शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियानात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
5
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
6
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
7
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
8
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
9
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
10
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
11
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
12
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
13
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
14
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
15
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
16
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
17
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
18
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
19
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
20
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

लिक कालव्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

By admin | Updated: November 14, 2016 00:58 IST

मदन उन्नई धरणाचा डावा व उजवा कालवा अनेक ठिकाणी फुटला आहे. यामुळे अनेकांच्या शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे.

शेतकऱ्यांना फटका : कपाशी व अन्य पिके पिवळी पडल्याने नुकसानाची शक्यताआकोली : मदन उन्नई धरणाचा डावा व उजवा कालवा अनेक ठिकाणी फुटला आहे. यामुळे अनेकांच्या शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. परिणामी, कपाशीसह तुरीच्या पिकावर विपरित परिणाम होत आहे. कालव्याच्या लिकेजमुळे शेतकऱ्यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. याबाबत माहिती देऊनही संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. मदन उन्नई धरणाचा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी फायदा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षी कारभाराचा सध्या या भागातील शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागत आहे. या भागात धड मजबुत पाटचऱ्या नाही. त्या मातीने बुजल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी कालवा तुटला असून त्यात झुडपे वाढली आहेत. ज्या ठिकाणी कालव्याची दैनावस्था झाली आहे तेथे पाणी साचत असल्याने शेतजमीनीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मौजा वडगाव शिवारातील सुधाकर विठ्ठल बालपांडे यांच्या साडेचार एकरातील कपाशीचे पीक कालव्याच्या दैनावस्थेमुळे पिवळे पडले आहे. त्यांच्या शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. पाहिजे त्या पेक्षा जास्त पाणी शेतात साचल्यामुळे कपाशीला बोंडे आली नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. उत्तम पाटील यांचे शेत सुद्धा पडीक झाले आहे. लिकेजचा फटका नुकतीच लागवड केलेल्या गहु व चना पिकाला बसल्याचे शेतकरी सांगतात. तक्रार करूनही संबंधीत अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.(वार्ताहर)नुकसान भरपाईची मागणीकालव्याच्या लिकेजमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेताला तलावाचे स्वरूप आले आहे. या भागातील अनेक शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच गहू आणि चना पिकाची लागवड केली. काही शेतातील पिके अंकुरली असतानाच कालव्याच्या पाण्यामुळे शेतात पाणी साचले आहे. परिणामी, अंकुरलेले पीक करपत असल्याचे दिसून येत आहे. अनेकांच्या शेतातील चना व गहू पिकाचे बियाणे पाण्यामुळे जमिनीतच सडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. कालव्याच्या लिकेजमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने भरपाई देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.