शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

बौद्ध धम्म परिषदेचे थाटात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 23:56 IST

येथील डॉ. आत्मारामजी उपाख्य बाबूजी जवादे स्मृती परिसरामध्ये द्विदिवसीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी उद्घाटनपर कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात धम्मध्वज ध्वजारोहण व बुद्ध वंदना भदंत सत्यानंद महाथेरो येणाळा, अरण्यवास यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देविविध विषयांवर चर्चा : संघटनात्मक कार्यावर देणार भर

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील डॉ. आत्मारामजी उपाख्य बाबूजी जवादे स्मृती परिसरामध्ये द्विदिवसीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी उद्घाटनपर कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात धम्मध्वज ध्वजारोहण व बुद्ध वंदना भदंत सत्यानंद महाथेरो येणाळा, अरण्यवास यांच्या हस्ते करण्यात आले.व्यासपीठावर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक आंबेडकर, माजी उपजिल्हाधिकारी अशोक गेडाम, शिक्षण महर्षी जयानंद खडसे, प्राचार्य आर. के. पाटील, उपप्राचार्य गुडधे, पर्यवेक्षक दिनेश वाघ, सुधीर राऊत, बन्सोड, देवतळे, रुईकर आदींची उपस्थिती होती.त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शहरातील पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी बुद्धवंदना व नृत्य सादर केले. धम्म परिषदेचे उद्घाटन अनिल जवादे यांनी केले. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत माजी प्राचार्य गोरख भगत यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम गोरख भगत यांनी दैनंदिन जीवनातील अनुभव सांगितले. तसेच डॉ. आंबेडकर यांच्या विचारातून स्थापन केलेल्या समता सैनिक दल, आरपीआयची आजची दिशा आणि दशा या विषयावर माहिती दिली.मार्गदर्शन करताना अनिल जवादे यांनी डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध दिक्षा घेतलेल्या नागपूरच्या दीक्षा भूमीला बौध्द धम्मपिठ स्थापनेत बौद्ध संघाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमातील विशेष अतिथी सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी बौद्धधम्मा पुढील आव्हाने यावर माहिती दिली. शिवाय पंचशीलाचे आचरण करावे स्पष्ट केले. प्राचार्य शेंडे यांनी एकविसाव्या शतकात संपूर्ण भारत बौद्ध मय होईल, असे सांगितले. सत्कारमूर्ती राजरत्न आंबेडकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, आम्ही दलित व नवबौद्ध नसून आम्ही केवळ बौद्ध आहोत, असे सांगत विषयाला अनुसरून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंत आनंद महाथेरो (आग्रा) यांनी राजकीय पक्ष स्वार्थासाठी बौद्ध बांधवांचा कसा वापर करतात हे स्पष्ट केले. सांकृतिक कार्यक्रमाने धम्म परिषदेच्या पहिल्या दिवसाचा समारोप झाला. या धम्म परिषदेला शहरासह परिसरातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिषदेचा समारोप रविवारी होणार आहे.