शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: सर्वात मोठी बातमी! भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा
2
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
3
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
4
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
5
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
6
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
7
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
8
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
9
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
10
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
11
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
12
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
13
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
14
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
15
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
16
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
17
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
18
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
19
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
20
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती

एलईडी बल्ब वाटप योजनेत गैरप्रकार?

By admin | Updated: November 25, 2015 06:15 IST

शासनाने विजेची बचत व्हावी, सर्वसामान्यांना त्याचा लाभ व्हावा, या हेतूने वीज ग्राहकांना अनुदानित

महावितरणचा प्रकार : ग्राहकांना दहाऐवजी चार बल्बचे वितरणतळेगाव (श्या.पं.) : शासनाने विजेची बचत व्हावी, सर्वसामान्यांना त्याचा लाभ व्हावा, या हेतूने वीज ग्राहकांना अनुदानित रूपात एलईडी बल्बचे वाटप सुरू केले आहे. या योजनेत प्रत्येक ग्राहकाला दहा बल्बचे वाटप करावयाचे आहे; पण संबंधित कंत्राटदारातर्फे ग्राहकाला दहाऐवजी चार बल्बचेच वाटप केले जात आहे. यात शासनाच्या योजनेला तिलांजली देण्याचा प्रकार सुरू आहे. अनुदानित बल्ब वाटप योजनेत गैरप्रकाराची शक्यता ग्राहकांतर्फे वर्तविली आहे.शासनाच्या एलईडी बल्ब वाटप योजनेंतर्गत ग्राहकांना सात वॅटचे एलईडी बल्ब केवळ १०० रुपयांत देण्यात येत आहे. यात १० रुपये रोख तर उर्वरित ९० रुपये नऊ महिने बिलात जोडले जाणार आहे. यामुळे ग्राहकांची हे बल्ब खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. यात ५ नामांकित कंपनीच्या बल्बचे वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार ग्राहकांना विविध नामांकित कंपन्या पुरवठा करणार आहेत. या योजनेला ग्राहकांतर्फे भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चौका-चौकात स्टॉल उभारून या बल्बचे वाटप सुरू आहे; पण या योजनेत प्रत्येक ग्राहकाला १० एलईडी बल्ब देण्याचे आदेश असताना संबंधित कंत्राटदारांतर्फे केवळ चार बल्बचेच वाटप केले जात आहे. शासनाने ही योजना सर्व सामान्यांना लाभ पोहोचावा या हेतूने सुरू केली आहे. यामुळे या योजनेनुसार ग्राहकांना सुलभ हप्त्यातही हे बल्ब खरेदी करता येणार आहे. या योजनेला ग्राहकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे; पण केवळ चारच बल्ब ग्राहकांना मिळत असल्याने ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.(वार्ताहर) बल्बच्या वॉरंटीबाबत ग्राहकांमध्ये संभ्रमशासनाच्या या योजनेत वितरित करण्यात आलेल्या एलईडी बल्बची तीन वर्षे वॉरंटी आहे; पण रस्त्यावर बसून हे बल्ब विकणाऱ्यांतर्फे वितरण झाल्यावर सदर बल्ब बंद पडल्यास त्याची दुरूस्ती तसेच बदलून देण्याची तरतूद नाही. यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाच्या या योजनेत वितरित करण्यात आलेल्या एलईडी बल्बची तीन वर्षे वॉरंटी आहे; पण रस्त्यावर बसून हे बल्ब विकणाऱ्यांतर्फे वितरण झाल्यावर सदर बल्ब बंद पडल्यास त्याची दुरूस्ती तसेच बदलून देण्याची तरतूद नाही. यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. प्रत्येक ग्राहकाला एक हजार रुपयांमध्ये दहा बल्ब देण्याची वीज कंपनीची योजना आहे. नगदी १०० रुपये देऊन उर्वरित ९०० रुपये बिलामध्ये प्रत्येक महिन्याला ९० रुपये, असे वसूल करावयाचे आहे. माझी दहा बल्बची मागणी असताना केवळ चार बल्ब देण्यात आलेत.- मुकुंद ठाकरे, ग्राहक.