शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

वनजमिनीवर अवैध खनन; गुरांची होतेय उपासमार

By admin | Updated: November 9, 2016 01:05 IST

चराईक्षेत्र घटले आणि चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने गुरांच्या संख्येत घट होत आहे.

गोपालक, शेतकरी त्रस्त : विटांसाठी केला जातोय मातीचा उपसा, प्रशासनाचे दुर्लक्षविनोद घोडे  चिकणी (जामणी)चराईक्षेत्र घटले आणि चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने गुरांच्या संख्येत घट होत आहे. यामुळे परिसरातील गोपालक, शेतकरी गुरे चारण्याकरिता वन विभागाच्या पडिक १०० ते १२५ एकर जमिनीचा उपयोग करीत होते; पण या जमिनीवरही आता खनन होत असल्याने चराई क्षेत्र घटले आहे. परिणामी, गुरांची उपासमार होत आहे. परिसरातील जमीन मुरमाटी (बरड) भाग असल्याने येथे लगतच्या गावातील गुरेही चरण्याकरिता आणली जातात. कालांतराने या परिसरात पाच वीटभट्ट्या सुरू झाल्या. विटांसाठी मातीची गरज असते. मातीसाठी काही शेतजमिनी विकत घेतल्या. एवढ्या मातीने होत नसल्याने वन विभागाच्या जमिनीवरही खन्नन करून माती नेली जात आहे. खन्नन होत असल्याने येथे खड्डे पडले असून गवत उगवत नाही. गवत न उगविल्याने गुरे चरू शकत नाहीत. यामुळे गुरांख्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या अवैध खननाकडे वन विभागानेही दुर्लक्ष केल्याचेच दिसून येत आहे. यामुळे आता गुरे कुठे चारावित, असा प्रश्न शेतकरी व गोपालकांना पडला आहे.वन अधिकाऱ्यांशी या वीटभट्टी धारकांची हात मिळवणी आहे की काय, असा ही प्रश्न उपस्थित होत आहे. वीटभट्ट्यांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. परिणामी, आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. वन विभागाच्या पडिक जागेमध्ये अवैधरित्या खनन करून माती चोरली जात असल्याने महसूलही बुडत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देत संबंधितांवर कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.