शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

गावराणी आंब्यांना वाढती मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 1:45 PM

उन्हाळ्यात आंब्याची वाढती मागणी असून हापूसपेक्षाही गावराणी आंब्यांना ती अधिक असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उन्हाळ्यात आंब्याची वाढती मागणी असून हापूसपेक्षाही गावराणी आंब्यांना ती अधिक असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. पूर्वी प्रत्येक गावात १५ ते २० शेतकऱ्यांच्या शेतात आंब्याची अमराई असायची. कालांतराने या आमराई दुर्मीळ झाल्या आहे. त्यामुळे आज आम्रवृक्षांचे संवर्धन करणे काळाची गरज झाली आहे.चिकणी, जामणी, पढेगाव, निमगाव व परिसरामध्ये काही प्रमाणात गावरानी आंब्याची झाडे आहेत. या आम्रवृक्षाचे आंबे हल्ली चांगले भरल्यामुळे व सकस आल्यामुळे आंबे तोडण्यास सुरुवात झाली आहे. गावरानी आंब्याला शहरी भागात अधिक प्रमाणात मागणी असते. देशी आंबे सुंगधित व रुचकर असल्यामुळे या आंब्याचे लोणचे तयार करण्याकरिता विशेष मागणी असते.पौष महिन्यात आम्रवृक्षाला आलेल्या बहराचे आंबे मे महिन्यात तोडण्यास सज्ज झाले असल्याने पढेगाव येथे आंबे तोडण्यास सुरुवात झाली आहे.आधुनिकतेमुळे जीवनाचा प्रवाह बदलत चालला असला तरी ‘जुने ते सोने’ या म्हणीच्या वास्तव्याची अनुभूती आल्याखेरीज राहवत नाही. प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत आम्रवृक्षाचे महत्त्व अबाधित आहे. मात्र नामशेष झालेली आमराई पुन्हा निर्माण करणे आवाक्याबाहेर आहे.सगळ्याच मुलांना नामशेष झालेली मामाच्या गावची आमराई पुनर्जीवित व्हावी, असे वाटत आहे. सध्या तरी गावरानी आंब्याची चवही दुर्मीळच झाल्याचा अनुभव अनेकांना येत आहे. एकट-दुकट राहिलेली आंब्याची झाडे नव्या पीढिला खुणावत आहे. त्यामुळे आमराईचे पुनर्जीवन व संवर्धन करणे काळाची गरज झाली आहे.

टॅग्स :Mangoआंबा