शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

अवकाळीचे तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:28 IST

हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवित रविवारी सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास अचानक ढगांची गर्दी झाली. मेघगर्जना व सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली.

ठळक मुद्देधोत्रा व तळेगाव (टा.) येथे वीज पडून सहा गुरे दगावली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवित रविवारी सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास अचानक ढगांची गर्दी झाली. मेघगर्जना व सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. सुमारे १५ ते २० मिनीट चाललेल्या या पावसामुळे शेतकरी व सामान्यांचे मात्र मोठे नुकसान झाले. धोत्रा व तळेगाव (टा.) येथे वीज पडून सहा जनावरे दगावली. यात शेतकºयांचे २ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले.दिवसभर उन्हाचा तडाखा असताना सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास अचानक ढगांची दाटी झाली. विद्युल्लतेचा कडकडाट आणि वादळी वाºयासह पावसाचे आगमन झाले. सायंकाळी वादळी वाºयासह आलेल्या या पावसाने मोठे नुकसान केले. शिवाजी चौक परिसरातील एक दुकान वादळी वारा व पावसामुळे कोसळले. यात दुकान मालकाचे प्रचंड नुकसान झाले. शिवाय शिवाजी चौक ते आर्वी नाका मार्गावर दोन झाडे कोसळली. यात संबंधितांचे नुकसान झाले. आर्वी नाका परिसरातही अजस्त्र वृक्ष कारवर उन्मळून पडले. यात संबंधित कार धारकाचे नुकसान झाले. शहरात वादळी वाºयामुळे अनेक फलक उडालेत, अनेकांच्या दुकानांतील साहित्य अन्यत्र उडून गेले. अचानक आलेला हा पाच ते दहा मिनीटांचा पाऊस मोठे नुकसान करून गेल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. सेवाग्राम मार्गावरील अनेक झाडांच्या फांद्याही तुटल्याने नागरिकांचे नुकसान झाले.यातच एकुर्ली येथील मारोती बारकू गिरडकर यांच्या धोत्रा (कासार) शिवारातील शेतात वीज कोसळली. यात शेतात बांधून असलेले दोन बैल, दोन गायी व एक वासरू ठार झाले. यात त्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने शेतकरी मारोती व त्यांचा मुलगा थोडक्यात बचावले असले तरी विजेची आस लागल्याने शेतकºयाचा पाय भाजला गेला. याच सुमारास वर्धा तालुक्यातीलच तळेगाव (टा.) येथे विठ्ठल मारोतराव तपासे यांच्या शेतातही वीज कोसळली. यात शेतात असलेला एक बैल ठार झाला. यामुळे शेतकरी तपासे यांचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. जिल्ह्यात अन्यत्र ाीज पडल्याच्या घटनांची नोंद नाही. नारायणपूर शिवारात वादळी वारा व पावसामुळे रस्त्यालगतची मोठी झाडे उन्मळून पडली. शिवाय जिल्ह्यात देवळी, वर्धा, सेलू, समुद्रपूर व हिंगणघात तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. इंझाळा, नाचणगाव शिवारात जोरदार पाऊस झाल्याने अनेक घरांचे नुकसान झाले. अनेकांच्या घरांवरील टीनाही उडून गेल्याचे वृत्त आहे.विद्युत पुरवठा खंडितवादळी वाºयासह जिल्ह्यात आलेल्या पावसामुळे अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाला होता. वर्धा शहरात तब्बल एक ते दीड तास विद्युत पुरवठा खंडित होता. शिवाय वडनेर, नारायणपूर, इंझाळा यासह अनेक ठिकाणी पावसाचे आगमन होताच वीज पुरवठा खंडित झाला होता. पाऊस थांबल्यानंतर वर्धा शहरासह काही ठिकाणचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला तर ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले नाही. 

टॅग्स :Rainपाऊस