शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

रेतीघाटांच्या लिलावाचा रंगणार घोडेबाजार

By admin | Updated: October 26, 2014 22:45 IST

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्याने मागील काही महिन्यांपासून अडकलेले रेती घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे़ जिल्हा प्रशासनाद्वारे लवकरच तशी तयारी केली जातणार

वर्धा : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्याने मागील काही महिन्यांपासून अडकलेले रेती घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे़ जिल्हा प्रशासनाद्वारे लवकरच तशी तयारी केली जातणार असल्याने आता वाळूघाट लिलावाचा घोडेबाजार चांगलाच रंगणार असल्याचे दिसते़ मागील वर्षी झालेल्या रेतीघाटांचे कंत्राट सप्टेंबर महिन्यात संपुष्टात आले़ याच काळात विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागल्याने नवीन कंत्राट देता आले नाहीत़ परिणामी, राज्यभरातील बांधकाम क्षेत्र अडचणीत आले आहे़ दरम्यानच्या काळात जिल्ह्यातील वाळूघाटांची यादी राज्य शासन व त्यांच्यामार्फत केंद्र शासनाच्या पर्यावरण समितीकडे पाठविण्यात आली आहे़ या समितीची परवानगी मिळताच जिल्ह्यातील घाटांची यादी पुन्हा जिल्हा प्रशासनाकडे पाठविली जाणार आहे़ यानंतर लिलावाची प्रक्रिया सुरू करता येणार आहे़ जिल्ह्यात वर्धा, यशोदा, धाम, बोर, वणा आदी मोठ्या नद्या आहे; पण यातील मोजक्या वाळूघाटांतूनच उपसा शक्य असल्याने भूजल सर्वेक्षण यंत्रणा (जीएसडीए) संपूर्ण रेतीघाटांची परवानगी देत नाही. परिणामी, त्यांनी नाकारलेल्या वाळूघाटांना वगळून तयार झालेली यादीच राज्य व तेथून पूढे केंद्राच्या अख्त्यारितील पर्यावरण समितीकडे जाते़वाळूघाटाच्या लिलावाचे धोरण गतवर्षीपासून आमूलाग्र बदलले आहे. उपसा किती प्रमाणात व्हावा, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहे़ त्यानुसारच स्थानिक पातळीवर जीएसडीए तर अंतिम स्तरावर केंद्रीय पर्यावरण समितीची परवानगी अनिवार्य केली आहे. या बदलांसोबतच दरवाढही गतवर्षीपासूनच करण्यात आली. यामुळे वर्धा जिल्ह्यातील काही घाटांचा लिलाव होऊ शकला नव्हता़ लिलाव करताना प्रारंभी जीएसडीए घाटांची पात्रता तपासते़ एकदा संख्या ठरली की, जिल्हाधिकारी घाटांची यादी राज्य पर्यावरण विभागाकडे व तेथून ती केंद्राकडे जाते. केंद्राच्या परवानगीनंतर पुन्हा यादी जिल्हा प्रशासनास प्राप्त होऊन प्रक्रिया सुरू होते़(कार्यालय प्रतिनिधी)