शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान युगात मानवी मूल्यांचा ऱ्हास होऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 23:36 IST

महात्मा गांधीजींनी शिक्षणामध्ये आत्म्याच्या विकासाला खूप महत्त्व दिले आहे. त्यामुळे त्यांनी वर्ध्यात बुनियादी शिक्षण पद्धतीची सुरुवात केली. आजच्या आधुनिक युगात माणसाने संगणकाच्या वेगाची कास धरावी परंतु मानवी मूल्ये व माणुसकी जपून चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन गांधी विचार संस्कार परीक्षा प्रमुख भुजंगराव बोबडे यांनी केले.

ठळक मुद्देभुजंगराव बोबडे : गांधी विचार संस्कार परीक्षेचे बक्षीस वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधीजींनी शिक्षणामध्ये आत्म्याच्या विकासाला खूप महत्त्व दिले आहे. त्यामुळे त्यांनी वर्ध्यात बुनियादी शिक्षण पद्धतीची सुरुवात केली. आजच्या आधुनिक युगात माणसाने संगणकाच्या वेगाची कास धरावी परंतु मानवी मूल्ये व माणुसकी जपून चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन गांधी विचार संस्कार परीक्षा प्रमुख भुजंगराव बोबडे यांनी केले.गांधी रिसर्च फाऊंडेशन जगळगाव व्दारा जिल्हास्तरीय गांधी विचार संस्कार परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय, पिपरी (मेघे) येथे पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना बोबडे बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुरेश पवार तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. भगवान जक्कुलवार आणि समन्वयक डॉ. अजय किनखेडकर उपस्थित होते.महात्मा गांधीजींच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘वैष्णव जन तो’ हे भजन सादर केले. संरचनात्मक विधायक कामाकरिता निर्माण होणारी युवा शक्ती विनाशाकडे वळत आहे. आपण पदव्यांची भेंडोळी हातात घेतो त्यामुळे शिक्षकावर खूप मोठी जबाबदारी आली आहे. शिक्षकाने आईच्या स्तरावर असले पाहिजे. आपल्या संशोधन व ज्ञानाचा फायदा समाजाला झाला पाहिजे. तसेच शिवाजी महाराज, महत्मा गांधी, स्वामी विवेकानंद या सारख्या महापुरुषांचे एक तरी गुण आपल्या अंगी उतरवावा, असा मौलिक सल्लाही भुजंगराव बोबडे यांनी दिला.जगाचा शास्वत विचार साधावयाचा असेल तर गांधीजींनी दाखविलेल्या मार्गानेच तो शक्य आहे. आज अनेक देशामध्ये विविध कोर्सेसव्दारे गांधीजींच्या मूल्यांचा अभ्यास करण्यात येत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जीवनमूल्यांचा प्रसाद करुन भावी पिढ्यांना संस्कारीत करण्याकरिता या परीक्षेचे आयोजन केले जाते, असे मत प्रा. भगवान जक्कुलवार यांनी मांडले.तसेच कार्यक्रमादरम्यान उपप्राचार्य प्रा. सुरेश पवार यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गांधी विचार संस्कार परीक्षेचे समन्वयक डॉ. अजय किनखेडकर यांनी केले. शुभम उमाटे, गायत्री काकडे आणि सारीका तेलगोटे यांनी परीक्षेबाबत आपले अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. पी. बी. बैस यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. राजेंद्र वरकल यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयातून शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले.अकरा वर्षात विदेशातही रोवले पायराष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जीवनमूल्यांचा प्रसाद करण्याच्या उद्देशाने २००७ मध्ये गांधी विचार संस्कार परीक्षा सुरु केली. प्रारंभी फक्त जळगाव जिल्ह्यासाठीच ही परीक्षा घेण्यात आली. त्यावेळी ४ हजार ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आता ही परीक्षा आठ राज्यातसोबतच जपान, अमेरिका व फ्रान्स या देशातही घेतली जाते. यावर्षी या परीक्षेकरिता चार लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, जिल्हाधिकारी व तहसीलदार सहभागी झाले होते.