शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

घरीच कचरा वेगळा करून वेचकांना द्यावा!

By admin | Updated: April 15, 2017 00:34 IST

निसर्गातून आपण जे घेतो ते निसर्गाला योग्य पद्धतीने परत केल्यास समस्या निर्माण होणार नाही.

शरद काळे : शून्य कचरा व्यवस्थापन विभागीय जाणीव जागृती कार्यशाळा वर्धा : निसर्गातून आपण जे घेतो ते निसर्गाला योग्य पद्धतीने परत केल्यास समस्या निर्माण होणार नाही. मात्र तसे न करता नागरिक म्हणून आपली जबाबदारी सहजपणे ढकलतो. राष्ट्रप्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्याला प्रतिज्ञा का घ्यावी लागते. ते दैनंदिन व्यवहारातून व्यक्त व्हायला पाहिजे. माझा घरचा कचरा बाहेर जाणार नाही, त्याची योग्य विल्हेवाट लावावी म्हणून ओल्या कचऱ्याची खतनिर्मिती व सुका कचरा वेगळा करून कचरा वेचकांना द्या, असे आवाहन भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर, मुंबईचे निवृत्त वैज्ञानिक डॉ. शरद काळे यांनी केले. स्त्रीमुक्ती संघटना मुंबई, आचार्य श्रीमन्नारायण पॉलिटेक्निक, पिपरी आणि ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र दत्तपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शून्य कचरा व्यवस्थापन विभागीय जाणीव जागृती कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या दोन दिवसीय कार्यशाळेचे प्रास्ताविक स्त्री मुक्ती संघटनेच्या अध्यक्ष ज्योती म्हापसेकर यांनी केले. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गांधी विचार परिषदेचे भरत महोदय होते. वर्धा नगरपरिषदेने घेतलेल्या पुढाकाराची सविस्तर माहिती तराळे यांनी दिली. कचऱ्याची समस्या हाताळाण्यासाठी लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. यानंतर निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे यांनी वृक्ष संवर्धनासह घरोघरी कचरा खत व्यवस्थापन करण्याचे सांगितले. दुपारच्या सत्रात बुलढाण्यातील कचरा वेचकांबरोबरच्या कामांचे अनुभव प्रसिद्ध मराठी साहित्यिक डॉ. इंदू लहाने यांनी सांगितले. तर मुंबई कचरा वेचक संघटनेच्या अध्यक्ष सुशिला साबळे यांनी दुष्काळी भागातून आईसोबत लहानपणी मुंबईला स्थलांतर आणि कचरा वेचण्याच्या कामापासून सुरूवात करून स्त्री मुुक्ती संघटनेबरोबर कार्य करणे, प्रशिक्षण आणि व्यवस्थापनाचे तंत्र शिकण्यापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन केले. हा प्रवास प्रेरणादायी असल्याच्या प्रतिक्रीया यावेळी उमटल्या. आंतरराष्ट्रीय परिषदेत कचरा वेचकांचे प्रश्न मांडल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी वर्धा शहरातील वडरवस्ती आणि बोरगाव (मेघे) येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या ३८ कचरा वेचक महिलांनी कार्यशाळेत सहभाग घेतला. यावेळी महिलांनी आपल्या कौटुंबिक अडचणी, कामाचा त्रास, लहान मुलांची होणारी आबाळ कथन केली. शहरी भागात आम्ही कचरा वेचून सफाई करतो. पण लोक आम्हाला आमच्या आयुष्याला कचऱ्या समान लेखतात, असे सांगितले. कचरा वेचक महिलांचे सामाजिक आणि आर्थिक प्रश्न हाताळण्यासाठी संघटनेमार्फत सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन माविमच्या जिल्हा समन्वयक दरोकार यांनी दिले. तर नगर परिषद वर्धाचे निवृत्त आरोग्य अधिकारी टप्पे यांनी नियमाप्रमाणे न.प.च्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. वडर वस्तीमधील मुलांच्या शिक्षणासाठी आनंद निकेतन विद्यालय, सेवाग्राम यांच्याकडून सहकार्य करण्यात येईल, असे संचालक सुषमा शर्मा यांनी सांगितले. यानंतर कार्यशाळेत झालेल्या विविध विषयावरील सत्रात तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. उपस्थितांचे स्वागत ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. सोहम पंड्या यांनी केले. संचालन प्रा. आशिष चव्हाण यांनी केले. जाणीव जागृती कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी आरती प्रांजळे घुसे, निलेश आंबोरे, नयना पाटील, रेखा बोरकर, सारीका सहारे यांनी सहकार्य केले. पाच जिल्ह्यातील ३३ संस्थेतर्फे ८६ पुरूष आणि ११० महिला या कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या.(स्थानिक प्रतिनिधी)