शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

पीक कर्जावरील तारण मर्यादा वाढवा

By admin | Updated: July 7, 2015 01:42 IST

गत तीन वर्षांपासून शेतपिकांवर नैसर्गिक आपत्ती आली. यामुळे शेतकरी भयंकर आर्थिक अडचणीत आहे.

मागणी : लाखोंच्या दरातील शेतीवर अल्प कर्जवर्धा : गत तीन वर्षांपासून शेतपिकांवर नैसर्गिक आपत्ती आली. यामुळे शेतकरी भयंकर आर्थिक अडचणीत आहे. यावर उपाय म्हणून कर्जाचे पुनर्गठण करण्यात येत आहे; पण यात कर्जमर्यादा शेतकऱ्यांना सुलभ कर्ज भरण्याच्या सवलतीपासून वंचित ठेवत असल्याचे दिसते. यामुळे पीक कर्जावरील तारण मर्यादा वाढविणे गरजेचे झाले आहे.दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता पीक कर्जाचे पुर्नगठन करण्याचे आदेश शासनाने बँकांना दिले; पण त्यात शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यात विना तारणखत (मॉरगेज) ची मर्यादा ही एक लाख रुपये आहे. यामुळे नियमानुसार बँका पुनर्गठण करू शकत नाही. परिणामी, शेतकऱ्याला पीक कर्ज मिळण्यास अडचणीचे होत आहे. शेतकऱ्यांना मागील वर्षी दोन वेळा कर्ज देण्यात आले. पीक कर्जासह तात्काळ कर्जही बँकांनी शेतकऱ्यांना वितरित केले. दोन कर्ज आणि त्यावरील व्याजाची रक्कम ही एक लाखाच्या वर जात आहे. एक लाखावरील कर्जाचे पुनर्गठण करताना बँकांना गहाणखत करून देणे बंधनकारक आहे. यामुळे बोटावर मोजण्याइतपत शेतकऱ्यांनाच कर्ज पुनर्गठण योजनेचा लाभ मिळत असल्याचे वास्तव आहे. गहाणखत प्रक्रियेसाठी १० ते २० हजार रुपयांचा खर्च करावा लागत आहे. यात शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे शासनाने मॉरगेजची मर्यादा एक लाखाहून पाच लाखांपर्यंत वाढवावी, अशी मागणी सुकळी (बाई) येथील नारायण पोकळे यांनी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)असे होतात कर्जाचे हप्ते२०१४-१५ या वर्षात एका शेतकऱ्यास ९० हजार रुपये पीक कर्ज देण्यात आले. यात व्याज आणि त्यानंतर ४० हजार रुपयांचे तात्काळ कर्ज देण्यात आले. यामुळे शेतकऱ्याकडे एकूण १ लाख ४ हजार रुपयांचे कर्ज थकित झाले. या कर्जाचे पाच हप्ते केले तर २८ हजार रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यास भरावा लागेल. ही रक्कम अदा केल्यानंतर शेतकऱ्याकडे १ लाख १२ हजारांचे कर्ज शिल्लक राहते. हे कर्ज एक लाखाच्या वर असल्याने बँकेच्या नियमानुसार मॉरगेज करावे लागते. मॉरगेजचा खर्च १० ते १५ हजार रुपये आहे. सध्या शेतकरी हा खर्च करू शकत नाही. यामुळे मॉरगेजची मर्यादा एक लाखांवरून पाच लाखापर्यंत करावी. हे केल्यास शेतकऱ्यांना पीक कर्ज घेणे शक्य होणार आहे. यामुळे शासन व बँकांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.