शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

तुरीचे चुकारे द्यायला शासन विसरले तर नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 21:18 IST

७ मे २०१८ पासून शासनाने खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे साडे चार महिन्याचा काळ लोटला तरी अजुनही न दिल्यामुळे शासन हे चुकारे द्यायला विसरले तर नाही ना असा संतप्त सवाल तुर उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे.

ठळक मुद्देउत्पादक शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : ७ मे २०१८ पासून शासनाने खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे साडे चार महिन्याचा काळ लोटला तरी अजुनही न दिल्यामुळे शासन हे चुकारे द्यायला विसरले तर नाही ना असा संतप्त सवाल तुर उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे.तुर व हरभऱ्यांचे खुल्या बाजारातील भाव घसरल्याने शासनाने नाफेड या एजंसी मार्फत प्रथम तुर व नंतर हरभºयाची हमीभावाने खरेदी केली. ६ मे २०१८ पर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या तुरी घेतल्या त्यांचे चुकारे खरेदी दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीत दिले. पण ७ मे २०१८ पासून ज्या शेतकऱ्यांच्या तुरी मोजल्या त्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना अजुनही तुरीचे चुकारे मिळाले नाही. सुरुवातीला लवकरच चुकारे मिळतील असे सांगितल्या जात होते. ११ दिवसांपूर्वी सखोल चौकशी अंती नाफेडने ज्या एन.ए.एम. एल. कंपनीकडे शासनाच्या पोर्टलवर लॉट एन्ट्री करण्याची जबाबदारीा सोपविली होती त्या कंपनीने वेळीच लॉट एन्ट्री न केल्याने चुकाऱ्यास विलंब होत असल्याचे नाफेडद्वारे सांगितल्या गेले . त्याला आता १५ दिवसाचा कालावधी लोटला .इंटरनेटच्या जगात एखाद्या बाबीची एन्ट्री करायला एवढा वेळ लागू शकतो ही अनाकलनीय बाब आहे. यातून शासनाची बनवाबनवी स्पष्ट होते. ७ मे २०१८ नंतर राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी तुरी नाफेडला विकल्या आहे. ते सर्व तूर उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहे. खरीपातील पिकांचा खर्च करण्यासाठी या शेतकऱ्यांना बॅँकांनीही कर्ज न दिल्याने खाजगी सावकारांकडून तगड्या व्याज दराने कर्ज घ्यावे लागले. आपल्या हक्काचे चुकारे शासनाकडे बिनव्याजी पडून असताना खाजगी सावकारांकडून मोठ्या व्याजदराने कर्ज घेण्याची वेळ शासनाने शेतकऱ्यांवर आणली आहे.विशेष असे की शासनाने तूर खरेदी नंतर हरभºयाची खरेदी केली. हरभºयाचे चुकारे नुकतेच दिल्याचे समजले. यावरून नंतरच्या खरेदीचे चुकारे दिले असताना आधीच्या तुरीचे चुकारे न मिळाल्याने शासनाला ७ मे २०१८ पासून खरेदी केलेल्या तूर चुकाऱ्याचा विसर तर पडला नसावा असा संशय पिडीत शेतकºयांना येत आहे. शासनाने शेतकऱ्यांची अधिक आर्थिक कुचंबना न करता विलंब झालेल्या काळाचे १२ टक्के व्याज मिळवून चुकारे त्वरीत द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सेलू तालुक्यात खरेदी - विक्री संघाच्या चुकांमुळे काही शेतकऱ्यांना अर्धी रक्कम मिळाली तर अर्धी रक्कम अडकून पडली आहे.