शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

२०१४ मध्ये स्वतंत्र, १९ मध्ये युती अन् आघाडी, आता महायुती अन् महाविकास आघाडी

By रवींद्र चांदेकर | Updated: November 10, 2024 20:48 IST

विधानसभा निवडणूक २०२४ : चौरंगी, दुरंगी अन् आता पुन्हा दुरंगी सामन्याचे संकेत

वर्धा : २०१४ मध्ये राज्यासह जिल्ह्यात चार प्रमुख पक्ष एकमेकांविरोधात लढले. त्यानंतर २०१९ मध्ये युती आणि आघाडी करून चारही पक्ष लढले. यावेळी सहा प्रमुख पक्ष महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून मैदानात उभे ठाकले आहे. 

२०१४ मध्ये जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी आणि देवळी विधानसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस, एकसंघ शिवसेना आणि एकीकृत राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. त्यावेळी वर्ध्यातून भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह बहुजन समाज पक्ष आणि इतर पक्ष व अपक्षांनी निवडणूक लढविली होती. हिंगणघाट, आर्वी, देवळीतही भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उमेदवारांसह बहुजन समाज पक्ष, अपक्ष मैदानात होते. त्यावेळी चौरंगी लढती झाल्या होत्या. 

२०१९ मध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी निर्माण झाली. त्यात वर्ध्यात भाजप, काँग्रेस, हिंगणघाटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, देवळीत काँग्रेस, शिवसेना आणि आर्वीत काँग्रेस अन् भाजपचे उमेदवार आहे. त्यावेळी देवळीत युतीतील भाजपमध्ये ‘बंडखोरी झाली होती. हिंगणघाटमध्येही युतीत शिवसेनेच्या उमेदवारी बंडखोरी केली होती. २०१९ मध्ये दुरंगी लढती झाल्या होत्या. देवळीत तगडा बंडखोर मैदानात असल्याने तिरंगी सामना झाला होता. 

२०२४ मध्ये समीकरण पूर्णपणे बदलले आहे. मधल्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दोन छकले झाली. त्यात महायुतीत भाजपसह राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेसेना, तर महाविकास आघाडीत काँग्रेससह राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उध्दवसेना सहभागी आहे. यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये लढत होते. काही ठिकाणी तगडे अपक्षही मैदानात उभे ठाकले आहे. त्यामुळे काही ठिकाणी दुरंगी, तर काही मतदारसंघामध्ये तिरंगी सामना होण्याची शक्यता आहे. 

लोकसभेत गाजला वर्धा पॅटर्नसहा महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणूक झाली. त्यात सुध्दा महायुती आणि महाविकास आघाडीत सामना झाला. महायुतीत हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला होता. मात्र, महाविकास आघाडीत शेवटपर्यंत गुंता कायम होता. काँग्रेसच्या नेत्यांनी ही जागा परंपरागत असल्याने काँग्रेसचाच उमेदवार देण्याची मागणी केली होती. अखेरीस ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या झोळीत पडली. मात्र, त्यांनी काँग्रेसमधून उमेदवार आयात करून उमेदवारी बहाल केली होती. त्यावेळी हा ‘वर्धा पॅटर्न’ चांगलाच गाजला होता. 

आर्वीत सर्वाधिक, तर हिंगणघाटमध्ये कमी उमेदवारविधानसभा निवडणुकीत जिल्ह्याच्या चार मतदारसंघातून ६० उमेदवारांनी दंड थोपटले आहे. त्यात सर्वाधिक १८ उमेदवार आर्वी मतदारसंघात असून सर्वात कमी १२ उमेदवार हिंगणघाटमध्ये आहेत. वर्धेच्या रिंगणात १६, तर देवळीतून १४ उमेदवार लढत देत आहे. हिंगणघाटमध्ये सर्वात कमी उमेदवार असल्याने थेट लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, तेथे महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उध्दवसेनेचे बंडखोर अपक्ष म्हणून मैदानात उभे ठाकले आहे. तथापि, या मतदारसंघात लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला २० हजार ५५ मतांची आघाडी मिळाली होती, हे विशेष.

टॅग्स :wardha-acवर्धाwardha-pcवर्धा