शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

रेतीघाटांच्या लिलावाचा रंगणार घोडेबाजार

By admin | Updated: October 26, 2014 22:45 IST

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्याने मागील काही महिन्यांपासून अडकलेले रेती घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे़ जिल्हा प्रशासनाद्वारे लवकरच तशी तयारी केली जातणार

वर्धा : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्याने मागील काही महिन्यांपासून अडकलेले रेती घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे़ जिल्हा प्रशासनाद्वारे लवकरच तशी तयारी केली जातणार असल्याने आता वाळूघाट लिलावाचा घोडेबाजार चांगलाच रंगणार असल्याचे दिसते़ मागील वर्षी झालेल्या रेतीघाटांचे कंत्राट सप्टेंबर महिन्यात संपुष्टात आले़ याच काळात विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागल्याने नवीन कंत्राट देता आले नाहीत़ परिणामी, राज्यभरातील बांधकाम क्षेत्र अडचणीत आले आहे़ दरम्यानच्या काळात जिल्ह्यातील वाळूघाटांची यादी राज्य शासन व त्यांच्यामार्फत केंद्र शासनाच्या पर्यावरण समितीकडे पाठविण्यात आली आहे़ या समितीची परवानगी मिळताच जिल्ह्यातील घाटांची यादी पुन्हा जिल्हा प्रशासनाकडे पाठविली जाणार आहे़ यानंतर लिलावाची प्रक्रिया सुरू करता येणार आहे़ जिल्ह्यात वर्धा, यशोदा, धाम, बोर, वणा आदी मोठ्या नद्या आहे; पण यातील मोजक्या वाळूघाटांतूनच उपसा शक्य असल्याने भूजल सर्वेक्षण यंत्रणा (जीएसडीए) संपूर्ण रेतीघाटांची परवानगी देत नाही. परिणामी, त्यांनी नाकारलेल्या वाळूघाटांना वगळून तयार झालेली यादीच राज्य व तेथून पूढे केंद्राच्या अख्त्यारितील पर्यावरण समितीकडे जाते़वाळूघाटाच्या लिलावाचे धोरण गतवर्षीपासून आमूलाग्र बदलले आहे. उपसा किती प्रमाणात व्हावा, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहे़ त्यानुसारच स्थानिक पातळीवर जीएसडीए तर अंतिम स्तरावर केंद्रीय पर्यावरण समितीची परवानगी अनिवार्य केली आहे. या बदलांसोबतच दरवाढही गतवर्षीपासूनच करण्यात आली. यामुळे वर्धा जिल्ह्यातील काही घाटांचा लिलाव होऊ शकला नव्हता़ लिलाव करताना प्रारंभी जीएसडीए घाटांची पात्रता तपासते़ एकदा संख्या ठरली की, जिल्हाधिकारी घाटांची यादी राज्य पर्यावरण विभागाकडे व तेथून ती केंद्राकडे जाते. केंद्राच्या परवानगीनंतर पुन्हा यादी जिल्हा प्रशासनास प्राप्त होऊन प्रक्रिया सुरू होते़(कार्यालय प्रतिनिधी)