शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

नाचणगावचे ऐतिहासिक शिवमंदिर श्रद्धास्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:13 IST

सर्वात जास्त लोकसंख्या असलेली परिसरातील ग्रा.पं. अशी या गावाची ओळख. पुलगाव नगर परिषदेची हद्द या गावाला लागून असून गावातील प्राचीन हेमाडपंथी शिव मंदिर हे परिसरातील नागरिकांसह जिल्ह्याबाहेरील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे शिवरात्रीला व श्रावण महिन्यात भाविक दर्शनासाठी एकच गर्दी करतात.

ठळक मुद्देदर्शनासाठी असते गर्दी : बाहेर जिल्ह्यातील भाविकही टेकवितात माथा

श्याम चिचाटे ।आॅनलाईन लोकमतनाचणगाव : सर्वात जास्त लोकसंख्या असलेली परिसरातील ग्रा.पं. अशी या गावाची ओळख. पुलगाव नगर परिषदेची हद्द या गावाला लागून असून गावातील प्राचीन हेमाडपंथी शिव मंदिर हे परिसरातील नागरिकांसह जिल्ह्याबाहेरील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे शिवरात्रीला व श्रावण महिन्यात भाविक दर्शनासाठी एकच गर्दी करतात.श्री सिद्धेश्वर या नावाने प्रसिद्ध असलेल्या सदर मंदिरात महाशिवरात्रीला हजारो भाविक दर्शनासाठी येणार असून महाशिवरात्रीनिमित्ताने येथे शिवभक्तांचा मळाच फुलणार आहे. हे मंदिर भोसले कालीन असल्याचे सांगण्यात येते. नागपूर येथून भोसल्यांचे येणे-जाणे वर्धा मार्गाने नाचणगावात असायचे. संपूर्ण सैन्यासह त्यावेळी येथे त्यांचा मुक्काम असायचा. त्याची साक्ष येथील पुरातन वास्तू व अवशेष देतात. श्री सिद्धेश्वराच्या नावाने ओळखल्या जाणाºया मंदिराची ख्याती मोठी आहे. पुलगाव शहरात वर्धा नदीवर पुरातन शिवमंदिर असले तरी अनेक भाविक दर्शनाकरिता सिद्धेश्वर मंदिरात आल्याशिवाय राहत नाहीत. येथील आख्यायिका भाविकांना पिंडीच्या दर्शनासाठी खेचून आणते.महाशिवरात्रीनिमित्त या मंदिरात संगीतमय भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, प्रवचन, भजन आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाही ४ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या उत्सवाची सांगता श्री सिद्धेश्वराची पालखी आणि रथ मिरवणूक तथा महाप्रसादाने १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. पालखी व रथ मिरवणूक पाहण्यासाठी हजारो भाविकांचा जनसमूदाय येथे हजेरी लावणार आहे.कार्यक्रम यशस्वीतेकरिता विविध मंडळातील सदस्य मदत करीत असून अनेक भाविकही सहकार्य करीत आहे.पाण्याच्या खोलीचा शोध अयशस्वीशिवलिंगाच्या चारही बाजूने असणाऱ्या पाण्याच्या खोलीचा शोध घेण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला; पण तो एकदाही यशस्वी झाला नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. हे पाणी बाराही महिने असते. गावात संकट आले तरच पाणी कमी होते, असेही भाविक सांगतात. गावातील नदी, नाले कोरडे पडले तरी शिवलिंगातील पाणी आटत नाही, हे नवलच म्हणावे लागेल.