शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

वाहनांमुळे शिकारीवर आळा बसेल

By admin | Updated: August 7, 2016 00:23 IST

वन विभागाकडून शासनाना खूप अपेक्षा असतात; पण साधनांअभावी हा विभाग अपेक्षा पूर्ण करू शकत नाही.

रामदास तडस : वर्धा, आष्टी व खरागंणा वनपरिक्षेत्रासाठी गस्त वाहन वर्धा : वन विभागाकडून शासनाना खूप अपेक्षा असतात; पण साधनांअभावी हा विभाग अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. म्हणूनच राज्य शासनाने वन विभागाला गस्त वाहन उपलब्ध करून दिले आहे. या वाहनांमुळे यापुढे अधिक जबाबदारीने वन्य व इतरही प्राण्याचे संरक्षण होईल व शिकारीवर आळा बसेल, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. वन विभागाला प्राप्त झालेल्या गस्त वाहनांचे हस्तांतरण खासदार रामदास तडस यांच्या हस्ते वनविभागाच्या कार्यालयात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपवनसंरक्षक दिंगबर पगार, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा साळवे, पिपल फॉर अ‍ॅनिमल संस्थेचे आशिष गोसावी उपस्थित होते. तडस यावेळी म्हणाले, एकाच दिवशी दोन कोटी पेक्षा जास्त झाडे लावून महाराष्ट्राने देशात इतिहास रचला आहे. या निमित्ताने वृक्षारोपणाबाबत नागरिकामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली. त्यामुळे हे अभियान लोकांचे झाले, हे याचे सर्वात मोठे यश आहे. लोकसभेत अनेक चांगले निर्णय होतात. देशाचे नागरिक म्हणून सर्व योजना ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्यात आपण सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले. त्यांच्या हस्ते वर्धा, आष्टी, खरागंणा येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना गाडीची चावी देण्यात आली. आजपासून तीन गाड्या वन विभागाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. वाहनांबाबत माहिती देताना उपवन संरक्षक पगार म्हणाले, प्राण्याने एखाद्यावर हल्ला केल्यास तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी गाडीचा उपयोग होईल. वन संरक्षणासाठी या गाड्या महत्त्वाची भूमिका बजावणार असून शिकार व तस्करीतही निश्चितच घट होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)