शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
2
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
3
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
4
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
5
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
6
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
7
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
8
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
9
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
10
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
11
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
12
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
13
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
14
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
15
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
16
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
17
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
18
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
19
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
20
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्लक्षामुळे अवैध वृक्षतोड झालीय बेलगाम

By admin | Updated: February 11, 2015 01:40 IST

वाढत्या लोकसंख्येला लागणाऱ्या गरजा अमर्याद असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. शासकीय संपत्ती असलेल्या जंगलात खुलेआम वृक्षतोड सुरू आहे.

अमोल सोटे आष्टी (शहीद)वाढत्या लोकसंख्येला लागणाऱ्या गरजा अमर्याद असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. शासकीय संपत्ती असलेल्या जंगलात खुलेआम वृक्षतोड सुरू आहे. या वृक्षतोडीला वनविभागाचे अधिकारी, कर्मचारीच प्रोत्साहीत करीत असल्याची ओरड होत आहे़वर्धा जिल्ह्यात उपलब्ध एकूण वनापैकी ६५ टक्के वन आष्टी, आर्वी, कारंजा तालुक्यात आहे. या जंगलांत साग, खैर यासह विविध प्रजातीचे वृक्ष आहेत़ मौल्यवान वनसंपत्तीच्या संरक्षणाची जबाबदारी वनसंरक्षण समित्या, वनविभागाकडे आहे; पण त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे़ संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी वृक्षतोड करणाऱ्यांना अभय देत असल्याचे दिसते़ नदीकाठावरील मोठी झाडे दिवसाढवळ्या तोडली जात आहेत़ बाभुळ, आंबा, निंब या झाडांचीही कत्तल होत आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर असलेली झाडे कमी पैशात विकत घेऊन परिसरातील झाडे तोडली जात आहे. झाडांच्या कत्तलीमुळे प्रदूषण होत असून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे़ हे नुकसान कसे भरून निघेल, हा प्रश्नच आहे़ जंगलात प्राण्यांची सुरक्षितता राहिली नाही. यामुळे अनेक प्राण्यांचा बळी जात आहे.आष्टी वनपरिक्षेत्रात एकूण पाच वाघ आहेत़ यात दोन मोठे तर तीन बिबट आहेत़ या पाचही वाघांना सुरक्षितता नसल्याने ते शिकाऱ्यांच्या रडारवर आहे. जंगलाशेजारील भागात तारांचे कुंपण लावून वीज खांबावरून वीज प्रवाह देऊन त्यात प्राणी अडकून मरतात. मृत प्राण्यांचे मांस विकले जाते़ प्राण्यांवर प्रेम करण्याऐवजी त्यांची शिकार करण्याला प्राधान्य दिले जात आहे. रोही, हरीण, ससा, मोर या प्राण्यांची शिकार केली जात आहे. प्राणी गणनेनंतर सुरक्षा वाढविण्यासाठी वनविभागाचा कल दिसत नाही. आष्टी-थार-पार्डी रस्त्याच्या दुतर्फा घनदाट जंगल आहे. यात सुरक्षित वन असून वनविभागाने तारेचे कुंपण करणे गरजेचे आहे़