शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळाचा पाऊस; कही खुशी कही गम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 23:33 IST

वातावरणात बदल होऊन गत २४ तासात वर्धा जिल्ह्यात सरासरी ९९.३० मि.मी. पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. हा पाऊस पिकांना नवसंजीवनी देणारा ठरला असला तरी काही ठिकाणी शेताला तळ्याचे स्वरूप आल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात सरासरी ९०.३० मि.मी. पाऊस : घरांसह उभ्या पिकांना फटका, काही मार्गावरील वाहतूक ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वातावरणात बदल होऊन गत २४ तासात वर्धा जिल्ह्यात सरासरी ९९.३० मि.मी. पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. हा पाऊस पिकांना नवसंजीवनी देणारा ठरला असला तरी काही ठिकाणी शेताला तळ्याचे स्वरूप आल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. नदी व नाले दुथडी भरून वाहत असल्याने पुराचे पाणी पुलावरून ओसंडून वाहत आहे. परिणामी, काही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पुलावरील पुराचे पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.भूपृष्ठावरील वाढते तापमान आणि समुद्रावरील घटलेले तपामान यामुळे वातावरणात बदल होऊन सायक्लोन (चक्रीवादळ) तयार झाले. सदर चक्रीवादळ चायना, जपान कडून काल छत्तीसगड व मध्यप्रदेश वर राहिल्याने त्याचा परिणाम वर्धा जिल्ह्यावर जाणवला. याच चक्रीवादळामुळे वातावरणात बदल होऊन शुक्रवारी जिल्ह्यात वरुण बरसला. मागील २४ तासात वर्धा जिल्ह्यात सरासरी ९९.३० मि.मी. पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकल्याचे हवामान खात्याच्या सुत्रांनी सांगितले.शुक्रवारी झालेला पाऊस हा परतीचा नसून परतीचा पाऊस आणखी सुमारे एक आठवला लांबल्याचेही हवामान खाद्याच्या सुत्रांकडून सांगण्यात आले. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील काही जलाशयांच्या पाणी पातळीत थोडी का होईना पण वाढ झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर काहींचे नुकसान झाल्याने त्यांना चांगलाच फटका बसला आहे. जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना शासकीय यंत्रणेने सर्वेक्षण करून शासकीय मदत देण्याची मागणी आहे.कापसीनजीकचा नवीन पूल वाहून गेल्याने वाहतूक बंदमोझरी (शे.) : वर्धा-राळेगाव मार्गावरील कापसी नजीेकच्या नाल्यावरील नवीन पुलाचे बांधकाम मागील दोन महिन्यांपासून सूरू आहे. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे या नाल्यातील जलपातळीत वाढ झाली. याच दरम्यान नाल्याच्या पूरात नवीन बांधकामाचा काही भाग वाहून गेला. शिवाय पाईप व दिलेला मातीचा भरही वाहून गेला.वादळासह पावसामुळे घराचे नुकसानसमुद्रपूर : शुक्रवारी झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे अंतरगाव येथील शेतकरी श्रावण भोयर यांच्या घराचे नुकसान झाले. सततच्या पावसादरम्यान त्यांचे घर जमिनदोस्त झाले. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. शुक्रवारचा पाऊस पिकांना नवसंजीवनी देणारा ठरला असला तरी तालुक्यातील काही भागातील शेतपिकाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. काही ठिकाणी घरांची परडझ तर काही ठिकाणी मोठाली झाडे उन्मळून पडल्याचे सांगण्यात आले. घर पडल्याने शेतकरी श्रावण भोयर यांचे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. तलाठी पन्नासे यांनी या घटनेची नोंद घेतली असून सरपंच जया कन्हाळकर, उपसरपंच प्रशांत बोरकुटे, ग्रा.