शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

युवकांना सर्वोदयशी जोडल्यास संजीवनी प्राप्त होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 22:14 IST

भारत देश युवकांचा देश आहे. त्यामुळे युवकांना एकत्र करणे गरजेचे आहे. त्यांना विचार दिल्यास योग्य शक्तीचा उपयोग होऊ शकतो.

ठळक मुद्देएस.एन. सुब्बाराव : अखिल भारतीय सर्वोदय समाज संमेलनाचा समारोप

ऑनलाईन लोकमतसेवाग्राम : भारत देश युवकांचा देश आहे. त्यामुळे युवकांना एकत्र करणे गरजेचे आहे. त्यांना विचार दिल्यास योग्य शक्तीचा उपयोग होऊ शकतो. याच युवकांना सर्वोदयाशी जोडल्यास संजीवनी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत गांधी विचारवंत व राष्ट्रीय युवा योजनेचे डॉ. एस.एन. सुब्बाराव यांनी व्यक्त केले.सर्वोदय समाज संमेलनाचा समारोप रविवारी झाला. अध्यक्षस्थानी डॉ. सुब्बाराव तर अतिथी म्हणून न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, राधाबहन भट, जयवंत मठकर, डॉ. उल्हास जाजू आदी उपस्थित होते. डॉ. सुब्बाराव पूढे म्हणाले की, आज हिंसामुक्त भारत पाहिजे. भाषेच्या नावावर विरोध होता कामा नये. आजही देशात भुकेलेल्यांचे प्रमाण ३० कोटी आहे. ग्रामोद्योगाच्या माध्यमातून देशातील रोजगाराचा प्रश्न सुटू शकतो. पर्यावरण रक्षण व भ्रष्टाचार मुक्तीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले. न्या. धर्माधिकारी यांनी माणसांचे जीवन निर्भय असावे. निडलेस लाईफ असावी, ग्रीड बेस नसावे. धर्मनिरपेक्ष समाज व्यवस्था असावी. शोषण समाप्त व्हावे. समानता व सर्वांचा आदर झाला पाहिजे, असे सांगितले. डॉ. जाजू यांनी सामाजिक स्तरावरील कामात वैयक्तिकता आणू नये. निष्ठापूर्ण कामात यश मिळते. शरीरात श्वासाचे महत्त्व असते. बुद्धीत अहंकाराला स्थान देता कामा नये. मैत्री सर्वोदयचे हृदय आहे. मतभिन्नता असू शकते; पण मनभिन्नता होऊ देऊ नका, असे सांगितले. याप्रसंगी सर्व स्वयंसेवक व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.शेवटी घोषणापत्राचे वाचन करण्यात आले. यात दारूमुक्त भारत बनविणे, राष्ट्रनिर्माणासाठी अहिंसा मार्ग स्वीकारून युवकांत संजिवनी निर्माण करणे, स्थानिक संसाधनांचा उपयोग आणि रोजगार वाढविणे, महिला शेतकरी, आदिवासी सिस्टम-पासून पिडीत असून निर्भयतेसाठी काम करणे, गणतंत्र व पंचायत राजला अधिक बळकट करणे, गांधीजींच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी ग्राम-स्वराज्याला वाढविणे, अंत्योदयाची सुुरुवात करणे, सर्वोदय समाजाला व्यापक बनविणे, जय जगत नारा अधिक प्रभावी व्हावा, मूलभूत मुल्यांवरील संकटांचा सामना करण्यासाठी आम्ही सर्व सर्वोदयी व गांधीजन तत्पर असावे, असे दहा मुद्यांचे वाचन संयोजक आदित्य पटनायक यांनी केले. संचालन गिताजंली पटनायक व महादेव विद्रोही यांनी केले तर आभार डॉ. सुगम बरंठ यांनी मानले. संमेलनात देशभरातील ४५०० सर्वोदयी सहभागी झाले होते.पारंपरिक नृत्य सादरीकरणअखिल भारतीय सर्वोदय समाज संमेलनात सहभागी होण्याकरिता देशातील कानाकोपºयातून सर्वोदयी आले होते. सोबतच आसाम, त्रिपूरा येथून काही स्वयंसेवकही आले होते. त्यांनी समारोपीय कार्यक्रमात पारंपरिक लोकनृत्यातून कला, संस्कृतीचे सादरीकरण केले.