शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

अवैध वीटभट्ट्यांनी वर्धा तालुक्याचा श्वास कोंडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 16:14 IST

Wardha News वाढत्या शहरीकरणामुळे बांधकामासाठी महत्त्वाचे साहित्य असलेल्या विटांच्या भट्ट्यांची संख्या वर्धा तालुक्यात दिवसेंदिवस वाढत आहे; पण वीटभट्टी मालकांकडून प्रदूषण नियंत्रणासाठीच्या नियमांना हरताळ फासण्यात येत आहे.

ठळक मुद्देमातीची सर्रास चोरीनियमांना वाटाण्याच्या अक्षता, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा : वाढत्या शहरीकरणामुळे बांधकामासाठी महत्त्वाचे साहित्य असलेल्या विटांच्या भट्ट्यांची संख्या वर्धा तालुक्यात दिवसेंदिवस वाढत आहे; पण वीटभट्टी मालकांकडून प्रदूषण नियंत्रणासाठीच्या नियमांना हरताळ फासण्यात येत आहे. यामुळे तालुक्यातील रहिवाशांचा श्वास कोंडला आहे. धुरामुळे फळबागांवरही परिणाम होत असल्याच्या तक्रारी आहेत. (Illegal brick kilns suffocate Wardha taluka!)

जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्ग, वर्धा, नांदेड महामार्गासाठी अवैध मुरूम चोरी, वाळूचे अवैध उत्खनन कमी झाले असताना अवैध वीट भट्ट्यांनी आता डोके वर काढले आहे. वर्धा तालुक्यात तब्बल ७७ वीटभट्ट्यांच्या आहे. मात्र, यासर्व वीटभट्ट्या विनापरवाना सुरू आहेत. विशेष म्हणजे कारला परिसरात वीटभट्टी चालकांचा त्रास वाढला आहे. समृद्धी महामार्गासाठी झालेल्या मुरूम चोरीत कोट्यवधी रुपयांचा दंड आकारला. वर्धा ते नांदेड रेल्वेमार्गातही दोन कंत्राटदारावर सुमारे २० कोटींचा दंड आकारला.

अवैध वाळूचोरीला राजकीय वरदहस्त असल्याने त्यावर कारवाई झाली नाही. हे सारे असताना आता अवैध वीटभट्ट्यांचाही विषय महत्त्वाचा ठरला आहे. खरांगणा गोडे येथील ४ वीटभट्टी चालकांनी अनेक वर्षांपूर्वी परवानगी घेतली होती. मात्र, त्याचे नूतनीकरण केले नाही. वीटभट्टीसाठी लागणारी माती शेतातून चोरी केली जाते, तर काही शेतकरी माती विकतात. त्यालाही शासकीय परवानगी आवश्यक असते. प्रदूषणाचे नियमही पाळले जात नाहीत. वीट्टभट्टीवर दारूअड्डा सुरू राहत असल्याने लगतच्या शेतकऱ्यांनाही त्रास होतो.

वीटभट्टी लावण्यासाठी शेतजमीन अकृषक करणे आवश्यक असताना तेही केली जात नाही. वीटभट्टी चालकांची मनमानी वाढल्याने नागरिकांना त्रास होत आहे. महाकाळ परिसरातील वीटभट्टी चालकांनी तर रस्त्यावरच अतिक्रमण केले आहे.

खरांगणा येथील ४ वीटभट्ट्या सोडून सर्वच वीटभट्ट्या अनधिकृत आहेत. मातीची परवानगी खनिकर्म विभागाकडून दिली जाते. मात्र, अकृषक, अवैध वीटभट्ट्यांवर कारवाई करण्यात येईल.

-रमेश कोळपे, तहसीलदार, वर्धा

टॅग्स :pollutionप्रदूषण