शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे फलाटावर लाचखोरीतून बहरतोय अवैध व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

वर्धा व सेवाग्राम रेल्वे स्थानकावर लोकमत प्रतिनिधीने काही प्रवाशांना घेऊन फेरफटका मारल्यावर असे निदर्शनास आले की काही विशिष्ट व्यक्तींनाच खाद्यपदार्थ विक्रीसाठी रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी मदत करीत आहे, अशी माहिती येथे कार्यरत व्यावसायिकांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर लोकमतच्या प्रतिनिधीला दिली.

ठळक मुद्देरेल्वे सुरक्षा बलाचे दुर्लक्ष : लाखो रुपयांची उलाढाल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा आणि सेवाग्राम या दोन्ही रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या अवैध वेंडरचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे प्रवाशांचे आरोग्य निकृष्ट खाद्यपदार्थांमुळे धोक्यात आले आहे. या विषयीची माहिती लोकमतने जाणून घेतली असता महिन्याला १.७५ लाखांची आर्थिक उलाढाल या अवैध व्यवसायामागे असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.वर्धा व सेवाग्राम रेल्वे स्थानकावर लोकमत प्रतिनिधीने काही प्रवाशांना घेऊन फेरफटका मारल्यावर असे निदर्शनास आले की काही विशिष्ट व्यक्तींनाच खाद्यपदार्थ विक्रीसाठी रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी मदत करीत आहे, अशी माहिती येथे कार्यरत व्यावसायिकांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर लोकमतच्या प्रतिनिधीला दिली.शिवाय तशी चर्चाही कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे. सेवाग्राम येथील फलाटावर दहा हातगाड्या आणि प्रत्येक हातगाडीवर केवळ दोनच व्यक्तींची नेमणूक करून खाद्यपदार्थ विक्री होणे क्रमप्राप्त आहे; पण एका हातगाडीवर पाच ते सहा व्यक्तींकडून खाद्यपदार्थ विक्री होत असल्याचे बघावयास मिळाले. तसेच प्रत्येक महिन्याला नचूकता लक्ष्मीदर्शनाचा लाभ घेऊन हे अवैध वेंडर पोसले जात असल्याने रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देण्याची तसेच विशेष पाऊल उचलण्याची गरज आहे.१.७५ लाखांच्या हिस्सेवाटपाची अशी आहे चर्चाजग्गा १५ हजार, जमिल २० हजार, कन्हैय्या १५ हजार, वीरू १० हजार, कल्लू १० हजार, चंद्रकांत १५ हजार, रंगारी १० हजार, तोला १५ हजार, सुनील १० हजार, जावेद ५ हजार, नासीर ५ हजार, समीर ५ हजार, मामा ५ हजार, नवीन १५ हजार आणि खान नामक व्यक्तीकडून २५ हजार रुपये प्रत्येक महिन्याला रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाºयांना नियमांना डावलून खाद्यपदार्थ आणि इतर साहित्याची विक्री करण्यासाठी दिल्या जात असल्याचे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर एका कर्मचाºयाने सांगितले.अधिकारी बदलताच मनमर्जीने मालसुताई?वर्धा रेल्वे सुरक्षा बलात तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश कांबळे यांनी आपल्या कामामुळे सदर अवैध व्यवसायांवर चांगलाच आटोक्यात आणले होते. परंतु, त्याची वर्धा येथून बदली होताच धावत्या रेल्वेसह रेल्वे फलाटावर नियम डावलून खाद्यपदार्थांसह इतर साहित्य विक्रीच्या प्रकाराला पुन्हा एकदा उधाण आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBribe Caseलाच प्रकरण