शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

राज्यातील तीन हजारांवरील मिसाबंदींचे मानधन थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 23:36 IST

महाराष्ट्र शासनाने लोकतंत्र सेनानींसाठी सुरू केलेल्या सन्मानिधींची रक्कम मागील चार महिन्यांपासून त्यांना मिळाली नाही. त्यामुळे अनेक लोकतंत्र सेनानींवर उपासमारीमुळे अक्षरश: भिक्षा मागण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देचार महिन्यांपासून प्रतीक्षा लोकतंत्र सेनानींवर उपासमारीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: महाराष्ट्र शासनाने लोकतंत्र सेनानींसाठी सुरू केलेल्या सन्मानिधींची रक्कम मागील चार महिन्यांपासून त्यांना मिळाली नाही. त्यामुळे अनेक लोकतंत्र सेनानींवर उपासमारीमुळे अक्षरश: भिक्षा मागण्याची वेळ आली आहे. भाजप सरकारने सुरू केलेले मानधन महाआघाडी सरकारने जानेवारी महिन्यापासून दिले नसल्याने वृद्ध लोकतंत्र सेनानींना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.राज्यात लोकतंत्र सेनानींची एकूण संख्या ३ हजार २१२ आहे. त्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी परिणामांची चिंता न करता तुरुंगवास भोगला. घरादारावर तुळशीपत्र ठेवून सत्याग्रहाच्या समरात उड्या घेतल्या. यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात. त्यामुळे १९७७ ला पुन्हा देशात लोकशाही लागू झाली. अशा सत्याग्रही व मिसाबंदीना भाजप शासनाने मासिक १० हजार व विधवांना ५ हजार असा सन्माननिधी देणे सुरू केले होते. महाराष्ट्रातील सर्वच लोकतंत्र सेनानी हे वयोवृद्ध असून बहुतेकांना मधुमेह, अर्धांगवायू, उच्च रक्तदाब, हृदयविकार आदी आजार आहेत. ६५ ते ९२ वर्षे वय असणाºया लोकतंत्र सेनानींची संख्या हळूहळू कमी होत आहे. गेल्या चार महिन्यांपासून या लोकतंत्र सेनानींना सन्माननिधी मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यांचा औषधोपचार थांबला आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ त्यांना सन्माननिधी देण्याची मागणी होत आहे.उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते आश्वासनमहाआघाडी सरकारच्या स्थापनेनंतर अखिल भारतीय लोकतंत्र सेनानी संयुक्त संघर्ष समितीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी लोकतंत्र सेनानींना नियमित सन्माननिधी देण्याचे आश्वासन दिले होते. महाआघाडी सरकार स्थापनेनंतर लोकतंत्र सेनानीना जानेवारी २०२० पर्यंतचा सन्माननिधी देण्यात आला. मात्र, त्यानंतर चार महिन्यांपासून हा निधी लोकतंत्र सेनानींना मिळालाच नाही. केंद्र सरकारकडूनही काही तरी पदरात पडेल, अशी आशा होती; पण तीही फोल ठरल्याचे सांगण्यात आले आहे.राज्यभरात ३ हजार २१२ लोकतंत्र सेनानी आहेत. त्यांना शासनाकडून सन्माननिधी जाहीर करण्यात आला होता. त्या निधीच्या भरवशावर उतारवयात औषधोपचाराचा खर्च चालतो. मागील चार महिन्यांपासून शासनाकडून सन्मान निधी मिळाला नसल्याने अडचणीत भर पडली आहे. वयोवृद्ध लोकतंत्र सेनानींच्या हालअपेष्टाचा विचार करून तत्काळ सन्माननिधी द्यावा.रामराव जाधव, अध्यक्ष, अ. भा. लोकतंत्र सेनानी संयुक्त संघर्ष समिती.

टॅग्स :Governmentसरकार