शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पीक अन् भावही कमी, सांगा जगावे तरी कसे!

By admin | Updated: November 22, 2014 23:05 IST

सोयाबीनची नापिकी, कपाशीवर आलेला रोग, अशात निघालेल्या उत्पन्नाला मिळणारा अत्यल्प दर, अशातच उभ्या असलेल्या पिकांवरही वाढता रोगाचा प्रभाव त्यातच सावकाराचे वाढते कर्ज,

काढणीचाही खर्च निघत नसल्याने सोयाबीन शेतातच वखरलेवर्धा : सोयाबीनची नापिकी, कपाशीवर आलेला रोग, अशात निघालेल्या उत्पन्नाला मिळणारा अत्यल्प दर, अशातच उभ्या असलेल्या पिकांवरही वाढता रोगाचा प्रभाव त्यातच सावकाराचे वाढते कर्ज, अशा बिकट स्थितीत जगावे तरी कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. खरीपाची ही स्थिती लक्षात घेवून शासनाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला दर देण्याची अपेक्षाही धूसरच असल्याचे चित्र आहे. पूर्वी पावसाने मारलेल्या दडीमुळे पेरण्या मोडकळीस आल्या. यात आशेवर असलेल्या शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. तिही उगविली नाही. पुन्हा कर्ज घेऊन तिबार पेरणी केली. ती कशीबशी उगविली; मात्र उशिर झाल्याने उत्पन्नाची आशा राहिली नाही. काही भागात सोयाबीन उगविले, त्याची वाढच झाली नाही. तीन महिन्यांच्या कालावधीचे हे पीक असल्याने दिवाळीच्या पूर्वी ते निघण्याची वेळ आली. अशात सोयाबीनची वाढ झाली नसल्याने शेतकऱ्यांनी त्याची सवंगणी करण्याचे टाळले. काहींनी हिंमत करून सोयाबीनची कापणी केली. यात सोयाबीनचा दाना ज्वारीसारखा झाला. हा दाना पाहून शेतकऱ्यांची आशा मावळली. उत्पन्न निघणार नसल्याचे लक्षात येताच काही गावातील शेतकऱ्यांनी सवंगणी करण्यापेक्षा त्याची वखरणी करण्याचा निर्णय घेतला. हिच स्थिती कपाशीची झाली. उन्ह पावसाच्या खेळात कपाशीवर पहिले मर रोग, नंतर लाल्याचा हल्ला झाला. यात उत्पन्न होणार नसल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी लावला. दिवाळी झाली तरी बाजारात कपाशीचे बोंड आले नाही. यामुळे यंदाच्या सत्रात कपाशीचे उत्पन्न कमी होणार हा अंदाज व्यापाऱ्यांना आला. त्यांनी याचवेळी शेतकऱ्यांची लुट करण्याचा निर्णय घेतला. अशात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिल असे वाटत असताना तसे झाले नाही. शासनाने जाहीर केलेला हमीभाव त्याच्याकरिता अत्यल्प ठरला. या हमीभावानुसार खरेदी होईल असे वाटत असताना कापूस खरेदी करणाऱ्या शासनाच्या एजन्सींनी शेतकऱ्यांना धोकाच दिला. त्यांच्याकडूनही अत्यल्प दरात कपाशीची खरेदी होवू लागली. यात शेतकऱ्यांची चहूबाजूंनी कोंडी झाली. अशात बऱ्याच गावाची आणेवारी ५० च्या आत आल्याने मदतीची आशा वाढली, एवढेच यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या बाजूने झाले.