शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शहरवासीयांना सहन करावा लागणार वाढीव कराचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 22:37 IST

स्थानिक नगर पालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत मालमत्ता कर वाढीचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

ठळक मुद्देसर्वसाधारण सभेत २० टक्केला विरोध : १० टक्के वाढीला दिली संमती

आॅनलाईन लोकमतवर्धा : स्थानिक नगर पालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत मालमत्ता कर वाढीचा निर्णय एकमताने घेण्यात आला. यावेळी पालिकेच्यावतीने सभेत मालमत्ता करात २० टक्क्याने वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते; पण त्याला सर्व नगरसेवकांनी विरोध दर्शविला. चर्चेअंती १० टक्के कर वाढविण्याला एकमताने संमती देण्यात आली. यामुळे येत्या काही दिवसांत शहरवासीयांना वाढीव कराचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.प्रत्येक पाच वर्षांनंतर पालिकेच्यावतीने मालमत्ता करात वाढ केली जाते. त्या अनुषंगाने नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत वर्धा शहरातील मालमत्तांचे सन २०१६-१७ ते सन २०१९-२० या कालावधीकरिता महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ११४ नुसार चतुर्थ वार्षिक फेरमुल्यांकन भाडेमुल्य पद्धतीने करण्यासाठी नवीन कर आकारणी दरात २० टक्के वाढ करण्यास मान्यता प्रदान करण्याचा ठराव सादर करण्यात आला. सदर ठराव सर्वसाधारण सभेत सादर होताच सभागृहात उपस्थित सर्व नगरसेवकांनी एकमताने २० टक्के कर वाढीला विरोध दर्शविला.यानंतर झालेल्या चर्चेअंती सभागृहातील उपस्थित सर्व न.प. सदस्यांनी १० टक्के मालमत्ता कर वाढीला बहूमताने हिरवी झेंडी देत ठराव पारित केला. सदर ठरावाला न.प. सभागृहाने मंजुरी दिल्याने मालमत्ता कर वाढीचा मार्ग मोकळा झाला आहे; पण अंतिम निर्णय नगर रचनाकार विभाग घेणार असल्याचे सांगण्यात आले.नियमावलीत ४० टक्केपर्यंत वाढची तरतूदपालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी व नागरिकांना चांगल्या सोई-सुविधा देण्याच्या उद्देशाला केंद्रास्थानी ठेऊन प्रत्येक पाच वर्षांनी नगर पालिकेच्यावतीने मालमत्ता करात वाढ केली जाते. महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ नुसार पालिकांना मालमत्ता करात ४० टक्केपर्यंत वाढ करून घेता येत असल्याचे सांगण्यात आले.अंतिम निर्णयाचा अधिकार नगर रचनाकार विभागाला२० टक्केला विरोध दर्शवित १० टक्के मालमत्ता कर वाढीचा ठराव वर्धा न.प.च्या सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. नागरिकांकडून मालमत्ता कर आकारणीसाठी महत्त्वाचा भाग असलेल्या चतुर्थ वार्षिक फेरमुल्यांकरनाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. वर्धा नगर पालिकेच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक घराघरातून सध्या माहिती घेतल्या जात आहे. ही माहिती एकत्र करून ती कर मुल्यांकन निर्धारण अधिकारी असलेल्या नगर रचनाकार विभागाला पाठविण्यात येणार आहे. त्यावर अंतिम निर्णय नगर रचनाकार विभाग घेणार आहेत.प्रत्येक पाच वर्षांनी मालमत्ता करात वाढ केली जाते. घेण्यात आलेला ठराव त्या प्रक्रियेतीलच एक भाग आहे. वाढीव करामुळे नगर परिषदेच्या उत्पन्नात वाढ होणार असून नागरिकांना चांगल्या सोई-सुविधा देण्यास मदत होणार आहे.- रवींद्र जगताप, कर अधीक्षक, न.प., वर्धा.