शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

२०१४ मध्ये स्वतंत्र, १९ मध्ये युती अन् आघाडी, आता महायुती अन् महाविकास आघाडी

By रवींद्र चांदेकर | Updated: November 10, 2024 20:48 IST

विधानसभा निवडणूक २०२४ : चौरंगी, दुरंगी अन् आता पुन्हा दुरंगी सामन्याचे संकेत

वर्धा : २०१४ मध्ये राज्यासह जिल्ह्यात चार प्रमुख पक्ष एकमेकांविरोधात लढले. त्यानंतर २०१९ मध्ये युती आणि आघाडी करून चारही पक्ष लढले. यावेळी सहा प्रमुख पक्ष महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून मैदानात उभे ठाकले आहे. 

२०१४ मध्ये जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी आणि देवळी विधानसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस, एकसंघ शिवसेना आणि एकीकृत राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. त्यावेळी वर्ध्यातून भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह बहुजन समाज पक्ष आणि इतर पक्ष व अपक्षांनी निवडणूक लढविली होती. हिंगणघाट, आर्वी, देवळीतही भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उमेदवारांसह बहुजन समाज पक्ष, अपक्ष मैदानात होते. त्यावेळी चौरंगी लढती झाल्या होत्या. 

२०१९ मध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी निर्माण झाली. त्यात वर्ध्यात भाजप, काँग्रेस, हिंगणघाटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, देवळीत काँग्रेस, शिवसेना आणि आर्वीत काँग्रेस अन् भाजपचे उमेदवार आहे. त्यावेळी देवळीत युतीतील भाजपमध्ये ‘बंडखोरी झाली होती. हिंगणघाटमध्येही युतीत शिवसेनेच्या उमेदवारी बंडखोरी केली होती. २०१९ मध्ये दुरंगी लढती झाल्या होत्या. देवळीत तगडा बंडखोर मैदानात असल्याने तिरंगी सामना झाला होता. 

२०२४ मध्ये समीकरण पूर्णपणे बदलले आहे. मधल्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दोन छकले झाली. त्यात महायुतीत भाजपसह राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेसेना, तर महाविकास आघाडीत काँग्रेससह राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उध्दवसेना सहभागी आहे. यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये लढत होते. काही ठिकाणी तगडे अपक्षही मैदानात उभे ठाकले आहे. त्यामुळे काही ठिकाणी दुरंगी, तर काही मतदारसंघामध्ये तिरंगी सामना होण्याची शक्यता आहे. 

लोकसभेत गाजला वर्धा पॅटर्नसहा महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणूक झाली. त्यात सुध्दा महायुती आणि महाविकास आघाडीत सामना झाला. महायुतीत हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला होता. मात्र, महाविकास आघाडीत शेवटपर्यंत गुंता कायम होता. काँग्रेसच्या नेत्यांनी ही जागा परंपरागत असल्याने काँग्रेसचाच उमेदवार देण्याची मागणी केली होती. अखेरीस ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या झोळीत पडली. मात्र, त्यांनी काँग्रेसमधून उमेदवार आयात करून उमेदवारी बहाल केली होती. त्यावेळी हा ‘वर्धा पॅटर्न’ चांगलाच गाजला होता. 

आर्वीत सर्वाधिक, तर हिंगणघाटमध्ये कमी उमेदवारविधानसभा निवडणुकीत जिल्ह्याच्या चार मतदारसंघातून ६० उमेदवारांनी दंड थोपटले आहे. त्यात सर्वाधिक १८ उमेदवार आर्वी मतदारसंघात असून सर्वात कमी १२ उमेदवार हिंगणघाटमध्ये आहेत. वर्धेच्या रिंगणात १६, तर देवळीतून १४ उमेदवार लढत देत आहे. हिंगणघाटमध्ये सर्वात कमी उमेदवार असल्याने थेट लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, तेथे महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उध्दवसेनेचे बंडखोर अपक्ष म्हणून मैदानात उभे ठाकले आहे. तथापि, या मतदारसंघात लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला २० हजार ५५ मतांची आघाडी मिळाली होती, हे विशेष.

टॅग्स :wardha-acवर्धाwardha-pcवर्धा