शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

शासनाकडून शेतकऱ्यांना वाढीव अनुदान

By admin | Updated: January 19, 2017 00:18 IST

शासनाकडून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. उत्पन्नातील घट

सोयाबीन उत्पादकांना दिलासा : शेतकऱ्यांकडून प्रस्ताव अपेक्षित हिंगणघाट : शासनाकडून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. उत्पन्नातील घट आणि अत्यल्प मिळालेल्या भावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शासनाने वाढीव अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शेतकऱ्यांना सोयाबीन विकलेल्या बाजार समितीमध्ये प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. हे सोयाबीन अनुदान प्रती क्विंटल २०० रुपये प्रमाणे अधिकाधिक २५ क्विंटलपर्यंत देण्यात येणार आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत बाजार समितीमध्ये विकलेल्या सोयाबीनपोटी हे अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ज्या बाजार समितीमध्ये आपले सोयाबीन विकले, त्या बाजार समितीकडे शेतकऱ्यांना प्रस्ताव पाठवावे लागणार आहेत. यात २५ क्विंटलपर्यंत म्हणजेच ५ हजार रुपयांपर्यंत अनुदान प्राप्त होणार आहे. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत ज्या शेतकऱ्याने सोयाबीनची विक्री केली, अशा शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० व अधिकाधिक २५ क्विंटल प्रती शेतकरी हे अनुदान देण्यात येत आहे. हिंगणघाट बाजार समितीच्या आवारात तीन महिन्यांच्या कालावधीत सोयाबीनची विक्री केलेल्या शेतकऱ्यांनी विक्री पावती, चालू वर्षाचा सातबारा, राष्ट्रीयकृत बॅँक बचत खात्याची झेरॉक्स, आधार कार्ड व तलाठ्याचे सोयाबीनबाबत पेरापत्रक आदी कागदपत्रासह समितीच्या छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथे अनुदान मागणी प्रस्ताव सादर करावा. सदर प्रस्ताव पडताळणी करून उचित कार्यवाहीकरिता वरीष्ठ कार्यालयास सादर करण्यात येणार असल्याचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री केलेल्या बाजार समित्यांमध्येही प्रस्ताव सादर करता येणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे काही प्रमाणात का होईना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.(तालुका प्रतिनिधी)