पं. सदस्य प्रकाश चौधरी यांनी घटनास्थळाची पाहणी केली.यशोदेच्या पुरामुळे दहा तास वाहतूक प्रभावितवायगाव (नि.) : शुक्रवारी झालेल्या सततच्या पावसामुळे यशोदा नदीच्या जलपातळीत वाढ झाली. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास बघता-बघता दुथडी भरून वाहनाऱ्या यशोदा नदीचे पाणी वायगाव (नि.) नजीकच्या सरुळ येथील नदीवरील पुलावरून वाहण्यास सुरूवात झाल्याने वर्धा-राळेगाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शनिवारी दुपारी पूराचे पाणी कमी झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. सुमारे दहा तास या मार्गावरील वाहतूक बंद होती.१४८ घरांचे अंशत: तर दोन घरांचे पूर्णत: नुकसानलोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : काल दुपारपासून सुरु झालेल्या पावसाने हिंगणघाट तालुक्याला चांगलेच झोडपले. एकाच दिवसात सरासरी २२६.२४ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. सावली (वाघ ) मंडळ क्षेत्रात २५२ मिमीसह पावसाचा उच्चांक राहिला असल्याची माहिती तहसीलदार सचिन यादव यांनी दिली. पावसामुळे तालुक्यातील सुलतानपूर येथील नाल्यावरचा पूल वाहून गेल्याने या गावाचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला. त्याच प्रमाणे मनसावळी जवळील हिंगणघाट कापसी रस्ता पूर्णपणे पाण्यामुळे खरडून नेला. शुक्रवारी सकाळी १० वाजता रिपरिप पावसाला सुरवात झाली. दुपारी पावसाने चांगलाच जोर धरला. तालुक्यातील बहूतांश नाले दुथडी भरून वाहत असल्याने तसेच काही वेळी पाणी पुलावरूनही वाहल्याने वाहतूक प्रभावीत झाली होती. हिंगणघाट येथून काजळसरा मार्गे नरसाळा येथे रात्री ७.३० वाजता १७ प्रवासी घेऊन जाणारी एसटी कुंभी आणि सातेफळ शिवारातील नाल्याला आलेल्या पुरामुळे रस्त्यात अडकली होती. आ. समीर कुणावार तसेच स्थानिक प्रशासन आणि सातेफळच्या ग्रामस्थांच्या मदतीने या अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे चिचोली, मनसावळी, नंदोरी यासह काही ग्रामीण रस्त्यावरील वाहतूक काहीवेळेकरिता बंद होती. पावसासोबत वादळी वारा असल्याने काही झाडे उन्मळून पडली. शहरातील शिवाजी वॉर्ड, गांधी वॉर्ड, जुनी वस्ती या परिसरातील जुने मोठे झाडे उन्मळून पडले. तसेच काही घरांची पडझड झाली आहे. तालुक्यातील १४८ घरांचे अंशत: तर दोन घरांचा पुर्णपणे नुकसान झाले आहे. पुरात अडकलेल्या भगवा गावातील तिघांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.झाड उन्मळून पडलेशुक्रवारी झालेल्या पावसादरम्यान रात्री ७.३० वाजताच्या सुमारास प्रभाग क्रमांक १३ मधील गांधी वॉर्ड भागातील सालफेकर यांच्या घरासमोरील मोठे झाड अचानक उन्मळून पडले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. झाड पडल्यामुळे विद्युत ताराही तुटल्या होत्या. जमिनीवर पडून असलेल्या जीवंत विद्युत तारा मोठ्या अनुचित घटनेला आमंत्रण देत असल्याने माहिती मिळताच नगरसेवक सौरभ तिमांडे यांनी संबंधितांना त्याची माहिती दिली. त्यानंतर या भागातील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. रस्त्यावरील झाड बाजूला करून वेळीच पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी सौरभ तिमांडे यांनी केली आहे. भिकमचंद रांका, सुरेश भंडारी, अविरचंद भागडीया, विजय मुश्या, डॉ. चौधरी, केशव सालवेकर, रविंद्र डोंगुलवार, श्याम बतरा आदींची उपस्थिती होती.