जून रोजी विकास यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेचा समारोप १४ जून रोजी सेवाग्राम येथे होणार आहे. शिवाय जिल्ह्यात सेवा सुशासन गरीब कल्याण पंधरवाडा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणRamdas Tadasरामदास तडसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी