शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

उघाड मिळताच सोयाबीन उत्पादकांची लगबग

By admin | Updated: October 14, 2016 02:38 IST

गत आठवड्यात असलेले ढगाळी वातावरण व कोणत्याही क्षणी येणारा पाऊस यामुळे सोयाबीन उत्पादक संकटात अडकला होता.

कापणीत मजूर व्यस्त : गंजी लावलेल्यांकडून हार्वेस्टर मालकांकडे धाव; काही शेतात अजूनही चिखलच वर्धा : गत आठवड्यात असलेले ढगाळी वातावरण व कोणत्याही क्षणी येणारा पाऊस यामुळे सोयाबीन उत्पादक संकटात अडकला होता. आता दोन दिवसांपासून पावसाने उघाड दिल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडून सोयाबीन काढण्याची लगबग सुरू झाली आहे. तर ज्यांनी ढगाळी वातावरणात सोयाबीनची मळणी केली त्यांनी उन्ह निघताच सोयाबीन वाळविणे सुरू केल्याचे चित्र गावात दिसत आहे.सोयाबीन काढण्याच्या काळात पाऊस लागून पडल्याने सोयाबीन उत्पादकांनी दैना झाली होती. यातच ढगाळ वातावरणामुळे झाडावरच शेंगाना अंकूर फुटले होते. यामुळे हाती आलेले उत्पादन हातचे जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. सतत येत असलेल्या पावसामुळे जमिनी ओल्या असल्याने शेतात थ्रेशर जात नसल्याने मळणी खोळंबली होती. पाऊस सुरू असताना उघाड मिळालेल्या दिवसात जसे जमेल तसे सोयाबीन काढून शेतकऱ्यांनी घरी नेण्याचा सपाटा सुरू केला होता. यात सोयाबीन ओले असल्याने त्याची ढेप होण्याची वेळ आली होती. शिवाय सोयाबीन ओले असल्याने त्याला बाजारात भाव मिळणे कठीण झाले होते. यामुळे आता उघाड मिळताच काढलेले सोयाबीन उन्हात वाळविण्यात शेतकरी व्यस्त आहे, तर ज्यांच्या शेतात सोयाबीन कापनी होणे बाकी आहे त्यांनी ते कापणे सुरू केले आहे. (प्रतिनिधी) वेळी अवेळी येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांवर मजुरीचा भुर्दंडगत आठवड्यात ढगाळी वातावरणामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेले सोयाबील काढून त्याची गंजी लावण्याचे काम सुरू केले होते. यात सोयाबीन कापताना मध्येच येत असलेल्या पावसामुळे कामाचा खोळंबा झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. कापणी करून सोयाबीनची गंजी लावून ते वाळण्याची प्रतीक्षा अनेक शेतकऱ्यांना होती. मात्र पाऊस येत असल्याने कापलेले सोयाबीन ओले होण्याची भीती शेतकऱ्यांना असल्याने त्यांच्याकडून ती झाकण्याचे काम झाले. उघाड येताच झाकलेली गंजी पुन्हा उघडण्याचा उप्रकम गत आठवड्यात शेतकऱ्यांचा असल्याचे दिसून आले.