शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वीटभट्ट्यांनी वर्धा तालुक्याचा श्वास कोंडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 16:14 IST

Wardha News वाढत्या शहरीकरणामुळे बांधकामासाठी महत्त्वाचे साहित्य असलेल्या विटांच्या भट्ट्यांची संख्या वर्धा तालुक्यात दिवसेंदिवस वाढत आहे; पण वीटभट्टी मालकांकडून प्रदूषण नियंत्रणासाठीच्या नियमांना हरताळ फासण्यात येत आहे.

ठळक मुद्देमातीची सर्रास चोरीनियमांना वाटाण्याच्या अक्षता, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा : वाढत्या शहरीकरणामुळे बांधकामासाठी महत्त्वाचे साहित्य असलेल्या विटांच्या भट्ट्यांची संख्या वर्धा तालुक्यात दिवसेंदिवस वाढत आहे; पण वीटभट्टी मालकांकडून प्रदूषण नियंत्रणासाठीच्या नियमांना हरताळ फासण्यात येत आहे. यामुळे तालुक्यातील रहिवाशांचा श्वास कोंडला आहे. धुरामुळे फळबागांवरही परिणाम होत असल्याच्या तक्रारी आहेत. (Illegal brick kilns suffocate Wardha taluka!)

जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्ग, वर्धा, नांदेड महामार्गासाठी अवैध मुरूम चोरी, वाळूचे अवैध उत्खनन कमी झाले असताना अवैध वीट भट्ट्यांनी आता डोके वर काढले आहे. वर्धा तालुक्यात तब्बल ७७ वीटभट्ट्यांच्या आहे. मात्र, यासर्व वीटभट्ट्या विनापरवाना सुरू आहेत. विशेष म्हणजे कारला परिसरात वीटभट्टी चालकांचा त्रास वाढला आहे. समृद्धी महामार्गासाठी झालेल्या मुरूम चोरीत कोट्यवधी रुपयांचा दंड आकारला. वर्धा ते नांदेड रेल्वेमार्गातही दोन कंत्राटदारावर सुमारे २० कोटींचा दंड आकारला.

अवैध वाळूचोरीला राजकीय वरदहस्त असल्याने त्यावर कारवाई झाली नाही. हे सारे असताना आता अवैध वीटभट्ट्यांचाही विषय महत्त्वाचा ठरला आहे. खरांगणा गोडे येथील ४ वीटभट्टी चालकांनी अनेक वर्षांपूर्वी परवानगी घेतली होती. मात्र, त्याचे नूतनीकरण केले नाही. वीटभट्टीसाठी लागणारी माती शेतातून चोरी केली जाते, तर काही शेतकरी माती विकतात. त्यालाही शासकीय परवानगी आवश्यक असते. प्रदूषणाचे नियमही पाळले जात नाहीत. वीट्टभट्टीवर दारूअड्डा सुरू राहत असल्याने लगतच्या शेतकऱ्यांनाही त्रास होतो.

वीटभट्टी लावण्यासाठी शेतजमीन अकृषक करणे आवश्यक असताना तेही केली जात नाही. वीटभट्टी चालकांची मनमानी वाढल्याने नागरिकांना त्रास होत आहे. महाकाळ परिसरातील वीटभट्टी चालकांनी तर रस्त्यावरच अतिक्रमण केले आहे.

खरांगणा येथील ४ वीटभट्ट्या सोडून सर्वच वीटभट्ट्या अनधिकृत आहेत. मातीची परवानगी खनिकर्म विभागाकडून दिली जाते. मात्र, अकृषक, अवैध वीटभट्ट्यांवर कारवाई करण्यात येईल.

-रमेश कोळपे, तहसीलदार, वर्धा

टॅग्स :pollutionप्रदूषण