शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

विज्ञान युगात मानवी मूल्यांचा ऱ्हास होऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 23:36 IST

महात्मा गांधीजींनी शिक्षणामध्ये आत्म्याच्या विकासाला खूप महत्त्व दिले आहे. त्यामुळे त्यांनी वर्ध्यात बुनियादी शिक्षण पद्धतीची सुरुवात केली. आजच्या आधुनिक युगात माणसाने संगणकाच्या वेगाची कास धरावी परंतु मानवी मूल्ये व माणुसकी जपून चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन गांधी विचार संस्कार परीक्षा प्रमुख भुजंगराव बोबडे यांनी केले.

ठळक मुद्देभुजंगराव बोबडे : गांधी विचार संस्कार परीक्षेचे बक्षीस वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधीजींनी शिक्षणामध्ये आत्म्याच्या विकासाला खूप महत्त्व दिले आहे. त्यामुळे त्यांनी वर्ध्यात बुनियादी शिक्षण पद्धतीची सुरुवात केली. आजच्या आधुनिक युगात माणसाने संगणकाच्या वेगाची कास धरावी परंतु मानवी मूल्ये व माणुसकी जपून चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन गांधी विचार संस्कार परीक्षा प्रमुख भुजंगराव बोबडे यांनी केले.गांधी रिसर्च फाऊंडेशन जगळगाव व्दारा जिल्हास्तरीय गांधी विचार संस्कार परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय, पिपरी (मेघे) येथे पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना बोबडे बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुरेश पवार तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. भगवान जक्कुलवार आणि समन्वयक डॉ. अजय किनखेडकर उपस्थित होते.महात्मा गांधीजींच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘वैष्णव जन तो’ हे भजन सादर केले. संरचनात्मक विधायक कामाकरिता निर्माण होणारी युवा शक्ती विनाशाकडे वळत आहे. आपण पदव्यांची भेंडोळी हातात घेतो त्यामुळे शिक्षकावर खूप मोठी जबाबदारी आली आहे. शिक्षकाने आईच्या स्तरावर असले पाहिजे. आपल्या संशोधन व ज्ञानाचा फायदा समाजाला झाला पाहिजे. तसेच शिवाजी महाराज, महत्मा गांधी, स्वामी विवेकानंद या सारख्या महापुरुषांचे एक तरी गुण आपल्या अंगी उतरवावा, असा मौलिक सल्लाही भुजंगराव बोबडे यांनी दिला.जगाचा शास्वत विचार साधावयाचा असेल तर गांधीजींनी दाखविलेल्या मार्गानेच तो शक्य आहे. आज अनेक देशामध्ये विविध कोर्सेसव्दारे गांधीजींच्या मूल्यांचा अभ्यास करण्यात येत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जीवनमूल्यांचा प्रसाद करुन भावी पिढ्यांना संस्कारीत करण्याकरिता या परीक्षेचे आयोजन केले जाते, असे मत प्रा. भगवान जक्कुलवार यांनी मांडले.तसेच कार्यक्रमादरम्यान उपप्राचार्य प्रा. सुरेश पवार यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गांधी विचार संस्कार परीक्षेचे समन्वयक डॉ. अजय किनखेडकर यांनी केले. शुभम उमाटे, गायत्री काकडे आणि सारीका तेलगोटे यांनी परीक्षेबाबत आपले अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. पी. बी. बैस यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. राजेंद्र वरकल यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयातून शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले.अकरा वर्षात विदेशातही रोवले पायराष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जीवनमूल्यांचा प्रसाद करण्याच्या उद्देशाने २००७ मध्ये गांधी विचार संस्कार परीक्षा सुरु केली. प्रारंभी फक्त जळगाव जिल्ह्यासाठीच ही परीक्षा घेण्यात आली. त्यावेळी ४ हजार ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आता ही परीक्षा आठ राज्यातसोबतच जपान, अमेरिका व फ्रान्स या देशातही घेतली जाते. यावर्षी या परीक्षेकरिता चार लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, जिल्हाधिकारी व तहसीलदार सहभागी झाले होते.