शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शबरी आवास योजनेच्या लक्ष्यांकात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 22:34 IST

आदिवासी विकास महामंडळाद्वारे अनेक योजना राबविल्या जातात; पण लक्ष्य कमी असल्याने गरजूंना लाभापासून वंचित राहावे लागते. आदिवासींकरिता असलेल्या शबरी आवास योजनेचे लक्ष्यांकही शासनाने यावर्षी अत्यल्प केले होते. परिणामी, लाभार्थ्यांना वंचित राहावे लागले असते.

ठळक मुद्देलाभार्थ्यांना दिलासा : जि.प. अध्यक्षांचा पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आदिवासी विकास महामंडळाद्वारे अनेक योजना राबविल्या जातात; पण लक्ष्य कमी असल्याने गरजूंना लाभापासून वंचित राहावे लागते. आदिवासींकरिता असलेल्या शबरी आवास योजनेचे लक्ष्यांकही शासनाने यावर्षी अत्यल्प केले होते. परिणामी, लाभार्थ्यांना वंचित राहावे लागले असते. ही बाब लक्षात घेत पाठपुरावा केल्याने लक्ष्यांक दीड पट वाढविण्यात आले. पूर्वी १०० असलेले लक्ष्यांक आता २४५ झाले. यामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत येणाºया सर्व योजनांचे उद्दीष्ट शासनाकडून वाढवून देण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्याला शबरी आवास योजनेचे २०१६-१७ मध्ये ३०२ एवढे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वर्धा जिल्हा परिषदेने ते पूर्ण करीत सर्व लाभार्थ्यांना आवास योजनेंतर्गत घर, निधीचे वाटप केले. यंदा तो लक्ष्यांक वाढवून मिळेल, अशी अपेक्षा असताना केवळ १०० आवास एवढे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामुळे अनेक लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. यावरून आ. समीर कुणावार, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी तथा जि.प. सदस्य शरद सहारे यांनी लक्ष्यांक वाढवून देण्याची मागणी केली. यासाठी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, प्रधान सचिव, मुख्य सचिव तथा सचिवांना निवेदन देण्यात आले होते. याची दखल घेत आदिवासी विकास मंत्रालयाकडून लक्ष्यांक वाढवून देण्यात आले आहे. आता जिल्ह्याला २४५ एवढे लक्ष्यांक देण्यात आले आहे. यामुळे लाभार्थ्यांना या योजनेत सामावून घेणे शक्य होणार आहे.शबरी आवास योजना गरजू आदिवासी समाजातील लाभार्थ्यांना घरकूल उपलब्ध करून देण्यासाठी राबविली जात आहे. आदिवासी विकास महामंडळाकडून आदिवासी विकास प्रकल्प नागपूर यांच्या अंतर्गत या योजनेचे कार्यान्वयन केले जाते. गरजू लाभार्थ्यांची त्यांच्या पात्रतेनुसार निवड करून शबरी आवास योजनेचा लाभ दिला जातो. आता लक्ष्यांक वाढल्याने जिल्ह्यातील गरजू आदिवासी लाभार्थ्यांना घरकूल उपलब्ध होणे शक्य होणार आहे.योजनेसाठीचे निकष व निधीशबरी आवास योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा. लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असावा तथा त्याच्याकडे स्वत:ची जागा असावी, असे निकष देण्यात आलेले आहेत. हे निकष पूर्ण करणारे व्यक्ती शबरी आवास योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेतील घरकूलासाठी शासनाकडून प्रत्येकी १ लाख २० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो.मागील वर्षी ३०२ चे लक्ष्यांक पूर्ण केले असता यावर्षीसाठी १०० एवढेच उद्दिष्ट देण्यात आले होते. याबाबत आ. समीर कुणावार, जि.प. सदस्य शरद सहारे व मी स्वत: आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना भेटून निवेदन दिले. लक्ष्यांक चारपट करण्याची मागणी केली. याची दखल घेत किमान दीडपट वाढ करून देत २४५ लक्ष्यांक देण्यात आले आहे.- नितीन मडावी, अध्यक्ष, जिल्हा परिषद, वर्धा.