शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

वाढत्या पर्यटनामुळे वाघांच्या अधिवासासह वागणुकीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 05:00 IST

व्याघ्र पर्यटनामुळे पुन्हा मनुष्य जंगलामध्ये शिरकाव करु लागला. सर्वच पर्यटक सारख्या मानसिकतेचे नसल्याने काही पर्यटक जंगल सफारीदरम्यान नियमांना तिलांजली देतात. म्हणून पर्यटनानेही वाघांच्या अधिवासाला धोका निर्माण होऊन त्यांच्या वर्तवणुकीवरही परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहे. वाघ्र पर्यटनातून वनविभागासह शासनाला निधी मिळत असल्याने ही बाब दुर्लक्षित होत आहे.

ठळक मुद्देजागतिक व्याघ्र दिन विशेष : शोभेची बाहुली न बनविता दूरगामी व्यवस्थापनाची गरज

आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गेल्या शतकापासून माणसाने पर्यावणाशी दोनहात करुन जंगलांमध्येही घुसखोरी चालविली. शिकार, जंगलतोड आणि अतिक्रमणामुळे वाघांच्या अधिवासाचे क्षेत्र कमी झालेत. परिणामी वाघांची संख्या कमी होऊ लागल्याने त्यांचे जतन करण्याची गरज निर्माण झाली. यातूनच २०१० मध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या वाघांविषयीच्या शिखर परिषदेत २९ जुलै या दिवसाची जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषणा करण्यात आली. त्या अनुशंगाने वाघांच्या संरक्षणाकरिता व्याघ्र प्रकल्पाच्या विस्तारासह पर्यटन विकासालाही चालना देण्यात आली.व्याघ्र पर्यटनामुळे पुन्हा मनुष्य जंगलामध्ये शिरकाव करु लागला. सर्वच पर्यटक सारख्या मानसिकतेचे नसल्याने काही पर्यटक जंगल सफारीदरम्यान नियमांना तिलांजली देतात. म्हणून पर्यटनानेही वाघांच्या अधिवासाला धोका निर्माण होऊन त्यांच्या वर्तवणुकीवरही परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहे. वाघ्र पर्यटनातून वनविभागासह शासनाला निधी मिळत असल्याने ही बाब दुर्लक्षित होत आहे. वाघांना शोभेची बाहुली न बनविता जंगलाच्या राजाचे स्थान कायम ठेवण्यासाठी शासनाने अधिक संशोधन करुन दूरगामी ठोस व्यवस्थापन करण्याची गरजही आज जागतिक व्याघ्र दिनानिमित्त व्यक्त होत आहे. असे असतानाही वर्धा जिल्ह्यातील बोर तर जिल्ह्याबाहेरील  ताडोबा, मेळघाट, टिपेश्वर येथील नियोजनबद्ध अधिवास व्यवस्थापनाने गेल्या दशकात वाघाची संख्या झपाट्याने वाढवून जागतिक पातळीवर विदर्भाचा लौकिक वाढला आहे, हे विशेष.

यामुळे वाघांची सख्या रोडावली- वाघांना जगण्यासाठी भरपूर जागा लागते. शेती, अतिक्रमण आणि जंगलतोडीमुळे वाघांच्या अधिवासाचे क्षेत्र कमी होत आहे.- भारत आणि बांग्लादेशाच्या किणाºयावरच्या सुदरबन पाणथळीत वाघांची संख्या मोठी आहे. परंतु समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे आगामी काळात या वाघांना बेघर व्हावे लागणार आहे.

- वाघांची चोरटी शिकार आणि तस्करी वाढतच आहे. भारतीय पट्टेदार वाघ जागतिक वैशिष्यपूर्ण प्राण्यांपैकी एक असून त्यांचीही संख्या रोडावली आहे. गेल्या शतकात ९७ टक्के शिकार माणसाच्या अतिरेकाने झाला असून जगात सध्या केवळ चार ते साडेचार हजारच वाघ शिल्लक राहिले आहे.

वाघांची काही वैशिष्ट्ये- वाघाची छाव्यांची जन्मापासून काही दिवस डोळेबंदच असतात. ते सुंगधाने आईला ओळखतात. जन्मलेले बहुतांश छावे उपासमार आणि थंडीने मरतात. काहिंना तर वाघच खाऊन टाकतात.- वाघिण छाव्यांना शिकार करण्याचे शिकविते. दिवसा प्रकाशात मानवी संघर्ष टाळणे वाघ पसंत करीत असल्याने ते साधारणत: रात्रीलाच शिकार करणे पसंत करतात.- रात्रभर ते त्यांच्या प्रदेशाभोवती गस्त घालत असतात. एका दिवसांत वाघ जवळपास ३० किलो मीटर अंतर पार करत असल्याचीही काही उदाहरणे आहेत.- वाघ हा उत्कृष्टपणे पाहू शकतो. त्याला तासंतास पोहाणे आवडतात. यासोबतच पाण्यात शिकार करण्याचीही कला वाघाला अवगत असते.- वाघांचे आयुर्मान अंदाजे २० ते २५ वर्षाचे असते. बहूतेक वाघ वयाच्या २० वर्षांपूर्वीच मरण पावतात. आतापर्यंत सर्वात जास्त २५ वर्षे जगणाºया ‘फ्लेव्हल’नावाच्या वाघाला सर्कशीतून सोडवून फ्लोरिडाच्या टँपा येथील प्राणी संग्रहालयात ठेवण्यात आले होते.- वाघाला झालेल्या जखमा भरुन काढण्यासाठी त्याची लाळच प्रभावी असते. साधारणत: वाघ माणसांकडे शिकार म्हणून बघत नाही. पण, माणसापासून धोक संभावत असल्याने तो हल्ला चढवितो. 

गेल्या शतकात माणसाने वाघांची अनिर्बंध शिकार केली. शिवाय जंगलतोड आणि अतिक्रमण करून वाघांच्या अधिवासाचे क्षेत्र हिरावले. परिणामी अन्नासाठी जवळच्या वस्त्यांवर वाघ हल्ले करु लागले. यातूनच माणूस-वाघ संबंध अधिक बिघडू लागले. त्यात व्याघ्र पर्यटनाने आणखीच भर घातली आहे. वाघ हा जंगलाचा राजा असल्याने त्याचे जंगलातील स्थान कायम ठेवण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.- प्रा.संदीप पेटारे,  पर्यावरण अभ्यासक. 

टॅग्स :Tigerवाघ