शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
3
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
4
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
5
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
6
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
7
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
8
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
9
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
10
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
11
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
12
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
13
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
14
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
15
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
16
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
17
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
18
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
19
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
20
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?

राज्यातील तीन हजारांवरील मिसाबंदींचे मानधन थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 23:36 IST

महाराष्ट्र शासनाने लोकतंत्र सेनानींसाठी सुरू केलेल्या सन्मानिधींची रक्कम मागील चार महिन्यांपासून त्यांना मिळाली नाही. त्यामुळे अनेक लोकतंत्र सेनानींवर उपासमारीमुळे अक्षरश: भिक्षा मागण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देचार महिन्यांपासून प्रतीक्षा लोकतंत्र सेनानींवर उपासमारीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: महाराष्ट्र शासनाने लोकतंत्र सेनानींसाठी सुरू केलेल्या सन्मानिधींची रक्कम मागील चार महिन्यांपासून त्यांना मिळाली नाही. त्यामुळे अनेक लोकतंत्र सेनानींवर उपासमारीमुळे अक्षरश: भिक्षा मागण्याची वेळ आली आहे. भाजप सरकारने सुरू केलेले मानधन महाआघाडी सरकारने जानेवारी महिन्यापासून दिले नसल्याने वृद्ध लोकतंत्र सेनानींना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.राज्यात लोकतंत्र सेनानींची एकूण संख्या ३ हजार २१२ आहे. त्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी परिणामांची चिंता न करता तुरुंगवास भोगला. घरादारावर तुळशीपत्र ठेवून सत्याग्रहाच्या समरात उड्या घेतल्या. यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात. त्यामुळे १९७७ ला पुन्हा देशात लोकशाही लागू झाली. अशा सत्याग्रही व मिसाबंदीना भाजप शासनाने मासिक १० हजार व विधवांना ५ हजार असा सन्माननिधी देणे सुरू केले होते. महाराष्ट्रातील सर्वच लोकतंत्र सेनानी हे वयोवृद्ध असून बहुतेकांना मधुमेह, अर्धांगवायू, उच्च रक्तदाब, हृदयविकार आदी आजार आहेत. ६५ ते ९२ वर्षे वय असणाºया लोकतंत्र सेनानींची संख्या हळूहळू कमी होत आहे. गेल्या चार महिन्यांपासून या लोकतंत्र सेनानींना सन्माननिधी मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यांचा औषधोपचार थांबला आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ त्यांना सन्माननिधी देण्याची मागणी होत आहे.उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते आश्वासनमहाआघाडी सरकारच्या स्थापनेनंतर अखिल भारतीय लोकतंत्र सेनानी संयुक्त संघर्ष समितीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी लोकतंत्र सेनानींना नियमित सन्माननिधी देण्याचे आश्वासन दिले होते. महाआघाडी सरकार स्थापनेनंतर लोकतंत्र सेनानीना जानेवारी २०२० पर्यंतचा सन्माननिधी देण्यात आला. मात्र, त्यानंतर चार महिन्यांपासून हा निधी लोकतंत्र सेनानींना मिळालाच नाही. केंद्र सरकारकडूनही काही तरी पदरात पडेल, अशी आशा होती; पण तीही फोल ठरल्याचे सांगण्यात आले आहे.राज्यभरात ३ हजार २१२ लोकतंत्र सेनानी आहेत. त्यांना शासनाकडून सन्माननिधी जाहीर करण्यात आला होता. त्या निधीच्या भरवशावर उतारवयात औषधोपचाराचा खर्च चालतो. मागील चार महिन्यांपासून शासनाकडून सन्मान निधी मिळाला नसल्याने अडचणीत भर पडली आहे. वयोवृद्ध लोकतंत्र सेनानींच्या हालअपेष्टाचा विचार करून तत्काळ सन्माननिधी द्यावा.रामराव जाधव, अध्यक्ष, अ. भा. लोकतंत्र सेनानी संयुक्त संघर्ष समिती.

टॅग्स :Governmentसरकार