शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

थेट उत्पादक ते ग्राहक दुध पुरवठ्याच्या साखळीत सुधारणा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 23:56 IST

थेट उत्पादक ते ग्राहक या दुध पुरवठ्याच्या साखळीमध्ये सुधारणा व्हावी व आजस्थितीला दुधाला कमीत कमी ७० ते १०० रुपये प्रती लीटर भाव मिळावा, अशी मागणी वर्धा जिल्ह्यातील दुग्ध उत्पादकांनी केली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील दुग्ध उत्पादकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : थेट उत्पादक ते ग्राहक या दुध पुरवठ्याच्या साखळीमध्ये सुधारणा व्हावी व आजस्थितीला दुधाला कमीत कमी ७० ते १०० रुपये प्रती लीटर भाव मिळावा, अशी मागणी वर्धा जिल्ह्यातील दुग्ध उत्पादकांनी केली आहे.वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत आहेत. अशी परिस्थिती असतानाही अनेक शेतकरी पशुपालनाचा व दुग्ध व्यवसाय करीत आहेत. शासनाकडून पशुपालन व्यवसाय करणाºया दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणतीही प्रभावी योजना नाही. त्यामुळे अनेकजण कर्ज काढून हे काम करीत आहेत. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने प्रत्येक पशुपालकाला मोफत पशुखाद्य व चारा उपलब्ध करावा. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी दुधाचे उत्पादन होते तेथे पाकीटमधील दुधाच्या विक्रीवर प्रतिबंध घालावेत. गावराण प्रजातीच्या गायींचे दूध स्वास्थ्यवर्धक व आरोग्यदायी असते, यात तिळमात्र शंका नाही. मात्र, या गायींच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने उत्पादन क्षमता शून्यापर्यंत आली आहे. शासकीय यंत्रणेने स्वत: या जनावरांचे शास्त्रशुद्ध संवर्र्धन करून अत्याधुनिक तंत्राच्या सहाय्याने त्याची उत्पादन क्षमता कमीत कमी १५ ते २० लीटर प्रती दिवस करावी. तोपर्यंत शेतकऱ्यांना व पशुपालकांना त्यांच्या संवर्धनासाठी आग्रह धरू नये. जनावरांबाबत पशुमालकांना योग्य सल्ला द्यावा. ज्या दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी आहे त्या समजून घेवून ते तोट्यात जाणार नाही यासाठी त्यांना मदत करण्याची भूमिका सरकारने घ्यावी, अशी मागणीही दुग्ध उत्पादकांनी केली आहे.योग्य दराची अपेक्षापशुपालकांना उन्हाळ्याच्या दिवसात जनावरांच्या चाऱ्यासाठी भटकंती करावी लागते. शिवाय योग्य दर मिळत नाही. दुधाला योग्य दर देण्याची मागणी आहे.