शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

पंतप्रधान आवास योजनेच्या हप्त्याअभावी शेकडो घरे अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 05:00 IST

कोरोना संकटाने आर्थिक संकट ओढवले. हाताची कामे गेल्याने बेरोजगारीची कुºहाड कोसळली. अशाही परिस्थितीत गाठीशी असलेला पैसा खर्च करुन घराची कामे पूर्ण केली. काहींची कामे अर्धवट राहिली असून आज ना उद्या घरकुलाचे हप्ते मिळेल, अशी लाभार्थ्यांना अपेक्षा होती. मात्र, वर्ष निघून गेले पण हप्ता मिळाला नाही. 

ठळक मुद्देलाभार्थ्यांमध्ये रोष : आर्वी शहरात २ हजार १२३ लाभार्थी

  लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : सर्वांसाठी घरे, या सकंल्पनेतून पंधप्रधान आवास योजना राबविण्यात आली. मात्र, बारा महिन्यांचा कालावधी लोटूनही लाभार्थ्यांना अद्याप अर्धे हप्ते न मिळाल्याने त्यांची घरे अर्धवट राहिली असून ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशीच अवस्था झाल्याने रोष व्यक्त होत आहे.   कोरोना संकटाने आर्थिक संकट ओढवले. हाताची कामे गेल्याने बेरोजगारीची कुºहाड कोसळली. अशाही परिस्थितीत गाठीशी असलेला पैसा खर्च करुन घराची कामे पूर्ण केली. काहींची कामे अर्धवट राहिली असून आज ना उद्या घरकुलाचे हप्ते मिळेल, अशी लाभार्थ्यांना अपेक्षा होती. मात्र, वर्ष निघून गेले पण हप्ता मिळाला नाही. शासनाकडून घरकुल मंजूर झाल्याने आपली जीर्ण झालेली घरे पाडून आवास योजनेसाठी नवीन घरे बांधायला सुरुवात केली. अनेकांनी किरायाच्या घरी राहून घरकुलाच्या कामाला सुरुवात केली. उसनवारीने पैसे घेऊन अनेकांनी घराचे बांधकाम पूर्णत्वास नेले. पण, आता हप्ते मिळाले नसल्याने घरकुलाचे बांधकाम थांबले आहे. एकीकडे घर बांधकामाची चिंता आणि दुसरीकडे घरभाड्याचा भार यामुळे लाभार्थी आता आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. अनेकदा नगरपालिकेत विचारणा केल्यावरही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे.

सहा टप्प्यात मिळतोय निधीयोजनेअंतर्गत केंद्र शासन व राज्य शासना मिळून २ लाख ५० हजार रुपये लाभार्थ्यांना देतात. त्यामध्ये राज्य शासनाकडून मिळणाऱ्या १ लाख रुपयांतून पहिल्या टप्प्यात ४० टक्के, दुसऱ्या टप्प्यात ४० टक्के तर तिसऱ्या टप्प्यात २० टक्के रक्कम दिली जाते. तर केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या दीड लाखांतून पहिल्या टप्प्यात ६० टक्के, दुसऱ्या ६० तर तिसऱ्या टप्प्यात २० टक्के निधी दिला जातो.अशा एकूण सहा टप्प्यात लाभार्थ्यांला निधी वितरित केला जातो.

केंद्र व राज्य शासनाकडून आलेल्या निधीचे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले आहे. पण उर्वरित निधी आलाच नसल्याने लाभार्थ्यांना कसा देणार? लाभार्थी अनेकदा विचारतात. त्यांना निधी आल्यावर मिळेल असे सांगितले जाते. तसा बाहेर फलकही लावण्यात आला आहे. आम्ही निधीची मागणी केली असून सतत पाठपुरावा करीत आहोत. साकेत राऊत,अभियंता, नगरपरिषद आर्वी 

नगरपालिकेला निधी प्रतीक्षा आर्वी नगरपालिका अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १ हजार १२९ घरे पहिल्यांदा मंजूर झाली. त्यात राज्य सरकारचे ९०३.०२ लाख निधी उपलब्ध झाला होता. तो तीन टप्प्यात लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला.  तर केंद्र शासनाकडून आलेला ६७७.०४ लाख रुपयांचा निधी दोन टप्प्यात लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला. मात्र तीस हजाराचा केंद्र शासनाचा निधी अद्यापही नगरपालिकेला मिळाला नाही. दुसºया टप्प्यात १ हजार ४ घरे मंजूर करण्यात आली. यात राज्य शासनाचा ४०१.०६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याने दोन टप्प्यात ४०-४० टक्के निधी लाभार्थ्यांना वितरित केला. यातील वीस हजारांचा हप्ता राज्य शासनाने पाठविला नाही.  तसेच केंद्र शासनाने तिनही हप्ते पालिकेका पाठविले नाहीत.

मागील एक वर्षांपासून आम्हाला आवास योजनेचे पैसे मिळाले नाही. त्यामुळे मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. जुने  घर पाडून आम्ही नवीन घर बांधायला सुरुवात केली आहे. राहण्याची अडचण असल्याने किरायाच्या घरात राहतो. आता किराया किती दिवस भरणार, त्याचे पैसे कोण देणार.राजू अंभोरे,लाभार्थी, श्रीराम वॉर्ड

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना