शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

रेल्वे फलाटावर लाचखोरीतून बहरतोय अवैध व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

वर्धा व सेवाग्राम रेल्वे स्थानकावर लोकमत प्रतिनिधीने काही प्रवाशांना घेऊन फेरफटका मारल्यावर असे निदर्शनास आले की काही विशिष्ट व्यक्तींनाच खाद्यपदार्थ विक्रीसाठी रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी मदत करीत आहे, अशी माहिती येथे कार्यरत व्यावसायिकांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर लोकमतच्या प्रतिनिधीला दिली.

ठळक मुद्देरेल्वे सुरक्षा बलाचे दुर्लक्ष : लाखो रुपयांची उलाढाल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा आणि सेवाग्राम या दोन्ही रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या अवैध वेंडरचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे प्रवाशांचे आरोग्य निकृष्ट खाद्यपदार्थांमुळे धोक्यात आले आहे. या विषयीची माहिती लोकमतने जाणून घेतली असता महिन्याला १.७५ लाखांची आर्थिक उलाढाल या अवैध व्यवसायामागे असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.वर्धा व सेवाग्राम रेल्वे स्थानकावर लोकमत प्रतिनिधीने काही प्रवाशांना घेऊन फेरफटका मारल्यावर असे निदर्शनास आले की काही विशिष्ट व्यक्तींनाच खाद्यपदार्थ विक्रीसाठी रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी मदत करीत आहे, अशी माहिती येथे कार्यरत व्यावसायिकांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर लोकमतच्या प्रतिनिधीला दिली.शिवाय तशी चर्चाही कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे. सेवाग्राम येथील फलाटावर दहा हातगाड्या आणि प्रत्येक हातगाडीवर केवळ दोनच व्यक्तींची नेमणूक करून खाद्यपदार्थ विक्री होणे क्रमप्राप्त आहे; पण एका हातगाडीवर पाच ते सहा व्यक्तींकडून खाद्यपदार्थ विक्री होत असल्याचे बघावयास मिळाले. तसेच प्रत्येक महिन्याला नचूकता लक्ष्मीदर्शनाचा लाभ घेऊन हे अवैध वेंडर पोसले जात असल्याने रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देण्याची तसेच विशेष पाऊल उचलण्याची गरज आहे.१.७५ लाखांच्या हिस्सेवाटपाची अशी आहे चर्चाजग्गा १५ हजार, जमिल २० हजार, कन्हैय्या १५ हजार, वीरू १० हजार, कल्लू १० हजार, चंद्रकांत १५ हजार, रंगारी १० हजार, तोला १५ हजार, सुनील १० हजार, जावेद ५ हजार, नासीर ५ हजार, समीर ५ हजार, मामा ५ हजार, नवीन १५ हजार आणि खान नामक व्यक्तीकडून २५ हजार रुपये प्रत्येक महिन्याला रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाºयांना नियमांना डावलून खाद्यपदार्थ आणि इतर साहित्याची विक्री करण्यासाठी दिल्या जात असल्याचे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर एका कर्मचाºयाने सांगितले.अधिकारी बदलताच मनमर्जीने मालसुताई?वर्धा रेल्वे सुरक्षा बलात तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश कांबळे यांनी आपल्या कामामुळे सदर अवैध व्यवसायांवर चांगलाच आटोक्यात आणले होते. परंतु, त्याची वर्धा येथून बदली होताच धावत्या रेल्वेसह रेल्वे फलाटावर नियम डावलून खाद्यपदार्थांसह इतर साहित्य विक्रीच्या प्रकाराला पुन्हा एकदा उधाण आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBribe Caseलाच प्रकरण