शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अवैध व्यवसाय तेजीत

By admin | Updated: November 15, 2015 01:32 IST

अल्लीपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणारे धोत्रा (कासार) हे गाव वर्धा-हिंगणघाट-चंद्रपूर मार्गावर मोठे गाव आहे.

राजरोसपणे होतेय दारूविक्री : विद्यार्थ्यांना ये-जा करताना त्रास, अल्पवयीन मुलेही आहारीवर्धा : अल्लीपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणारे धोत्रा (कासार) हे गाव वर्धा-हिंगणघाट-चंद्रपूर मार्गावर मोठे गाव आहे. या गावात सध्या पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अवैध व्यवसाय तेजीत असल्याचे चित्र आहे. अवैध दारूविक्री सट्टा, जुगार आदी फोफावल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी सामान्यांतून होत आहे. महामार्गावरील या गावात विविध लहान-मोठे व्यवसाय आहेत. बाहेर गावांतून येणाऱ्या नागरिकांची येथे नेहमीच रेलचेल असते. गावाला तीन वर्षांपूर्वी तंटामुक्त गाव पुरस्कार मिळाला; पण त्या पुरस्काराच्या प्रकाशात दडलेल्या गावात अल्लीपूर पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अवैध व्यावसायिकांनी धुमाकूळ घातला आहे. अवैध दारूविक्री, मटका, जुगार असे अनेक अवैध व्यवसाय पोलिसांनी चिरीमिरी घेऊन सुरू ठेवल्याचे दिसते. गावातील चौकांत दारूचे पाट वाहताना दिसतात. यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिला, विद्यार्थिनी तसेच विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यात अल्लीपूर पोलीस ठाणे अपयशी ठरले आहे. मागील वर्षी दारूबंदी मंडळाच्या महिला व तंटामुक्त ग्राम समितीने दारूवर आळा घालण्यात यश मिळविले होते; पण पोलिसांच्या असहकार्यामुळे व आवक बंद झाल्याने गावात पुन्हा दारूने डोके वर काढले आहे. काहीच दिवस दारूबंदी टिकलेल्या धोत्रा येथे कायम दारूबंदी करण्याची मागणी महिलांतून होत आहे. गावातील विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षणासाठी वर्धा, वायगाव येथे जातात. विद्यार्थ्यांवर रात्री परत येण्याची वेळ बरेचदा येते. या विद्यार्थ्यांना धोत्रा गावात जाताना तळीरामांच्या धुमाकूळाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. चिडीमारीच्या प्रकारामुळे शिक्षण घेण्यास जाणेही कठणी झाले आहे. याबाबत बीट जमादारांना माहिती असताना त्याकडे लक्ष दिले जात नसल्याची ओरड ग्रामस्थांतून होत आहे. अल्लीपूर पोलिसांनी दारूला सुट तर दिली नाही ना, अशीच शंका उपस्थित होत आहे. पोलिसांना हप्ता ठरवून दिलेला आहे, हप्ता न दिल्यास सतत धाडसत्र सुरू असते, अशी माहिती एका दारूविक्रेत्यानेच नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. खुलेआम चालणाऱ्या दारूविक्री व अवैध व्यवसायांमुळे गावातील वातावरण खराब होत आहे. भांडणांचे प्रमाण वाढले असून सलोखा राहिला नाही. ही बाब लक्षात घेत पोलीस अधीक्षकांनी कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)