शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

वाढती श्रीमंती गरिबीला कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:44 IST

आजच्या गरीबी रेखा जी खाली दिसते त्याला देशातील श्रीमंतांच्या चढत्या रेषा कारणीभूत आहे.

ठळक मुद्देराधाबहन भट : यात्री निवासात व्याख्यान

आॅनलाईन लोकमतसेवाग्राम : आजच्या गरीबी रेखा जी खाली दिसते त्याला देशातील श्रीमंतांच्या चढत्या रेषा कारणीभूत आहे. त्यामुळे श्रीमंताची रेखा खाली आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राधाबहन भट यांनी केले.येथील यात्री निवासच्या आचार्य दादा धर्माधिकारी सभागृहामध्ये गांधी १५० अभियानांतर्गत जानकीदेवी बजाज यांच्या १२५ व्या जयंती निमित्त व्याख्यानचे आयोजन केले होते. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, सामाजिक कार्यकर्ते विनायक ताकसांडे उपस्थित होते. राधाबहन पुढे म्हणाल्या, स्वातंत्र चळवळीत बजाज परिवार गांधीजींसोबत होता. चळवळीला गांधीजींनी आर्थिकतेची मागणी करताच जानकीदेवी आपले दागिने दिले. याला जमनालालजी यांचीही संमती होती. नंतर मात्र त्यांनी साधे जीवन कायम ठेवले. पांढरी साडी व हिरवी थैली यातच सदैव त्या दिसल्या. वास्तवात त्या राजस्थानी असताना सुद्धा अशा वेषात राहायला घाबरल्या नाहीत. भारतीय संस्कृतीत व्रताला फार महत्त्व आहे. संस्कारील जीवनाचा प्रभाव त्यांच्या मुला-मुलींवर पण झाला. कमलनयन यांचा विवाह खादीच्या कपड्यांवर व स्वत: घेतलेल्यांवर झाल्याचे भट यांनी सांगितले. त्यांचा विचार समजण्याची सध्या गरज आहे असेही त्या म्हणाल्या.महादेव विद्रोही यांनी सांगितले की, आज देशात सोन्याला जास्त महत्त्व आले आहे. जे मंदिर श्रीमंत त्या ठिकाणी भक्तांची गर्दी जास्त; पण गांधीजींच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी मदत करताना महिलांनी दागिने दिले असे सांगितले. यावेळी राधाबहन भट, महादेव विद्रोही व विनायक ताकसांडे यांचा सूतमाळ व खादी शॉल देवून प्रा. डॉ. श्रीराम जाधव यांनी सत्कार केला. प्रास्ताविक व संचालन जयवंत मठकर यांनी केले तर आभार प्रशांत गुजर यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. गजानन कोठेवार, बाबा खैरकर, मोहन खैरकर, विजय धुमाळे, सचिन उगले, कुसुम पांडे यांच्यासह विविध महाविद्यालयातील विद्यार्थी हजर होते.