शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

माथाडी कामगार, सुरक्षा रक्षकांना तातडीने ग्रॅज्युइटी योजना लागू करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 16:58 IST

Wardha : लाखो कामगार व सुरक्षा रक्षक योजनेपासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : शासनाकडे नोंद असलेल्या माथाडी कामगार व सुरक्षा रक्षक यांच्यासाठी एलआयसीमार्फत ग्रुप ग्रॅज्युइटी योजनेच्या प्रस्तावास तातडीने मान्यता देण्याची मागणी स्वाभिमान सुरक्षा रक्षक कामगार न्याय संघटनेने केली आहे.

राज्यात ३६ माथाडी आणि १५ सुरक्षा रक्षक मंडळे कार्यरत आहेत. महाराष्ट्र माथाडी कामगार व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम १९६९ व खासगी सुरक्षा रक्षक अधिनियम १९८१ अन्वये शासन व कामगार प्रशासन महाराष्ट्र यांच्या अधिपत्याखाली त्यांचा कारभार चालतो. उपदान प्रदान अधिनियम १९७२ च्या तरतुदींनुसार आजपर्यंत उल्लंघन झाले. मागील ५ वर्षापासून निवेदन, आपले सरकारवर तक्रारी करूनही लाभ झाला नाही. शासन व प्रशासनाने बैठका घेऊन कायद्यांतर्गत प्रस्ताव जून २०२२ रोजी शासन मान्यतेसाठी पाठविला. मात्र, शासन व प्रशासनाने अजूनही प्रस्तावास मान्यता दिली नाही. त्यामुळे लाखो कामगार व सुरक्षा रक्षक योजनेपासून वंचित आहेत. योजना नसल्याने मृत कामगार व सुरक्षा रक्षकांच्या अवलंबितांना लाभ होत नाही. त्यामुळे तातडीने प्रस्तावास मान्यता द्यावी, अशी मागणी स्वाभिमान सुरक्षा रक्षक कामगार न्याय संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष अमित देशे, विदर्भ अध्यक्ष भरत जयसिंगपुरे यांनी निवेदनातून केली आहे. ही योजना राज्यात लागू झाल्यास लाखोंच्यावर कामगार व सुरक्षा रक्षक व त्यांच्या कुटुंबांना लाभ होईल. उपदान एलआयसीमार्फत झाल्यास लाखो रुपयांपर्यंत फायदा होईल, असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष रणजित सहारे यांनी सांगितले. 

मंडळाकडे पुरेसा निधी उपलब्ध प्रस्ताव शक्य तितक्या लवकर लागू झाल्यास भविष्य निर्वाह निधी अधिनियम १९५२ अन्वये कर्मचारी पेन्शन १९९५ व कर्मचारी विमा १९७६ या योजना एलआयसीमार्फत लागू होऊ शकतात. त्यामुळे संबंधित कामगार व सुरक्षा रक्षकांच्या भविष्याच्या दृष्टीने चांगले होईल. योजना राबविण्याकरिता पुरेसा निधी मंडळात आहे. मात्र, मार्गील ४३ वर्षांपासून या मंडळाकडे शासन व प्रशासनाने लक्ष केंद्रित केले नाही, असे सहकोषाध्यक्ष मनीष पवार यांनी सांगितले.

टॅग्स :wardha-acवर्धाgovernment schemeसरकारी योजना