शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

‘व्हायरल फ्ल्यू’ने रुग्णालये फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:11 IST

वातावरणातील बदल व अत्यल्प पावसामुळे सध्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ढगाळ वातावरण तथा ठिकठिकाणी वाढणारा डासांचा प्रादुर्भाव आदींमुळे सध्या व्हायरल फ्ल्यूचे रुग्ण जिल्ह्यातील प्रत्येक गावात आढळून येत आहेत.

ठळक मुद्देखासगी दवाखान्यांत बालरुग्णांची गर्दी : औषधोपचारासाठी लागतात रुग्णांच्या रांगा

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वातावरणातील बदल व अत्यल्प पावसामुळे सध्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ढगाळ वातावरण तथा ठिकठिकाणी वाढणारा डासांचा प्रादुर्भाव आदींमुळे सध्या व्हायरल फ्ल्यूचे रुग्ण जिल्ह्यातील प्रत्येक गावात आढळून येत आहेत. विविध आजारांची लागण झालेले नागरिक रुग्णालयांमध्ये एकच गर्दी करीत असल्याने रुग्णालयेही फुल्ल झाली आहेत. विविध आजारांपासून बचावासाठी नागरिकांनी दक्ष राहून परिसर आणि स्वत:ची स्वच्छता हा फॉर्म्यूला वापरावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.१ हजार १२६ तापाचे रुग्णपावसाचे पाणी छतावर, तुटलेल्या मातीच्या व इतर भांड्यात आदी ठिकाणी साचते. शिवाय रिकाम्या प्लॉटवरही पावसाचे पाणी साचते. सदर ठिकाणांसह विविध ठिकाणी साचणाºया पाण्यात झपाट्याने डासांची निर्मिती होते. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया आदी आजार होतात. चार महिन्यांत जिल्ह्यातील १ हजार १२६ नागरिकांना तापाची लागण झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. विविध आजारांपासून बचावासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन समाजातील विविध स्तरातून करण्यात येत आहे.सहा फुटाचे ठेवावे अंतरव्हायरल फ्ल्यू झालेल्या रुग्णाने शक्यतोवर आठ दिवस घरीच विश्रांती घ्यावी. त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना तोंडाला रूमाल बांधून जावे. व्हायरल फ्ल्यूची लागण झालेल्या व्यक्तीपासून इतर नागरिकांनी किमान सहा फुटाचे अंतर ठेवावे. शिवाय हस्तांदोलन करण्याचेही टाळावे. या लहान-लहान गोष्टी नागरिकांनी केल्यास व्हायरल फ्ल्यूच्या होणाºया झपाट्याने प्रसाराला आळा बसेल.२ हजार ३८९ रुग्णांच्या थुंकीचे नमूनेवर्धा जिल्ह्यातील अनेक नागरिक विविध कामानिमित्त नागपूर येथे दररोज ये-जा करतात. नागपूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये सध्या स्वाईन फ्ल्यूचे लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शेजारच्या जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू हा आजार येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील चार महिन्यांत स्वाईन फ्ल्यू सदृश्य लक्षणे आढळलेल्या २ हजार ३८९ रुग्णांच्या थुंकीचे नमूने तपासणीकरिता घेण्यात आले. यापैकी दोन व्यक्ती संशयित असल्याचे लक्षात येताच पुढील तपासणीकरिता नमूने पूणे येथे पाठविण्यात आले आहेत.डायरियाच्या ६४१ रुग्णांची नोंदअशुद्ध पाणी व उघड्यावरील खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने डायरिया या आजाराची लागण होते. पावसाळ्याच्या दिवसांत सदर आजाराची लागण झालेले रुग्ण सर्वाधिक आढळून येतात. मागील चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ६४१ नागरिकांना डायरियाची लागण झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. वेळोवळी वातावरणात बदल होत असल्याने नागरिकांनी योग्य दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.वातावरणातील बदलामुळे सध्या अनेक आजारांनी डोके वर काढले आहे. विविध आजारांच्या बचावासाठी नागरिकांनी स्व:स्वच्छता आणि परिसर स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. पाणी साचून डासांची निर्मिती होणार नाही, याची दक्षता नागरिकांनी घेतली पाहिजे. सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळण्यासह अन्य लहान-सहान बाबी नागरिकांनी केल्या पाहिजेत. नागरिकांना योग्य आरोग्य सेवा देण्याचे प्रयत्न आम्ही करीत असून नागरिकांनीही दक्ष राहण्याची गरज आहे.- डॉ. निवृत्ती राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.