शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

शहीद स्मारकाची उपेक्षा

By admin | Updated: August 9, 2015 02:07 IST

१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात १४ आॅगस्ट रोजी जुलमी इंग्रजी प्रशासनाने केलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या केशव बळीराम बोंगीरवार..

खरांगणा : १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात १४ आॅगस्ट रोजी जुलमी इंग्रजी प्रशासनाने केलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या केशव बळीराम बोंगीरवार यांच्या स्मृती तेवत राहाव्या व जनतेला स्वातंत्र्य आंदोलनाची धग कायमस्वरूपी जाणवत राहावी या उद्देशाने बॅरीस्टर अंतुले मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातील शहिदांच्या नावे स्मारके उभी करण्यात आली. यापैकी एक म्हणजे मोरांगणा येथील शहीद स्मारक होय; पण सध्या या स्मारकाची उपेक्षा होत असल्याचे दिसते.या स्मारकाची सध्याची स्थिती अत्यंत दुर्दैवी आहे. सिलींग, फरशी, प्लास्टर जागोजागी उखडले आहे. कुंपण भिंत, गेट पालथे झाले आहे. खांब वाकले आहे. छतावरील सिमेंटच्या शिटा फुटलेल्या आहेत. इलेक्ट्रीक फिटींग लायटींग अस्तित्वातच राहिली नाही, अशी केवीलवानी अवस्था स्मारकाची झाली आहे. स्मारकाचे बांधकाम झाल्यानंतर शासनाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देखभालीकरिता इतर स्मारकांप्रमाणे जिल्हा परिषदेकडे पर्यायाने पंचायत समितीला हस्तांतरित केले. ग्रामपंचायतीकडून देखभाल दुरूस्ती सुरू झाली; पण वार्षिक २४०० रुपयांची तुटपुंजी तरतूद शासनाने केल्याने वीज बील, रंगरंगोटी, तुटफुट दुरूस्ती ही कामे ग्रा.पं. करणे शक्य होत नव्हते. शासनाकडे मागणी करूनही निधी देण्यात आला नाही. १५ वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार डॉ. शरद काळे यांच्याकडे कैफियत मांडली असता त्यांनी आपल्या निधीतून दुरूस्ती काम करून घेतले; पण काही वर्षांतच हे स्मारक जीर्ण झाले. महाराष्ट्रातील बहुतेक स्मारकांची ही अवस्था पाहता शासनाने स्मारके नोंदणीकृत सेवाभावी संस्थांना देखभालीकरिता करारपत्रावर दिली. त्यांना किमान १५ हजार रुपये खर्च करण्यासाठी बिज भांडवल म्हणून दिले. त्या अनुषंगाने येथील स्मारकही एका संस्थेस देखभाल दुरूस्तीसाठी दिले. संस्थेने स्मारकाची दुरूस्तीही केली; पण पुन्हा परिस्थिती जैसे थे दिसून येते. स्मारकाची दुरवस्था पाहता ग्रा.पं. ने ताब्यात देण्याची पुन्हा शासनाकडे मागणी केली. स्मारक स्वातंत्र्य आंदोलनाचे प्रेरणास्थान म्हणून विकसित करायचे झाल्यास आठ ते दहा लाखांचा खर्च होणे अपेक्षित आहे; पण शासन व लोकप्रतिनिधी दोघांनाही देशासाठी हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सेनानींप्रती वास्तूच्या स्वरूपात आदरांजली अर्पण कराविशी वाटत नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.