शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

वाढती श्रीमंती गरिबीला कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:44 IST

आजच्या गरीबी रेखा जी खाली दिसते त्याला देशातील श्रीमंतांच्या चढत्या रेषा कारणीभूत आहे.

ठळक मुद्देराधाबहन भट : यात्री निवासात व्याख्यान

आॅनलाईन लोकमतसेवाग्राम : आजच्या गरीबी रेखा जी खाली दिसते त्याला देशातील श्रीमंतांच्या चढत्या रेषा कारणीभूत आहे. त्यामुळे श्रीमंताची रेखा खाली आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राधाबहन भट यांनी केले.येथील यात्री निवासच्या आचार्य दादा धर्माधिकारी सभागृहामध्ये गांधी १५० अभियानांतर्गत जानकीदेवी बजाज यांच्या १२५ व्या जयंती निमित्त व्याख्यानचे आयोजन केले होते. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, सामाजिक कार्यकर्ते विनायक ताकसांडे उपस्थित होते. राधाबहन पुढे म्हणाल्या, स्वातंत्र चळवळीत बजाज परिवार गांधीजींसोबत होता. चळवळीला गांधीजींनी आर्थिकतेची मागणी करताच जानकीदेवी आपले दागिने दिले. याला जमनालालजी यांचीही संमती होती. नंतर मात्र त्यांनी साधे जीवन कायम ठेवले. पांढरी साडी व हिरवी थैली यातच सदैव त्या दिसल्या. वास्तवात त्या राजस्थानी असताना सुद्धा अशा वेषात राहायला घाबरल्या नाहीत. भारतीय संस्कृतीत व्रताला फार महत्त्व आहे. संस्कारील जीवनाचा प्रभाव त्यांच्या मुला-मुलींवर पण झाला. कमलनयन यांचा विवाह खादीच्या कपड्यांवर व स्वत: घेतलेल्यांवर झाल्याचे भट यांनी सांगितले. त्यांचा विचार समजण्याची सध्या गरज आहे असेही त्या म्हणाल्या.महादेव विद्रोही यांनी सांगितले की, आज देशात सोन्याला जास्त महत्त्व आले आहे. जे मंदिर श्रीमंत त्या ठिकाणी भक्तांची गर्दी जास्त; पण गांधीजींच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी मदत करताना महिलांनी दागिने दिले असे सांगितले. यावेळी राधाबहन भट, महादेव विद्रोही व विनायक ताकसांडे यांचा सूतमाळ व खादी शॉल देवून प्रा. डॉ. श्रीराम जाधव यांनी सत्कार केला. प्रास्ताविक व संचालन जयवंत मठकर यांनी केले तर आभार प्रशांत गुजर यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. गजानन कोठेवार, बाबा खैरकर, मोहन खैरकर, विजय धुमाळे, सचिन उगले, कुसुम पांडे यांच्यासह विविध महाविद्यालयातील विद्यार्थी हजर होते.