शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

युवकांना सर्वोदयशी जोडल्यास संजीवनी प्राप्त होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 22:14 IST

भारत देश युवकांचा देश आहे. त्यामुळे युवकांना एकत्र करणे गरजेचे आहे. त्यांना विचार दिल्यास योग्य शक्तीचा उपयोग होऊ शकतो.

ठळक मुद्देएस.एन. सुब्बाराव : अखिल भारतीय सर्वोदय समाज संमेलनाचा समारोप

ऑनलाईन लोकमतसेवाग्राम : भारत देश युवकांचा देश आहे. त्यामुळे युवकांना एकत्र करणे गरजेचे आहे. त्यांना विचार दिल्यास योग्य शक्तीचा उपयोग होऊ शकतो. याच युवकांना सर्वोदयाशी जोडल्यास संजीवनी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत गांधी विचारवंत व राष्ट्रीय युवा योजनेचे डॉ. एस.एन. सुब्बाराव यांनी व्यक्त केले.सर्वोदय समाज संमेलनाचा समारोप रविवारी झाला. अध्यक्षस्थानी डॉ. सुब्बाराव तर अतिथी म्हणून न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, राधाबहन भट, जयवंत मठकर, डॉ. उल्हास जाजू आदी उपस्थित होते. डॉ. सुब्बाराव पूढे म्हणाले की, आज हिंसामुक्त भारत पाहिजे. भाषेच्या नावावर विरोध होता कामा नये. आजही देशात भुकेलेल्यांचे प्रमाण ३० कोटी आहे. ग्रामोद्योगाच्या माध्यमातून देशातील रोजगाराचा प्रश्न सुटू शकतो. पर्यावरण रक्षण व भ्रष्टाचार मुक्तीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले. न्या. धर्माधिकारी यांनी माणसांचे जीवन निर्भय असावे. निडलेस लाईफ असावी, ग्रीड बेस नसावे. धर्मनिरपेक्ष समाज व्यवस्था असावी. शोषण समाप्त व्हावे. समानता व सर्वांचा आदर झाला पाहिजे, असे सांगितले. डॉ. जाजू यांनी सामाजिक स्तरावरील कामात वैयक्तिकता आणू नये. निष्ठापूर्ण कामात यश मिळते. शरीरात श्वासाचे महत्त्व असते. बुद्धीत अहंकाराला स्थान देता कामा नये. मैत्री सर्वोदयचे हृदय आहे. मतभिन्नता असू शकते; पण मनभिन्नता होऊ देऊ नका, असे सांगितले. याप्रसंगी सर्व स्वयंसेवक व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.शेवटी घोषणापत्राचे वाचन करण्यात आले. यात दारूमुक्त भारत बनविणे, राष्ट्रनिर्माणासाठी अहिंसा मार्ग स्वीकारून युवकांत संजिवनी निर्माण करणे, स्थानिक संसाधनांचा उपयोग आणि रोजगार वाढविणे, महिला शेतकरी, आदिवासी सिस्टम-पासून पिडीत असून निर्भयतेसाठी काम करणे, गणतंत्र व पंचायत राजला अधिक बळकट करणे, गांधीजींच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी ग्राम-स्वराज्याला वाढविणे, अंत्योदयाची सुुरुवात करणे, सर्वोदय समाजाला व्यापक बनविणे, जय जगत नारा अधिक प्रभावी व्हावा, मूलभूत मुल्यांवरील संकटांचा सामना करण्यासाठी आम्ही सर्व सर्वोदयी व गांधीजन तत्पर असावे, असे दहा मुद्यांचे वाचन संयोजक आदित्य पटनायक यांनी केले. संचालन गिताजंली पटनायक व महादेव विद्रोही यांनी केले तर आभार डॉ. सुगम बरंठ यांनी मानले. संमेलनात देशभरातील ४५०० सर्वोदयी सहभागी झाले होते.पारंपरिक नृत्य सादरीकरणअखिल भारतीय सर्वोदय समाज संमेलनात सहभागी होण्याकरिता देशातील कानाकोपºयातून सर्वोदयी आले होते. सोबतच आसाम, त्रिपूरा येथून काही स्वयंसेवकही आले होते. त्यांनी समारोपीय कार्यक्रमात पारंपरिक लोकनृत्यातून कला, संस्कृतीचे सादरीकरण केले.