शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

तुरीचे चुकारे द्यायला शासन विसरले तर नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 21:18 IST

७ मे २०१८ पासून शासनाने खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे साडे चार महिन्याचा काळ लोटला तरी अजुनही न दिल्यामुळे शासन हे चुकारे द्यायला विसरले तर नाही ना असा संतप्त सवाल तुर उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे.

ठळक मुद्देउत्पादक शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : ७ मे २०१८ पासून शासनाने खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे साडे चार महिन्याचा काळ लोटला तरी अजुनही न दिल्यामुळे शासन हे चुकारे द्यायला विसरले तर नाही ना असा संतप्त सवाल तुर उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे.तुर व हरभऱ्यांचे खुल्या बाजारातील भाव घसरल्याने शासनाने नाफेड या एजंसी मार्फत प्रथम तुर व नंतर हरभºयाची हमीभावाने खरेदी केली. ६ मे २०१८ पर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या तुरी घेतल्या त्यांचे चुकारे खरेदी दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीत दिले. पण ७ मे २०१८ पासून ज्या शेतकऱ्यांच्या तुरी मोजल्या त्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना अजुनही तुरीचे चुकारे मिळाले नाही. सुरुवातीला लवकरच चुकारे मिळतील असे सांगितल्या जात होते. ११ दिवसांपूर्वी सखोल चौकशी अंती नाफेडने ज्या एन.ए.एम. एल. कंपनीकडे शासनाच्या पोर्टलवर लॉट एन्ट्री करण्याची जबाबदारीा सोपविली होती त्या कंपनीने वेळीच लॉट एन्ट्री न केल्याने चुकाऱ्यास विलंब होत असल्याचे नाफेडद्वारे सांगितल्या गेले . त्याला आता १५ दिवसाचा कालावधी लोटला .इंटरनेटच्या जगात एखाद्या बाबीची एन्ट्री करायला एवढा वेळ लागू शकतो ही अनाकलनीय बाब आहे. यातून शासनाची बनवाबनवी स्पष्ट होते. ७ मे २०१८ नंतर राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी तुरी नाफेडला विकल्या आहे. ते सर्व तूर उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहे. खरीपातील पिकांचा खर्च करण्यासाठी या शेतकऱ्यांना बॅँकांनीही कर्ज न दिल्याने खाजगी सावकारांकडून तगड्या व्याज दराने कर्ज घ्यावे लागले. आपल्या हक्काचे चुकारे शासनाकडे बिनव्याजी पडून असताना खाजगी सावकारांकडून मोठ्या व्याजदराने कर्ज घेण्याची वेळ शासनाने शेतकऱ्यांवर आणली आहे.विशेष असे की शासनाने तूर खरेदी नंतर हरभºयाची खरेदी केली. हरभºयाचे चुकारे नुकतेच दिल्याचे समजले. यावरून नंतरच्या खरेदीचे चुकारे दिले असताना आधीच्या तुरीचे चुकारे न मिळाल्याने शासनाला ७ मे २०१८ पासून खरेदी केलेल्या तूर चुकाऱ्याचा विसर तर पडला नसावा असा संशय पिडीत शेतकºयांना येत आहे. शासनाने शेतकऱ्यांची अधिक आर्थिक कुचंबना न करता विलंब झालेल्या काळाचे १२ टक्के व्याज मिळवून चुकारे त्वरीत द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सेलू तालुक्यात खरेदी - विक्री संघाच्या चुकांमुळे काही शेतकऱ्यांना अर्धी रक्कम मिळाली तर अर्धी रक्कम अडकून पडली आहे.