शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
3
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
4
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
5
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
6
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
7
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
8
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
9
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
10
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
11
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
12
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
13
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
14
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
15
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
16
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
17
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
18
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
19
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
20
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!

शासनाकडून शेतकऱ्यांना वाढीव अनुदान

By admin | Updated: January 19, 2017 00:18 IST

शासनाकडून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. उत्पन्नातील घट

सोयाबीन उत्पादकांना दिलासा : शेतकऱ्यांकडून प्रस्ताव अपेक्षित हिंगणघाट : शासनाकडून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. उत्पन्नातील घट आणि अत्यल्प मिळालेल्या भावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शासनाने वाढीव अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शेतकऱ्यांना सोयाबीन विकलेल्या बाजार समितीमध्ये प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. हे सोयाबीन अनुदान प्रती क्विंटल २०० रुपये प्रमाणे अधिकाधिक २५ क्विंटलपर्यंत देण्यात येणार आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत बाजार समितीमध्ये विकलेल्या सोयाबीनपोटी हे अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ज्या बाजार समितीमध्ये आपले सोयाबीन विकले, त्या बाजार समितीकडे शेतकऱ्यांना प्रस्ताव पाठवावे लागणार आहेत. यात २५ क्विंटलपर्यंत म्हणजेच ५ हजार रुपयांपर्यंत अनुदान प्राप्त होणार आहे. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत ज्या शेतकऱ्याने सोयाबीनची विक्री केली, अशा शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० व अधिकाधिक २५ क्विंटल प्रती शेतकरी हे अनुदान देण्यात येत आहे. हिंगणघाट बाजार समितीच्या आवारात तीन महिन्यांच्या कालावधीत सोयाबीनची विक्री केलेल्या शेतकऱ्यांनी विक्री पावती, चालू वर्षाचा सातबारा, राष्ट्रीयकृत बॅँक बचत खात्याची झेरॉक्स, आधार कार्ड व तलाठ्याचे सोयाबीनबाबत पेरापत्रक आदी कागदपत्रासह समितीच्या छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथे अनुदान मागणी प्रस्ताव सादर करावा. सदर प्रस्ताव पडताळणी करून उचित कार्यवाहीकरिता वरीष्ठ कार्यालयास सादर करण्यात येणार असल्याचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री केलेल्या बाजार समित्यांमध्येही प्रस्ताव सादर करता येणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे काही प्रमाणात का होईना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.(तालुका प्रतिनिधी)