शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

२०१४ मध्ये स्वतंत्र, १९ मध्ये युती अन् आघाडी, आता महायुती अन् महाविकास आघाडी

By रवींद्र चांदेकर | Updated: November 10, 2024 20:48 IST

विधानसभा निवडणूक २०२४ : चौरंगी, दुरंगी अन् आता पुन्हा दुरंगी सामन्याचे संकेत

वर्धा : २०१४ मध्ये राज्यासह जिल्ह्यात चार प्रमुख पक्ष एकमेकांविरोधात लढले. त्यानंतर २०१९ मध्ये युती आणि आघाडी करून चारही पक्ष लढले. यावेळी सहा प्रमुख पक्ष महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून मैदानात उभे ठाकले आहे. 

२०१४ मध्ये जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी आणि देवळी विधानसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस, एकसंघ शिवसेना आणि एकीकृत राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. त्यावेळी वर्ध्यातून भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह बहुजन समाज पक्ष आणि इतर पक्ष व अपक्षांनी निवडणूक लढविली होती. हिंगणघाट, आर्वी, देवळीतही भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उमेदवारांसह बहुजन समाज पक्ष, अपक्ष मैदानात होते. त्यावेळी चौरंगी लढती झाल्या होत्या. 

२०१९ मध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी निर्माण झाली. त्यात वर्ध्यात भाजप, काँग्रेस, हिंगणघाटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, देवळीत काँग्रेस, शिवसेना आणि आर्वीत काँग्रेस अन् भाजपचे उमेदवार आहे. त्यावेळी देवळीत युतीतील भाजपमध्ये ‘बंडखोरी झाली होती. हिंगणघाटमध्येही युतीत शिवसेनेच्या उमेदवारी बंडखोरी केली होती. २०१९ मध्ये दुरंगी लढती झाल्या होत्या. देवळीत तगडा बंडखोर मैदानात असल्याने तिरंगी सामना झाला होता. 

२०२४ मध्ये समीकरण पूर्णपणे बदलले आहे. मधल्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दोन छकले झाली. त्यात महायुतीत भाजपसह राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेसेना, तर महाविकास आघाडीत काँग्रेससह राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उध्दवसेना सहभागी आहे. यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये लढत होते. काही ठिकाणी तगडे अपक्षही मैदानात उभे ठाकले आहे. त्यामुळे काही ठिकाणी दुरंगी, तर काही मतदारसंघामध्ये तिरंगी सामना होण्याची शक्यता आहे. 

लोकसभेत गाजला वर्धा पॅटर्नसहा महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणूक झाली. त्यात सुध्दा महायुती आणि महाविकास आघाडीत सामना झाला. महायुतीत हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला होता. मात्र, महाविकास आघाडीत शेवटपर्यंत गुंता कायम होता. काँग्रेसच्या नेत्यांनी ही जागा परंपरागत असल्याने काँग्रेसचाच उमेदवार देण्याची मागणी केली होती. अखेरीस ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या झोळीत पडली. मात्र, त्यांनी काँग्रेसमधून उमेदवार आयात करून उमेदवारी बहाल केली होती. त्यावेळी हा ‘वर्धा पॅटर्न’ चांगलाच गाजला होता. 

आर्वीत सर्वाधिक, तर हिंगणघाटमध्ये कमी उमेदवारविधानसभा निवडणुकीत जिल्ह्याच्या चार मतदारसंघातून ६० उमेदवारांनी दंड थोपटले आहे. त्यात सर्वाधिक १८ उमेदवार आर्वी मतदारसंघात असून सर्वात कमी १२ उमेदवार हिंगणघाटमध्ये आहेत. वर्धेच्या रिंगणात १६, तर देवळीतून १४ उमेदवार लढत देत आहे. हिंगणघाटमध्ये सर्वात कमी उमेदवार असल्याने थेट लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, तेथे महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उध्दवसेनेचे बंडखोर अपक्ष म्हणून मैदानात उभे ठाकले आहे. तथापि, या मतदारसंघात लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला २० हजार ५५ मतांची आघाडी मिळाली होती, हे विशेष.

टॅग्स :wardha-acवर्धाwardha-pcवर्धा