शहरं
Join us  
Trending Stories
1
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
2
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
3
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
4
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
5
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
6
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
7
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
8
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
9
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
10
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
11
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
12
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
13
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
14
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
15
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
16
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
17
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
18
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतक झळकावणाऱ्या टॉप ५ महिला क्रिकेटपटू!
19
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
20
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल

नागरिकता कायद्याविरोधात शेकडो महिला रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 06:00 IST

आंदोलनकर्त्यांनी निवेदनातून नागरिकता संशोधन विधेयक वर राष्ट्रपतीच्या सह्या झाल्याने त्याचे आता कायद्यात रूपांतर झाले आहे. हा नवा कायदा भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. कलम १४ आणि १५ हा भारतीय घटनेचा आत्मा आहे. शासनाने त्या आत्म्यावर घाला घातला आहे. हा सुधारीत कायदा म्हणजे भारतातील धर्मनिरपेक्ष एकजूटीवर हल्ला आहे.

ठळक मुद्देकायदा रद्द करा : निर्वासित कॅम्प बंद करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : केंद्र्र शासनाने लागू केलेल्या नागरिकता संशोधन विधेयका विरोधात येथील शेकडो महिलांनी मंगळवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून रोष व्यक्त केला. यावेळी सदर कायदे रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रपती यांच्याकडे पाठविण्यात आले. तहसीलदार श्रीराम मुंदडा यांनी सदर निवेदन स्वीकारले. येथील डॉ. आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरूवात झाली. सदर मोर्चा शहरात फिरून उपविभागीय कार्यालयावर गेला. केंद्र शासनाने एनआरसी , एनपीआर, सीएए कायदा रद्द करावा, भारतातील रिटेन्शन कॅम्पला तातडीने बंद करावे, जेएनयु विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आंदोलनकर्त्यांनी निवेदनातून नागरिकता संशोधन विधेयक वर राष्ट्रपतीच्या सह्या झाल्याने त्याचे आता कायद्यात रूपांतर झाले आहे. हा नवा कायदा भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. कलम १४ आणि १५ हा भारतीय घटनेचा आत्मा आहे. शासनाने त्या आत्म्यावर घाला घातला आहे. हा सुधारीत कायदा म्हणजे भारतातील धर्मनिरपेक्ष एकजूटीवर हल्ला आहे. भारत एक पुरोगामी देश असून छत्रपती शिवराय, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांच्या परंपरेत हा देश घडलेला आहे. शासनाने लागू केलेले कायदे तातडीने मागे घ्यावे तसेच भारत सरकारने संपूर्ण देशात निर्वासीत शिबीर बांधायला सुरुवात केलेली आहे, नागरिकत्वाचे पुरावे नाहीत म्हणून मातीशी इमान राखणाऱ्या मुसलमान, आदिवासी भटके विमुक्त आणि धर्म नसलेल्यांना लोकांना निर्वासीत शिबीरामध्ये कोंबणे अमानवी आहे. प्रत्येक जिल्ह्यात आणि मोठ्या शहरात असे निर्वासीत शिबीर बांधण्याच्या सूचना भारत सरकारने दिली आहे. सदर निर्वासीत शिबीर रद्द करावेत आणि ते बांधलेले असल्यास पाडण्यात यावे आणि नागरिकता संशोधन विधेयक त्वरित खारीज करावे, अशी मागणी करण्यात आली. मोर्चात अ‍ॅड. शाहिद मोहम्मद कयूम, अ‍ॅड. जेहारुषा हेमंत पीटर, अ‍ॅड. तस्नीम निसार अहमद, अ‍ॅड. रेश्मा शेख, सिमा मेश्राम, शीला बोरकर, हिना आरिफ खान, नंदा राजू तिमांडे, सफिया कुरेशी, रूपाली निमकर, निर्मला भोंगाडे, बबीता वाघमारे, कनीज फातेमा मिर्झा परवेश बेग,अनिज फातेमा सलाउद्दीन, मालती माउस्कर, जमशेद बानो अब्दुल सलीम, शमीम बानो शेख सलीम , अनिसा खातून मोहम्मद रफीक यांच्यासह शेकडो महिलांचा सहभाग होता.आठ दिवसांपासून आंदोलनदिल्ली येथील शाहीनबागच्या धर्तीवर केंद्र सरकारच्या नागरीकता संशोधन विधेयकाचा निषेध करण्यासाठी मागील आठ दिवसांपासून स्थानिक आंबेडकर चौकात महिला सायंकाळी एकत्रीत येवून ठिय्या देत आहे. केंद्र सरकारच्या निषेधाचे फलक झळकावित आहे.

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी