शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

गरिबांना घरकुलाची आशा; नवं घर यावर्षी तरी पूर्ण होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 18:01 IST

सात हजार घरकुलांना मंजुरी : मोजकीच घरे पूर्ण, अनुदानाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात २०२४-२५ वर्षात 'पीएमएवाय' अंतर्गत मंजूर घरकुलांपैकी ५ हजार लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता वितरीत करण्यात आला; तर २ हजार १० लाभार्थ्यांचे पहिल्या हप्त्याचे अनुदान रखडले आहे. त्यामुळे घरकुलांची बांधकामे रखडली आहेत. शासन अनुदान कधी देणार, असा सवाल लाभार्थ्यांतून केला जात आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात २०२४-२५ या वर्षात ७ हजार १६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. मंजुरीनंतर पहिला हप्ता लाभार्थ्यांना मिळाल्याने बांधकामे गतीने सुरू झाली. दुसरा आणि तिसऱ्या हप्त्यासाठी अनेकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. निवडणूक आचारसंहिता काळात अनुदानाला थांबा देण्यात आला होता. अनेकांनी उसनवार करून घराची कामे सुरू ठेवली आहेत. मात्र, अनुदान न मिळाल्याने आता लाभार्थ्यांची कोंडी होत आहे. अनुदान कधी येणार? याची निश्चिती नाही. पण, संबंधित विभागात आश्वासन देत वेळ मारून नेण्यात येत आहे. घरकुलांच्या बांधकामासाठी उपलब्धतेनुसार अनुदान वितरीत केले जात आहे. या बांधकामासाठी रकमेचा व लागणाऱ्या साहित्याचा विचार केल्यास हे घरकुल बांधणे अवघड झाले आहे. सिमेंट, लोखंड, वाळूचे दर गगनाला भिडल्याने लाभार्थी हैराण झाले आहेत. 

६,९८८ घरे अपूर्ण चालू आर्थिक वर्षात जिल्ह्याला साडेसात हजार घरकुलाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ७ हजार १६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र, गत आठ महिन्यात केवळ २८ घरे पूर्ण झाली आहेत. ६ हजार ९८८ घरे अपूर्ण आहेत. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी असला तरी वेळेत ही घरे पूर्ण होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोणत्या तालुक्यात किती घरकूल मंजूर? तालुका                  मंजूर घरे आर्वी                        ९७७ आष्टी                        ६३८ देवळी                     १,०२६ हिंगणघाट                १,३०२ कारंजा                     ७२२ समुद्रपूर                   ९९६ सेलू                         ७६१ वर्धा                         ५९४

५ हजार लाभार्थ्यांना मिळाला पहिला हप्ता या योजनेअंतर्गत पात्र ५ हजार ६ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरीत करण्यात आला आहे, तर दुसरा हप्ता १८८, तर तिसरा हप्ता केवळ ५७ जणांना देण्यात आला आहे.

जिल्ह्यात ७ हजार ६२३ घरकुलांना मान्यता जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०२४-२५ साठी ७ हजार ६२३ घटकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ७ हजार १६ घरकुलांना मान्यता देण्यात आली आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाgovernment schemeसरकारी योजना