शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या पर्यटनामुळे वाघांच्या अधिवासासह वागणुकीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 05:00 IST

व्याघ्र पर्यटनामुळे पुन्हा मनुष्य जंगलामध्ये शिरकाव करु लागला. सर्वच पर्यटक सारख्या मानसिकतेचे नसल्याने काही पर्यटक जंगल सफारीदरम्यान नियमांना तिलांजली देतात. म्हणून पर्यटनानेही वाघांच्या अधिवासाला धोका निर्माण होऊन त्यांच्या वर्तवणुकीवरही परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहे. वाघ्र पर्यटनातून वनविभागासह शासनाला निधी मिळत असल्याने ही बाब दुर्लक्षित होत आहे.

ठळक मुद्देजागतिक व्याघ्र दिन विशेष : शोभेची बाहुली न बनविता दूरगामी व्यवस्थापनाची गरज

आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गेल्या शतकापासून माणसाने पर्यावणाशी दोनहात करुन जंगलांमध्येही घुसखोरी चालविली. शिकार, जंगलतोड आणि अतिक्रमणामुळे वाघांच्या अधिवासाचे क्षेत्र कमी झालेत. परिणामी वाघांची संख्या कमी होऊ लागल्याने त्यांचे जतन करण्याची गरज निर्माण झाली. यातूनच २०१० मध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या वाघांविषयीच्या शिखर परिषदेत २९ जुलै या दिवसाची जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषणा करण्यात आली. त्या अनुशंगाने वाघांच्या संरक्षणाकरिता व्याघ्र प्रकल्पाच्या विस्तारासह पर्यटन विकासालाही चालना देण्यात आली.व्याघ्र पर्यटनामुळे पुन्हा मनुष्य जंगलामध्ये शिरकाव करु लागला. सर्वच पर्यटक सारख्या मानसिकतेचे नसल्याने काही पर्यटक जंगल सफारीदरम्यान नियमांना तिलांजली देतात. म्हणून पर्यटनानेही वाघांच्या अधिवासाला धोका निर्माण होऊन त्यांच्या वर्तवणुकीवरही परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहे. वाघ्र पर्यटनातून वनविभागासह शासनाला निधी मिळत असल्याने ही बाब दुर्लक्षित होत आहे. वाघांना शोभेची बाहुली न बनविता जंगलाच्या राजाचे स्थान कायम ठेवण्यासाठी शासनाने अधिक संशोधन करुन दूरगामी ठोस व्यवस्थापन करण्याची गरजही आज जागतिक व्याघ्र दिनानिमित्त व्यक्त होत आहे. असे असतानाही वर्धा जिल्ह्यातील बोर तर जिल्ह्याबाहेरील  ताडोबा, मेळघाट, टिपेश्वर येथील नियोजनबद्ध अधिवास व्यवस्थापनाने गेल्या दशकात वाघाची संख्या झपाट्याने वाढवून जागतिक पातळीवर विदर्भाचा लौकिक वाढला आहे, हे विशेष.

यामुळे वाघांची सख्या रोडावली- वाघांना जगण्यासाठी भरपूर जागा लागते. शेती, अतिक्रमण आणि जंगलतोडीमुळे वाघांच्या अधिवासाचे क्षेत्र कमी होत आहे.- भारत आणि बांग्लादेशाच्या किणाºयावरच्या सुदरबन पाणथळीत वाघांची संख्या मोठी आहे. परंतु समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे आगामी काळात या वाघांना बेघर व्हावे लागणार आहे.

- वाघांची चोरटी शिकार आणि तस्करी वाढतच आहे. भारतीय पट्टेदार वाघ जागतिक वैशिष्यपूर्ण प्राण्यांपैकी एक असून त्यांचीही संख्या रोडावली आहे. गेल्या शतकात ९७ टक्के शिकार माणसाच्या अतिरेकाने झाला असून जगात सध्या केवळ चार ते साडेचार हजारच वाघ शिल्लक राहिले आहे.

वाघांची काही वैशिष्ट्ये- वाघाची छाव्यांची जन्मापासून काही दिवस डोळेबंदच असतात. ते सुंगधाने आईला ओळखतात. जन्मलेले बहुतांश छावे उपासमार आणि थंडीने मरतात. काहिंना तर वाघच खाऊन टाकतात.- वाघिण छाव्यांना शिकार करण्याचे शिकविते. दिवसा प्रकाशात मानवी संघर्ष टाळणे वाघ पसंत करीत असल्याने ते साधारणत: रात्रीलाच शिकार करणे पसंत करतात.- रात्रभर ते त्यांच्या प्रदेशाभोवती गस्त घालत असतात. एका दिवसांत वाघ जवळपास ३० किलो मीटर अंतर पार करत असल्याचीही काही उदाहरणे आहेत.- वाघ हा उत्कृष्टपणे पाहू शकतो. त्याला तासंतास पोहाणे आवडतात. यासोबतच पाण्यात शिकार करण्याचीही कला वाघाला अवगत असते.- वाघांचे आयुर्मान अंदाजे २० ते २५ वर्षाचे असते. बहूतेक वाघ वयाच्या २० वर्षांपूर्वीच मरण पावतात. आतापर्यंत सर्वात जास्त २५ वर्षे जगणाºया ‘फ्लेव्हल’नावाच्या वाघाला सर्कशीतून सोडवून फ्लोरिडाच्या टँपा येथील प्राणी संग्रहालयात ठेवण्यात आले होते.- वाघाला झालेल्या जखमा भरुन काढण्यासाठी त्याची लाळच प्रभावी असते. साधारणत: वाघ माणसांकडे शिकार म्हणून बघत नाही. पण, माणसापासून धोक संभावत असल्याने तो हल्ला चढवितो. 

गेल्या शतकात माणसाने वाघांची अनिर्बंध शिकार केली. शिवाय जंगलतोड आणि अतिक्रमण करून वाघांच्या अधिवासाचे क्षेत्र हिरावले. परिणामी अन्नासाठी जवळच्या वस्त्यांवर वाघ हल्ले करु लागले. यातूनच माणूस-वाघ संबंध अधिक बिघडू लागले. त्यात व्याघ्र पर्यटनाने आणखीच भर घातली आहे. वाघ हा जंगलाचा राजा असल्याने त्याचे जंगलातील स्थान कायम ठेवण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.- प्रा.संदीप पेटारे,  पर्यावरण अभ्यासक. 

टॅग्स :Tigerवाघ