शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

शेतीला जोड दिल्यास आर्थिक स्तर उंचावेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:36 IST

सध्याच्या विज्ञान युगात शेतकऱ्यांनी नुसते शेतीच्या भरवशावर न राहता प्रत्येक शेतकºयांनी शेतीला शेळीपालन, दुग्धव्यवसाय आदींची जोड दिली पाहिजे. असे झाल्यास शेतकºयांचा आर्थिक स्तर उंचावण्यास नक्कीच मदत होईल, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.

ठळक मुद्देरामदास तडस : जि. प. सभागृहात कृषिदिनाचा कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्याच्या विज्ञान युगात शेतकऱ्यांनी नुसते शेतीच्या भरवशावर न राहता प्रत्येक शेतकºयांनी शेतीला शेळीपालन, दुग्धव्यवसाय आदींची जोड दिली पाहिजे. असे झाल्यास शेतकºयांचा आर्थिक स्तर उंचावण्यास नक्कीच मदत होईल, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.जि.पं.च्यावतीने तेथील सभागृहात कृषी दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे, जि.प. मुख्य कार्य पालन अधिकारी अजय गुल्हाणे, कृषी व्यवसाय संघाचे रवी शेंडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक ईलमे, पं. स. सभापती महानंदा ताकसांडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.डॉ. उंबरकर यांनी गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कोण कोणत्या उपाय योजना कराव्या याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मुकेश भिसे पारंपारिक शेती जशी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली करतो तशीच आधुनिक शेती ही शेतकऱ्यांनी अधिकारी व कृषी सहाय्यकांच्या मार्गदर्शनात करावी, असे सांगितले.जि.प. सदस्य तेलंग म्हणाले की, कमी खर्चाची शेती कशी करता येईल यावर भर दिला पाहिजे, असे सांगितले. विद्या मानकर यांनी कपाशीवरील बोंडअळी नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे कृषी विकास अधिकारी धर्माधिकारी यांनी कामगंध सापळे (फेरोमॅन ट्रॅप) चा शेतात जास्तीत जास्त वापर करावा असे सांगितले. कार्यक्रमादरम्यान वर्धा तालुक्यातील चार व सेलू तालुक्यातील दोन प्रगतीशील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन कृषी अधिकारी संजय बमनोटे यांनी केले तर आभार कृषी विकास अधिकारी रवींद्र धर्माधिकारी यांनी मानले. जि.प.च्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाला फुसाटे, धनवीज, तेलंग, सावरकर, डॉ. उंबरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर यांच्यासह मोठ्या संख्यने परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यशस्वीतेकरिता जि.प.च्या कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी सहकार्य केले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडसFarmerशेतकरी