शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘व्हायरल फ्ल्यू’ने रुग्णालये फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:11 IST

वातावरणातील बदल व अत्यल्प पावसामुळे सध्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ढगाळ वातावरण तथा ठिकठिकाणी वाढणारा डासांचा प्रादुर्भाव आदींमुळे सध्या व्हायरल फ्ल्यूचे रुग्ण जिल्ह्यातील प्रत्येक गावात आढळून येत आहेत.

ठळक मुद्देखासगी दवाखान्यांत बालरुग्णांची गर्दी : औषधोपचारासाठी लागतात रुग्णांच्या रांगा

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वातावरणातील बदल व अत्यल्प पावसामुळे सध्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ढगाळ वातावरण तथा ठिकठिकाणी वाढणारा डासांचा प्रादुर्भाव आदींमुळे सध्या व्हायरल फ्ल्यूचे रुग्ण जिल्ह्यातील प्रत्येक गावात आढळून येत आहेत. विविध आजारांची लागण झालेले नागरिक रुग्णालयांमध्ये एकच गर्दी करीत असल्याने रुग्णालयेही फुल्ल झाली आहेत. विविध आजारांपासून बचावासाठी नागरिकांनी दक्ष राहून परिसर आणि स्वत:ची स्वच्छता हा फॉर्म्यूला वापरावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.१ हजार १२६ तापाचे रुग्णपावसाचे पाणी छतावर, तुटलेल्या मातीच्या व इतर भांड्यात आदी ठिकाणी साचते. शिवाय रिकाम्या प्लॉटवरही पावसाचे पाणी साचते. सदर ठिकाणांसह विविध ठिकाणी साचणाºया पाण्यात झपाट्याने डासांची निर्मिती होते. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया आदी आजार होतात. चार महिन्यांत जिल्ह्यातील १ हजार १२६ नागरिकांना तापाची लागण झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. विविध आजारांपासून बचावासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन समाजातील विविध स्तरातून करण्यात येत आहे.सहा फुटाचे ठेवावे अंतरव्हायरल फ्ल्यू झालेल्या रुग्णाने शक्यतोवर आठ दिवस घरीच विश्रांती घ्यावी. त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना तोंडाला रूमाल बांधून जावे. व्हायरल फ्ल्यूची लागण झालेल्या व्यक्तीपासून इतर नागरिकांनी किमान सहा फुटाचे अंतर ठेवावे. शिवाय हस्तांदोलन करण्याचेही टाळावे. या लहान-लहान गोष्टी नागरिकांनी केल्यास व्हायरल फ्ल्यूच्या होणाºया झपाट्याने प्रसाराला आळा बसेल.२ हजार ३८९ रुग्णांच्या थुंकीचे नमूनेवर्धा जिल्ह्यातील अनेक नागरिक विविध कामानिमित्त नागपूर येथे दररोज ये-जा करतात. नागपूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये सध्या स्वाईन फ्ल्यूचे लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शेजारच्या जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू हा आजार येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील चार महिन्यांत स्वाईन फ्ल्यू सदृश्य लक्षणे आढळलेल्या २ हजार ३८९ रुग्णांच्या थुंकीचे नमूने तपासणीकरिता घेण्यात आले. यापैकी दोन व्यक्ती संशयित असल्याचे लक्षात येताच पुढील तपासणीकरिता नमूने पूणे येथे पाठविण्यात आले आहेत.डायरियाच्या ६४१ रुग्णांची नोंदअशुद्ध पाणी व उघड्यावरील खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने डायरिया या आजाराची लागण होते. पावसाळ्याच्या दिवसांत सदर आजाराची लागण झालेले रुग्ण सर्वाधिक आढळून येतात. मागील चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ६४१ नागरिकांना डायरियाची लागण झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. वेळोवळी वातावरणात बदल होत असल्याने नागरिकांनी योग्य दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.वातावरणातील बदलामुळे सध्या अनेक आजारांनी डोके वर काढले आहे. विविध आजारांच्या बचावासाठी नागरिकांनी स्व:स्वच्छता आणि परिसर स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. पाणी साचून डासांची निर्मिती होणार नाही, याची दक्षता नागरिकांनी घेतली पाहिजे. सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळण्यासह अन्य लहान-सहान बाबी नागरिकांनी केल्या पाहिजेत. नागरिकांना योग्य आरोग्य सेवा देण्याचे प्रयत्न आम्ही करीत असून नागरिकांनीही दक्ष राहण्याची गरज आहे.- डॉ. निवृत्ती राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.