शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
3
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
4
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
5
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
6
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
7
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!
8
Viral Video: हत्तीला पाहून सिंह मंडळींची 'हवा टाइट'... झाडाखाली बसले असताना काय घडलं, पाहा
9
थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
10
Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले...
11
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी
12
Rohit Arya: रोहित आर्याला मी वेगळे पैसे दिलेले, सरकारी बिलाशी संबंध नाही; दीपक केसरकरांची सारवासारव
13
प्रेयसीचा शो पाहण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे सरकारी विमान वापरलं; काश पटेल वादाच्या भोवऱ्यात
14
कंडोम बनवणाऱ्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; 2 महिन्यातच दिला बंपर परतावा!
15
तेलंगणामध्ये मोंथा वादळाचा कहर, १२ जणांचा मृत्यू; मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी, रस्तेही बंद
16
कोणता झेंडा घेऊ हाती अशी मनसैनिकांची अवस्था, राज ठाकरे कन्फ्यूज नेते; शिंदेसेनेची बोचरी टीका
17
Lenskart IPO: महागडा आहे का लेन्सकार्टचा आयपीओ? व्हॅल्यूएशनवरुन उपस्थित होताहेत प्रश्न, एक्सपर्ट म्हणाले...
18
अँड्रॉइड की अ‍ॅपल, मोबाईल घोटाळे रोखण्यात कोणती सिस्टीम चांगली? गुगलने केला धक्कादायक खुलासा
19
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
20
सौदी अरेबिया फिफा विश्वचषकासाठी बांधणार 'स्काय स्टेडियम'; व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा?

‘व्हायरल फ्ल्यू’ने रुग्णालये फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:11 IST

वातावरणातील बदल व अत्यल्प पावसामुळे सध्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ढगाळ वातावरण तथा ठिकठिकाणी वाढणारा डासांचा प्रादुर्भाव आदींमुळे सध्या व्हायरल फ्ल्यूचे रुग्ण जिल्ह्यातील प्रत्येक गावात आढळून येत आहेत.

ठळक मुद्देखासगी दवाखान्यांत बालरुग्णांची गर्दी : औषधोपचारासाठी लागतात रुग्णांच्या रांगा

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वातावरणातील बदल व अत्यल्प पावसामुळे सध्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ढगाळ वातावरण तथा ठिकठिकाणी वाढणारा डासांचा प्रादुर्भाव आदींमुळे सध्या व्हायरल फ्ल्यूचे रुग्ण जिल्ह्यातील प्रत्येक गावात आढळून येत आहेत. विविध आजारांची लागण झालेले नागरिक रुग्णालयांमध्ये एकच गर्दी करीत असल्याने रुग्णालयेही फुल्ल झाली आहेत. विविध आजारांपासून बचावासाठी नागरिकांनी दक्ष राहून परिसर आणि स्वत:ची स्वच्छता हा फॉर्म्यूला वापरावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.१ हजार १२६ तापाचे रुग्णपावसाचे पाणी छतावर, तुटलेल्या मातीच्या व इतर भांड्यात आदी ठिकाणी साचते. शिवाय रिकाम्या प्लॉटवरही पावसाचे पाणी साचते. सदर ठिकाणांसह विविध ठिकाणी साचणाºया पाण्यात झपाट्याने डासांची निर्मिती होते. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया आदी आजार होतात. चार महिन्यांत जिल्ह्यातील १ हजार १२६ नागरिकांना तापाची लागण झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. विविध आजारांपासून बचावासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन समाजातील विविध स्तरातून करण्यात येत आहे.सहा फुटाचे ठेवावे अंतरव्हायरल फ्ल्यू झालेल्या रुग्णाने शक्यतोवर आठ दिवस घरीच विश्रांती घ्यावी. त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना तोंडाला रूमाल बांधून जावे. व्हायरल फ्ल्यूची लागण झालेल्या व्यक्तीपासून इतर नागरिकांनी किमान सहा फुटाचे अंतर ठेवावे. शिवाय हस्तांदोलन करण्याचेही टाळावे. या लहान-लहान गोष्टी नागरिकांनी केल्यास व्हायरल फ्ल्यूच्या होणाºया झपाट्याने प्रसाराला आळा बसेल.२ हजार ३८९ रुग्णांच्या थुंकीचे नमूनेवर्धा जिल्ह्यातील अनेक नागरिक विविध कामानिमित्त नागपूर येथे दररोज ये-जा करतात. नागपूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये सध्या स्वाईन फ्ल्यूचे लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शेजारच्या जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू हा आजार येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील चार महिन्यांत स्वाईन फ्ल्यू सदृश्य लक्षणे आढळलेल्या २ हजार ३८९ रुग्णांच्या थुंकीचे नमूने तपासणीकरिता घेण्यात आले. यापैकी दोन व्यक्ती संशयित असल्याचे लक्षात येताच पुढील तपासणीकरिता नमूने पूणे येथे पाठविण्यात आले आहेत.डायरियाच्या ६४१ रुग्णांची नोंदअशुद्ध पाणी व उघड्यावरील खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने डायरिया या आजाराची लागण होते. पावसाळ्याच्या दिवसांत सदर आजाराची लागण झालेले रुग्ण सर्वाधिक आढळून येतात. मागील चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ६४१ नागरिकांना डायरियाची लागण झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. वेळोवळी वातावरणात बदल होत असल्याने नागरिकांनी योग्य दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.वातावरणातील बदलामुळे सध्या अनेक आजारांनी डोके वर काढले आहे. विविध आजारांच्या बचावासाठी नागरिकांनी स्व:स्वच्छता आणि परिसर स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. पाणी साचून डासांची निर्मिती होणार नाही, याची दक्षता नागरिकांनी घेतली पाहिजे. सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळण्यासह अन्य लहान-सहान बाबी नागरिकांनी केल्या पाहिजेत. नागरिकांना योग्य आरोग्य सेवा देण्याचे प्रयत्न आम्ही करीत असून नागरिकांनीही दक्ष राहण्याची गरज आहे.- डॉ. निवृत्ती राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.