शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंपाचे दिले वाढीव देयक

By admin | Updated: March 22, 2015 01:46 IST

कृषिपंपाचे वीज मीटर बंद असतानाही नेहमीच्या आकारणीच्या चारपट आकारणी करून शेतकऱ्यांना देयक देण्यात आले आहे.

खरांगणा(मो.) : कृषिपंपाचे वीज मीटर बंद असतानाही नेहमीच्या आकारणीच्या चारपट आकारणी करून शेतकऱ्यांना देयक देण्यात आले आहे. वीज वितरण विभागातील मोरांगणा कार्यालयाच्या या प्रतापाने कृषी पंपधारक शेतकरी आश्चर्य व्यक्त करीत आहे.या देयकात रक्कम वाढविली असल्याने आधीच दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांना कृषीपंपाचे देयक देताना कोणती मार्गदर्शक तत्व अंमलात आणली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत वीज नियामक आयोगाच्या काय सूचना आहेत, यात किती टक्के देयक वाढविली पाहिजे याची विचारणा करण्याची मागणी वरिष्ठांकडे केली आहे.याबाबत विभागाकडे ग्राहकांनी माहिती विचारल्यावरही योग्य माहिती दिल्या जात नाही. अधिकारी, कर्मचारी कार्यालयातच असताना अन्यत्र गेल्याचे सांगण्यात येवून दिशाभूल केली जाते. माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते. परिणामी शेतकऱ्यांना कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. येथे सहायक अभियंता पद देण्यात यावे अशी मागणी आहे. मागील ३ ते ४ वर्षापासून या मागणीकडे दुर्लक्ष आहे. येथील कार्यालयात गणक मीटरच उपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे एच.पी. प्रमाणे दररोज होणारा पाण्याचा उपसा व शेतीचा आकार या बाबी लक्षात घेऊन किमान वीज आकारणी करण्यात येते. परंतु या मार्गदर्शक तत्वाला फाटा देऊन वाढीव देयक देण्यात आले आहे. अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर सुलतानी संकट ओढवले आहे. वीज देयकाच्या रूपात चारपटीने दिलेला धक्क्यातून बळीराजाला सावरण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे.(वार्ताहर)