शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

पाण्याअभावी तुरीची वाढ खुंटल्याने चिंतेत वाढ

By admin | Updated: October 16, 2015 02:57 IST

उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे जमिनीतील ओल झपाट्याने कमी होऊ लागले आहे. तसेच पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे ओलित करणे कठीण झाले आहे.

उन्हाच्या तडाख्याने संकट : ओलिताकरिता पाणी सोडण्याची मागणी पवनार : उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे जमिनीतील ओल झपाट्याने कमी होऊ लागले आहे. तसेच पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे ओलित करणे कठीण झाले आहे. पाण्याअभावी तुरीच्या पिकाची वाढ खुंटली आहे. यामुळे ओलिताकरिता सिंचन विभागाने पाणी द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पाणी सोडण्याकरिता किमान २५ टक्के शेतकऱ्यांची मागणी असणे गरजेचे असल्याचे म्हणत सिंचन विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना पाणी देण्यास नकार देण्याचा सूर आवळत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर हातचे पीक जाण्याची वेळ आली आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. महाकाळी धरणावरून धाम मुख्य कालवा असून सदर कालव्याद्वारे खरांगणा, आंजी येळाकेळी, पवनार, मांडगाव परिसरातील शेतकऱ्यांची सिचंनाची सोय होते. धरणसुद्धा १०० टक्के भरलेले असताना रब्बी हंगाम सुरू न झाल्याने कालव्याला पाणी सोडले जात नाही. कालव्याला कपाशी, तूर या पिकासाठी पाणी सोडले तर परिसरातील हजारो हेक्टर पिकाला त्याचा फायदा होईल. परंतु जलसिंचन विभाग मात्र शेतकऱ्यांवर कृपादृष्टी करायला तयार नसल्याचे निदर्शनात येते. मध्यंतरी पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीन पीक हातचे गेले. एकरी एक क्विंटलचा ही उतारा नसल्यामुळे शेतकरी पुरता हादरला आहे. त्याची भिस्त आता कपाशी, तूर या पिकावर आहे. उत्तरा नक्षत्राच्या पहिल्या चरणात झालेल्या अतिवृष्टीमुळे आधीच कपाशीचा पुरता श्रुंगार खाली आला होता व आता वाढत्या उन्हामुळे प्रचंड प्रमाणात पाती गळ होत आहे, तर जमिनीतील ओल आटल्यामुळे तुरीचीही पिकाचीही वाढ खुंटली आहे. अशावेळेस कालव्याद्वारे पाणी देणे गरजेचे आहे. एकीकडे शासन शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविते, परंतु त्याला जे पाहिजे ते देत नाही ही वस्तुस्थिती आहे. कपाशी व तुरीकरिता पाणी देण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे.(वार्ताहर)