शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

वाढती श्रीमंती गरिबीला कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:44 IST

आजच्या गरीबी रेखा जी खाली दिसते त्याला देशातील श्रीमंतांच्या चढत्या रेषा कारणीभूत आहे.

ठळक मुद्देराधाबहन भट : यात्री निवासात व्याख्यान

आॅनलाईन लोकमतसेवाग्राम : आजच्या गरीबी रेखा जी खाली दिसते त्याला देशातील श्रीमंतांच्या चढत्या रेषा कारणीभूत आहे. त्यामुळे श्रीमंताची रेखा खाली आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राधाबहन भट यांनी केले.येथील यात्री निवासच्या आचार्य दादा धर्माधिकारी सभागृहामध्ये गांधी १५० अभियानांतर्गत जानकीदेवी बजाज यांच्या १२५ व्या जयंती निमित्त व्याख्यानचे आयोजन केले होते. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, सामाजिक कार्यकर्ते विनायक ताकसांडे उपस्थित होते. राधाबहन पुढे म्हणाल्या, स्वातंत्र चळवळीत बजाज परिवार गांधीजींसोबत होता. चळवळीला गांधीजींनी आर्थिकतेची मागणी करताच जानकीदेवी आपले दागिने दिले. याला जमनालालजी यांचीही संमती होती. नंतर मात्र त्यांनी साधे जीवन कायम ठेवले. पांढरी साडी व हिरवी थैली यातच सदैव त्या दिसल्या. वास्तवात त्या राजस्थानी असताना सुद्धा अशा वेषात राहायला घाबरल्या नाहीत. भारतीय संस्कृतीत व्रताला फार महत्त्व आहे. संस्कारील जीवनाचा प्रभाव त्यांच्या मुला-मुलींवर पण झाला. कमलनयन यांचा विवाह खादीच्या कपड्यांवर व स्वत: घेतलेल्यांवर झाल्याचे भट यांनी सांगितले. त्यांचा विचार समजण्याची सध्या गरज आहे असेही त्या म्हणाल्या.महादेव विद्रोही यांनी सांगितले की, आज देशात सोन्याला जास्त महत्त्व आले आहे. जे मंदिर श्रीमंत त्या ठिकाणी भक्तांची गर्दी जास्त; पण गांधीजींच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी मदत करताना महिलांनी दागिने दिले असे सांगितले. यावेळी राधाबहन भट, महादेव विद्रोही व विनायक ताकसांडे यांचा सूतमाळ व खादी शॉल देवून प्रा. डॉ. श्रीराम जाधव यांनी सत्कार केला. प्रास्ताविक व संचालन जयवंत मठकर यांनी केले तर आभार प्रशांत गुजर यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. गजानन कोठेवार, बाबा खैरकर, मोहन खैरकर, विजय धुमाळे, सचिन उगले, कुसुम पांडे यांच्यासह विविध महाविद्यालयातील विद्यार्थी हजर होते.