शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

बौद्ध धम्म परिषदेचे थाटात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 23:56 IST

येथील डॉ. आत्मारामजी उपाख्य बाबूजी जवादे स्मृती परिसरामध्ये द्विदिवसीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी उद्घाटनपर कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात धम्मध्वज ध्वजारोहण व बुद्ध वंदना भदंत सत्यानंद महाथेरो येणाळा, अरण्यवास यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देविविध विषयांवर चर्चा : संघटनात्मक कार्यावर देणार भर

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील डॉ. आत्मारामजी उपाख्य बाबूजी जवादे स्मृती परिसरामध्ये द्विदिवसीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी उद्घाटनपर कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात धम्मध्वज ध्वजारोहण व बुद्ध वंदना भदंत सत्यानंद महाथेरो येणाळा, अरण्यवास यांच्या हस्ते करण्यात आले.व्यासपीठावर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक आंबेडकर, माजी उपजिल्हाधिकारी अशोक गेडाम, शिक्षण महर्षी जयानंद खडसे, प्राचार्य आर. के. पाटील, उपप्राचार्य गुडधे, पर्यवेक्षक दिनेश वाघ, सुधीर राऊत, बन्सोड, देवतळे, रुईकर आदींची उपस्थिती होती.त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शहरातील पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी बुद्धवंदना व नृत्य सादर केले. धम्म परिषदेचे उद्घाटन अनिल जवादे यांनी केले. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत माजी प्राचार्य गोरख भगत यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम गोरख भगत यांनी दैनंदिन जीवनातील अनुभव सांगितले. तसेच डॉ. आंबेडकर यांच्या विचारातून स्थापन केलेल्या समता सैनिक दल, आरपीआयची आजची दिशा आणि दशा या विषयावर माहिती दिली.मार्गदर्शन करताना अनिल जवादे यांनी डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध दिक्षा घेतलेल्या नागपूरच्या दीक्षा भूमीला बौध्द धम्मपिठ स्थापनेत बौद्ध संघाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमातील विशेष अतिथी सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी बौद्धधम्मा पुढील आव्हाने यावर माहिती दिली. शिवाय पंचशीलाचे आचरण करावे स्पष्ट केले. प्राचार्य शेंडे यांनी एकविसाव्या शतकात संपूर्ण भारत बौद्ध मय होईल, असे सांगितले. सत्कारमूर्ती राजरत्न आंबेडकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, आम्ही दलित व नवबौद्ध नसून आम्ही केवळ बौद्ध आहोत, असे सांगत विषयाला अनुसरून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंत आनंद महाथेरो (आग्रा) यांनी राजकीय पक्ष स्वार्थासाठी बौद्ध बांधवांचा कसा वापर करतात हे स्पष्ट केले. सांकृतिक कार्यक्रमाने धम्म परिषदेच्या पहिल्या दिवसाचा समारोप झाला. या धम्म परिषदेला शहरासह परिसरातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिषदेचा समारोप रविवारी होणार आहे.