शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पीक अन् भावही कमी, सांगा जगावे तरी कसे!

By admin | Updated: November 22, 2014 23:05 IST

सोयाबीनची नापिकी, कपाशीवर आलेला रोग, अशात निघालेल्या उत्पन्नाला मिळणारा अत्यल्प दर, अशातच उभ्या असलेल्या पिकांवरही वाढता रोगाचा प्रभाव त्यातच सावकाराचे वाढते कर्ज,

काढणीचाही खर्च निघत नसल्याने सोयाबीन शेतातच वखरलेवर्धा : सोयाबीनची नापिकी, कपाशीवर आलेला रोग, अशात निघालेल्या उत्पन्नाला मिळणारा अत्यल्प दर, अशातच उभ्या असलेल्या पिकांवरही वाढता रोगाचा प्रभाव त्यातच सावकाराचे वाढते कर्ज, अशा बिकट स्थितीत जगावे तरी कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. खरीपाची ही स्थिती लक्षात घेवून शासनाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला दर देण्याची अपेक्षाही धूसरच असल्याचे चित्र आहे. पूर्वी पावसाने मारलेल्या दडीमुळे पेरण्या मोडकळीस आल्या. यात आशेवर असलेल्या शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. तिही उगविली नाही. पुन्हा कर्ज घेऊन तिबार पेरणी केली. ती कशीबशी उगविली; मात्र उशिर झाल्याने उत्पन्नाची आशा राहिली नाही. काही भागात सोयाबीन उगविले, त्याची वाढच झाली नाही. तीन महिन्यांच्या कालावधीचे हे पीक असल्याने दिवाळीच्या पूर्वी ते निघण्याची वेळ आली. अशात सोयाबीनची वाढ झाली नसल्याने शेतकऱ्यांनी त्याची सवंगणी करण्याचे टाळले. काहींनी हिंमत करून सोयाबीनची कापणी केली. यात सोयाबीनचा दाना ज्वारीसारखा झाला. हा दाना पाहून शेतकऱ्यांची आशा मावळली. उत्पन्न निघणार नसल्याचे लक्षात येताच काही गावातील शेतकऱ्यांनी सवंगणी करण्यापेक्षा त्याची वखरणी करण्याचा निर्णय घेतला. हिच स्थिती कपाशीची झाली. उन्ह पावसाच्या खेळात कपाशीवर पहिले मर रोग, नंतर लाल्याचा हल्ला झाला. यात उत्पन्न होणार नसल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी लावला. दिवाळी झाली तरी बाजारात कपाशीचे बोंड आले नाही. यामुळे यंदाच्या सत्रात कपाशीचे उत्पन्न कमी होणार हा अंदाज व्यापाऱ्यांना आला. त्यांनी याचवेळी शेतकऱ्यांची लुट करण्याचा निर्णय घेतला. अशात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिल असे वाटत असताना तसे झाले नाही. शासनाने जाहीर केलेला हमीभाव त्याच्याकरिता अत्यल्प ठरला. या हमीभावानुसार खरेदी होईल असे वाटत असताना कापूस खरेदी करणाऱ्या शासनाच्या एजन्सींनी शेतकऱ्यांना धोकाच दिला. त्यांच्याकडूनही अत्यल्प दरात कपाशीची खरेदी होवू लागली. यात शेतकऱ्यांची चहूबाजूंनी कोंडी झाली. अशात बऱ्याच गावाची आणेवारी ५० च्या आत आल्याने मदतीची आशा वाढली, एवढेच यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या बाजूने झाले.