शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

‘असर २०१४’ ची होळी

By admin | Updated: January 17, 2015 23:02 IST

असर २०१४ च्या अहवालातून प्रथम संस्थेने ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणासंबंधी काढलेले निष्कर्ष तर्कसंगत नसून जिल्हा परिषदांच्या शाळा व शिक्षकांची बदनामी करणारे आहेत.

जिल्हा कचेरीसमोर शिक्षक समितीचे आंदोलन वर्धा : असर २०१४ च्या अहवालातून प्रथम संस्थेने ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणासंबंधी काढलेले निष्कर्ष तर्कसंगत नसून जिल्हा परिषदांच्या शाळा व शिक्षकांची बदनामी करणारे आहेत. शोषित व वंचितांच्या शाळांचे खासगीकरण करण्याच्या षडयंत्राचा हा एक भाग आहे, असे म्हणत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने असर-२०१४ च्या अहवालाची शनिवारी जिल्हाकचेरीसमोर होळी करण्यात आली.ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांच्या शाळा खासगी शिक्षणमाफियांच्या ताब्यात देण्याकरिता प्रथम स्वयंसेवी संस्था काटकारस्थान रचत आहे. १३ जानेवारी रोजी केंद्र शासनाला सादर केलेल्या दहाव्या असर अहवालातून जाणीवपूर्वक जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांची बदनामी केली आहे. असर अहवालातून मांडलेले निष्कर्ष अस्वीकार्य असल्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शिक्षणाचे चित्र अत्यंत विकृतपणे रंगविले जात आहे. असर अहवालाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती नाकारत असून या अहवालातील निष्कर्ष खोटे असल्याने प्रथम संस्थेने शिक्षक समितीचे आवाहन स्वीकारून नव्याने सर्वेक्षण करावे आणि त्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीसह शिक्षण विभागातील पर्यवेक्षीय यंत्रणा, पत्रकार, लोकप्रतिनिधी यांना सोबत घ्यावे, अशा सूचना शिक्षक समितीने प्रथम संस्थेला केले आहे. प्रथम संस्थेने तयार केलेला ‘असर २०१४’ अहवाल शिक्षकांची बदनामी करणारा असल्याचा समितीचा आरोप आहे. याबाबत जागृती करणे आणि प्रथम संस्थेचा निषेध करून ‘असर २०१४’ अहवालाची शनिवारी होळी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात शिक्षक समितीचे विजय कोंबे, नरेश गेडे, नरेंद्र गाडेकर, महेंद्र भुते, प्रकाश काळे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले. यावेळी समितीच्यावतीने शिक्षण मंत्र्यांना देण्याकरिता एक निवदेन जिल्हाधिकारी यांच्या स्वाधीन करण्यात आले.(प्रतिनिधी)