शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
3
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
4
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
5
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
6
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
7
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
8
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
9
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
10
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
11
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
12
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
13
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
14
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
15
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
16
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
17
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
18
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
19
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
20
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

नाचणगावचे ऐतिहासिक शिवमंदिर श्रद्धास्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:13 IST

सर्वात जास्त लोकसंख्या असलेली परिसरातील ग्रा.पं. अशी या गावाची ओळख. पुलगाव नगर परिषदेची हद्द या गावाला लागून असून गावातील प्राचीन हेमाडपंथी शिव मंदिर हे परिसरातील नागरिकांसह जिल्ह्याबाहेरील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे शिवरात्रीला व श्रावण महिन्यात भाविक दर्शनासाठी एकच गर्दी करतात.

ठळक मुद्देदर्शनासाठी असते गर्दी : बाहेर जिल्ह्यातील भाविकही टेकवितात माथा

श्याम चिचाटे ।आॅनलाईन लोकमतनाचणगाव : सर्वात जास्त लोकसंख्या असलेली परिसरातील ग्रा.पं. अशी या गावाची ओळख. पुलगाव नगर परिषदेची हद्द या गावाला लागून असून गावातील प्राचीन हेमाडपंथी शिव मंदिर हे परिसरातील नागरिकांसह जिल्ह्याबाहेरील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे शिवरात्रीला व श्रावण महिन्यात भाविक दर्शनासाठी एकच गर्दी करतात.श्री सिद्धेश्वर या नावाने प्रसिद्ध असलेल्या सदर मंदिरात महाशिवरात्रीला हजारो भाविक दर्शनासाठी येणार असून महाशिवरात्रीनिमित्ताने येथे शिवभक्तांचा मळाच फुलणार आहे. हे मंदिर भोसले कालीन असल्याचे सांगण्यात येते. नागपूर येथून भोसल्यांचे येणे-जाणे वर्धा मार्गाने नाचणगावात असायचे. संपूर्ण सैन्यासह त्यावेळी येथे त्यांचा मुक्काम असायचा. त्याची साक्ष येथील पुरातन वास्तू व अवशेष देतात. श्री सिद्धेश्वराच्या नावाने ओळखल्या जाणाºया मंदिराची ख्याती मोठी आहे. पुलगाव शहरात वर्धा नदीवर पुरातन शिवमंदिर असले तरी अनेक भाविक दर्शनाकरिता सिद्धेश्वर मंदिरात आल्याशिवाय राहत नाहीत. येथील आख्यायिका भाविकांना पिंडीच्या दर्शनासाठी खेचून आणते.महाशिवरात्रीनिमित्त या मंदिरात संगीतमय भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, प्रवचन, भजन आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाही ४ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या उत्सवाची सांगता श्री सिद्धेश्वराची पालखी आणि रथ मिरवणूक तथा महाप्रसादाने १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. पालखी व रथ मिरवणूक पाहण्यासाठी हजारो भाविकांचा जनसमूदाय येथे हजेरी लावणार आहे.कार्यक्रम यशस्वीतेकरिता विविध मंडळातील सदस्य मदत करीत असून अनेक भाविकही सहकार्य करीत आहे.पाण्याच्या खोलीचा शोध अयशस्वीशिवलिंगाच्या चारही बाजूने असणाऱ्या पाण्याच्या खोलीचा शोध घेण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला; पण तो एकदाही यशस्वी झाला नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. हे पाणी बाराही महिने असते. गावात संकट आले तरच पाणी कमी होते, असेही भाविक सांगतात. गावातील नदी, नाले कोरडे पडले तरी शिवलिंगातील पाणी आटत नाही, हे नवलच म्हणावे लागेल.