शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी तुरीची वाढ खुंटल्याने चिंतेत वाढ

By admin | Updated: October 16, 2015 02:57 IST

उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे जमिनीतील ओल झपाट्याने कमी होऊ लागले आहे. तसेच पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे ओलित करणे कठीण झाले आहे.

उन्हाच्या तडाख्याने संकट : ओलिताकरिता पाणी सोडण्याची मागणी पवनार : उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे जमिनीतील ओल झपाट्याने कमी होऊ लागले आहे. तसेच पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे ओलित करणे कठीण झाले आहे. पाण्याअभावी तुरीच्या पिकाची वाढ खुंटली आहे. यामुळे ओलिताकरिता सिंचन विभागाने पाणी द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पाणी सोडण्याकरिता किमान २५ टक्के शेतकऱ्यांची मागणी असणे गरजेचे असल्याचे म्हणत सिंचन विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना पाणी देण्यास नकार देण्याचा सूर आवळत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर हातचे पीक जाण्याची वेळ आली आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. महाकाळी धरणावरून धाम मुख्य कालवा असून सदर कालव्याद्वारे खरांगणा, आंजी येळाकेळी, पवनार, मांडगाव परिसरातील शेतकऱ्यांची सिचंनाची सोय होते. धरणसुद्धा १०० टक्के भरलेले असताना रब्बी हंगाम सुरू न झाल्याने कालव्याला पाणी सोडले जात नाही. कालव्याला कपाशी, तूर या पिकासाठी पाणी सोडले तर परिसरातील हजारो हेक्टर पिकाला त्याचा फायदा होईल. परंतु जलसिंचन विभाग मात्र शेतकऱ्यांवर कृपादृष्टी करायला तयार नसल्याचे निदर्शनात येते. मध्यंतरी पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीन पीक हातचे गेले. एकरी एक क्विंटलचा ही उतारा नसल्यामुळे शेतकरी पुरता हादरला आहे. त्याची भिस्त आता कपाशी, तूर या पिकावर आहे. उत्तरा नक्षत्राच्या पहिल्या चरणात झालेल्या अतिवृष्टीमुळे आधीच कपाशीचा पुरता श्रुंगार खाली आला होता व आता वाढत्या उन्हामुळे प्रचंड प्रमाणात पाती गळ होत आहे, तर जमिनीतील ओल आटल्यामुळे तुरीचीही पिकाचीही वाढ खुंटली आहे. अशावेळेस कालव्याद्वारे पाणी देणे गरजेचे आहे. एकीकडे शासन शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविते, परंतु त्याला जे पाहिजे ते देत नाही ही वस्तुस्थिती आहे. कपाशी व तुरीकरिता पाणी देण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे.(वार्ताहर)