शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

२०१४ मध्ये स्वतंत्र, १९ मध्ये युती अन् आघाडी, आता महायुती अन् महाविकास आघाडी

By रवींद्र चांदेकर | Updated: November 10, 2024 20:48 IST

विधानसभा निवडणूक २०२४ : चौरंगी, दुरंगी अन् आता पुन्हा दुरंगी सामन्याचे संकेत

वर्धा : २०१४ मध्ये राज्यासह जिल्ह्यात चार प्रमुख पक्ष एकमेकांविरोधात लढले. त्यानंतर २०१९ मध्ये युती आणि आघाडी करून चारही पक्ष लढले. यावेळी सहा प्रमुख पक्ष महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून मैदानात उभे ठाकले आहे. 

२०१४ मध्ये जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी आणि देवळी विधानसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस, एकसंघ शिवसेना आणि एकीकृत राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. त्यावेळी वर्ध्यातून भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह बहुजन समाज पक्ष आणि इतर पक्ष व अपक्षांनी निवडणूक लढविली होती. हिंगणघाट, आर्वी, देवळीतही भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उमेदवारांसह बहुजन समाज पक्ष, अपक्ष मैदानात होते. त्यावेळी चौरंगी लढती झाल्या होत्या. 

२०१९ मध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी निर्माण झाली. त्यात वर्ध्यात भाजप, काँग्रेस, हिंगणघाटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, देवळीत काँग्रेस, शिवसेना आणि आर्वीत काँग्रेस अन् भाजपचे उमेदवार आहे. त्यावेळी देवळीत युतीतील भाजपमध्ये ‘बंडखोरी झाली होती. हिंगणघाटमध्येही युतीत शिवसेनेच्या उमेदवारी बंडखोरी केली होती. २०१९ मध्ये दुरंगी लढती झाल्या होत्या. देवळीत तगडा बंडखोर मैदानात असल्याने तिरंगी सामना झाला होता. 

२०२४ मध्ये समीकरण पूर्णपणे बदलले आहे. मधल्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दोन छकले झाली. त्यात महायुतीत भाजपसह राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेसेना, तर महाविकास आघाडीत काँग्रेससह राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उध्दवसेना सहभागी आहे. यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये लढत होते. काही ठिकाणी तगडे अपक्षही मैदानात उभे ठाकले आहे. त्यामुळे काही ठिकाणी दुरंगी, तर काही मतदारसंघामध्ये तिरंगी सामना होण्याची शक्यता आहे. 

लोकसभेत गाजला वर्धा पॅटर्नसहा महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणूक झाली. त्यात सुध्दा महायुती आणि महाविकास आघाडीत सामना झाला. महायुतीत हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला होता. मात्र, महाविकास आघाडीत शेवटपर्यंत गुंता कायम होता. काँग्रेसच्या नेत्यांनी ही जागा परंपरागत असल्याने काँग्रेसचाच उमेदवार देण्याची मागणी केली होती. अखेरीस ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या झोळीत पडली. मात्र, त्यांनी काँग्रेसमधून उमेदवार आयात करून उमेदवारी बहाल केली होती. त्यावेळी हा ‘वर्धा पॅटर्न’ चांगलाच गाजला होता. 

आर्वीत सर्वाधिक, तर हिंगणघाटमध्ये कमी उमेदवारविधानसभा निवडणुकीत जिल्ह्याच्या चार मतदारसंघातून ६० उमेदवारांनी दंड थोपटले आहे. त्यात सर्वाधिक १८ उमेदवार आर्वी मतदारसंघात असून सर्वात कमी १२ उमेदवार हिंगणघाटमध्ये आहेत. वर्धेच्या रिंगणात १६, तर देवळीतून १४ उमेदवार लढत देत आहे. हिंगणघाटमध्ये सर्वात कमी उमेदवार असल्याने थेट लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, तेथे महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उध्दवसेनेचे बंडखोर अपक्ष म्हणून मैदानात उभे ठाकले आहे. तथापि, या मतदारसंघात लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला २० हजार ५५ मतांची आघाडी मिळाली होती, हे विशेष.

टॅग्स :wardha-acवर्धाwardha-pcवर्धा