शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
4
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
5
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
6
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
7
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
8
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
9
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
10
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
11
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
12
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
13
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
14
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
15
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
16
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
17
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
18
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
19
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
20
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका

विज्ञान युगात मानवी मूल्यांचा ऱ्हास होऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 23:36 IST

महात्मा गांधीजींनी शिक्षणामध्ये आत्म्याच्या विकासाला खूप महत्त्व दिले आहे. त्यामुळे त्यांनी वर्ध्यात बुनियादी शिक्षण पद्धतीची सुरुवात केली. आजच्या आधुनिक युगात माणसाने संगणकाच्या वेगाची कास धरावी परंतु मानवी मूल्ये व माणुसकी जपून चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन गांधी विचार संस्कार परीक्षा प्रमुख भुजंगराव बोबडे यांनी केले.

ठळक मुद्देभुजंगराव बोबडे : गांधी विचार संस्कार परीक्षेचे बक्षीस वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधीजींनी शिक्षणामध्ये आत्म्याच्या विकासाला खूप महत्त्व दिले आहे. त्यामुळे त्यांनी वर्ध्यात बुनियादी शिक्षण पद्धतीची सुरुवात केली. आजच्या आधुनिक युगात माणसाने संगणकाच्या वेगाची कास धरावी परंतु मानवी मूल्ये व माणुसकी जपून चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन गांधी विचार संस्कार परीक्षा प्रमुख भुजंगराव बोबडे यांनी केले.गांधी रिसर्च फाऊंडेशन जगळगाव व्दारा जिल्हास्तरीय गांधी विचार संस्कार परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय, पिपरी (मेघे) येथे पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना बोबडे बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुरेश पवार तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. भगवान जक्कुलवार आणि समन्वयक डॉ. अजय किनखेडकर उपस्थित होते.महात्मा गांधीजींच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘वैष्णव जन तो’ हे भजन सादर केले. संरचनात्मक विधायक कामाकरिता निर्माण होणारी युवा शक्ती विनाशाकडे वळत आहे. आपण पदव्यांची भेंडोळी हातात घेतो त्यामुळे शिक्षकावर खूप मोठी जबाबदारी आली आहे. शिक्षकाने आईच्या स्तरावर असले पाहिजे. आपल्या संशोधन व ज्ञानाचा फायदा समाजाला झाला पाहिजे. तसेच शिवाजी महाराज, महत्मा गांधी, स्वामी विवेकानंद या सारख्या महापुरुषांचे एक तरी गुण आपल्या अंगी उतरवावा, असा मौलिक सल्लाही भुजंगराव बोबडे यांनी दिला.जगाचा शास्वत विचार साधावयाचा असेल तर गांधीजींनी दाखविलेल्या मार्गानेच तो शक्य आहे. आज अनेक देशामध्ये विविध कोर्सेसव्दारे गांधीजींच्या मूल्यांचा अभ्यास करण्यात येत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जीवनमूल्यांचा प्रसाद करुन भावी पिढ्यांना संस्कारीत करण्याकरिता या परीक्षेचे आयोजन केले जाते, असे मत प्रा. भगवान जक्कुलवार यांनी मांडले.तसेच कार्यक्रमादरम्यान उपप्राचार्य प्रा. सुरेश पवार यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गांधी विचार संस्कार परीक्षेचे समन्वयक डॉ. अजय किनखेडकर यांनी केले. शुभम उमाटे, गायत्री काकडे आणि सारीका तेलगोटे यांनी परीक्षेबाबत आपले अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. पी. बी. बैस यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. राजेंद्र वरकल यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयातून शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले.अकरा वर्षात विदेशातही रोवले पायराष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जीवनमूल्यांचा प्रसाद करण्याच्या उद्देशाने २००७ मध्ये गांधी विचार संस्कार परीक्षा सुरु केली. प्रारंभी फक्त जळगाव जिल्ह्यासाठीच ही परीक्षा घेण्यात आली. त्यावेळी ४ हजार ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आता ही परीक्षा आठ राज्यातसोबतच जपान, अमेरिका व फ्रान्स या देशातही घेतली जाते. यावर्षी या परीक्षेकरिता चार लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, जिल्हाधिकारी व तहसीलदार सहभागी झाले होते.