शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

अवकाळीचे तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:28 IST

हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवित रविवारी सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास अचानक ढगांची गर्दी झाली. मेघगर्जना व सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली.

ठळक मुद्देधोत्रा व तळेगाव (टा.) येथे वीज पडून सहा गुरे दगावली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवित रविवारी सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास अचानक ढगांची गर्दी झाली. मेघगर्जना व सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. सुमारे १५ ते २० मिनीट चाललेल्या या पावसामुळे शेतकरी व सामान्यांचे मात्र मोठे नुकसान झाले. धोत्रा व तळेगाव (टा.) येथे वीज पडून सहा जनावरे दगावली. यात शेतकºयांचे २ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले.दिवसभर उन्हाचा तडाखा असताना सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास अचानक ढगांची दाटी झाली. विद्युल्लतेचा कडकडाट आणि वादळी वाºयासह पावसाचे आगमन झाले. सायंकाळी वादळी वाºयासह आलेल्या या पावसाने मोठे नुकसान केले. शिवाजी चौक परिसरातील एक दुकान वादळी वारा व पावसामुळे कोसळले. यात दुकान मालकाचे प्रचंड नुकसान झाले. शिवाय शिवाजी चौक ते आर्वी नाका मार्गावर दोन झाडे कोसळली. यात संबंधितांचे नुकसान झाले. आर्वी नाका परिसरातही अजस्त्र वृक्ष कारवर उन्मळून पडले. यात संबंधित कार धारकाचे नुकसान झाले. शहरात वादळी वाºयामुळे अनेक फलक उडालेत, अनेकांच्या दुकानांतील साहित्य अन्यत्र उडून गेले. अचानक आलेला हा पाच ते दहा मिनीटांचा पाऊस मोठे नुकसान करून गेल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. सेवाग्राम मार्गावरील अनेक झाडांच्या फांद्याही तुटल्याने नागरिकांचे नुकसान झाले.यातच एकुर्ली येथील मारोती बारकू गिरडकर यांच्या धोत्रा (कासार) शिवारातील शेतात वीज कोसळली. यात शेतात बांधून असलेले दोन बैल, दोन गायी व एक वासरू ठार झाले. यात त्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने शेतकरी मारोती व त्यांचा मुलगा थोडक्यात बचावले असले तरी विजेची आस लागल्याने शेतकºयाचा पाय भाजला गेला. याच सुमारास वर्धा तालुक्यातीलच तळेगाव (टा.) येथे विठ्ठल मारोतराव तपासे यांच्या शेतातही वीज कोसळली. यात शेतात असलेला एक बैल ठार झाला. यामुळे शेतकरी तपासे यांचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. जिल्ह्यात अन्यत्र ाीज पडल्याच्या घटनांची नोंद नाही. नारायणपूर शिवारात वादळी वारा व पावसामुळे रस्त्यालगतची मोठी झाडे उन्मळून पडली. शिवाय जिल्ह्यात देवळी, वर्धा, सेलू, समुद्रपूर व हिंगणघात तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. इंझाळा, नाचणगाव शिवारात जोरदार पाऊस झाल्याने अनेक घरांचे नुकसान झाले. अनेकांच्या घरांवरील टीनाही उडून गेल्याचे वृत्त आहे.विद्युत पुरवठा खंडितवादळी वाºयासह जिल्ह्यात आलेल्या पावसामुळे अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाला होता. वर्धा शहरात तब्बल एक ते दीड तास विद्युत पुरवठा खंडित होता. शिवाय वडनेर, नारायणपूर, इंझाळा यासह अनेक ठिकाणी पावसाचे आगमन होताच वीज पुरवठा खंडित झाला होता. पाऊस थांबल्यानंतर वर्धा शहरासह काही ठिकाणचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला तर ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले नाही. 

टॅग्स :Rainपाऊस