शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

महामार्गाचे काम राजकारणात नाही; दफ्तरदिरंगाई, कंत्राटदारांमुळे रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 05:00 IST

जिल्ह्यामध्ये आठ राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, यामध्ये वर्धा-हिंगणघाट, वर्धा-आर्वी, आर्वी-तळेगाव, सेलडोह-सिंदी (रेल्वे)- सेवाग्राम-पवनार, तळेगाव (श्याम पंत)- गोणापूर चौकी, वडनेर-देवधरी, बुट्टीबोरी-वर्धा आणि वर्धा-यवतमाळ या मार्गांचा समावेश आहे. या आठ राष्ट्रीय महामार्गांपैकी वर्धा ते यवतमाळ, बुट्टीबोरी ते वर्धा व वर्धा ते हिंगणघाट या तीन महामार्गाचे काम पूर्ण झाले असून तळेगाव (श्याम पंत) ते गोणापूर चौकी, वर्धा ते आर्वी आणि वडनेर ते देवधरी या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यामध्ये आठ राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून सुरू आहेत. या महामार्गाच्या कामातील कंत्राटदारांची मनमर्जी आणि संबंधित विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे या मार्गांवरून आवागमन करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात कामाला गती मिळावी याकरिता आंदोलने करण्यात आली, परंतु राष्ट्रीय महामार्गाच्या कामात दबंगशाही झाली नाही, असेच चित्र आजपर्यंत राहिले आहे. जिल्ह्यामध्ये आठ राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, यामध्ये वर्धा-हिंगणघाट, वर्धा-आर्वी, आर्वी-तळेगाव, सेलडोह-सिंदी (रेल्वे)- सेवाग्राम-पवनार, तळेगाव (श्याम पंत)- गोणापूर चौकी, वडनेर-देवधरी, बुट्टीबोरी-वर्धा आणि वर्धा-यवतमाळ या मार्गांचा समावेश आहे. या आठ राष्ट्रीय महामार्गांपैकी वर्धा ते यवतमाळ, बुट्टीबोरी ते वर्धा व वर्धा ते हिंगणघाट या तीन महामार्गाचे काम पूर्ण झाले असून तळेगाव (श्याम पंत) ते गोणापूर चौकी, वर्धा ते आर्वी आणि वडनेर ते देवधरी या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. आर्वी ते तळेगाव आणि सेलडोह-सिंदी(रेल्वे)-सेवाग्राम-पवनार या मार्गाच्या कामाची फेरनिविदा करण्यात आल्याने आता कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या दोन मार्गांचे काम कधी पूर्णत्वास जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जी कामे अंतिम टप्प्यात आहे त्या कामांना कोरोनामुळे ब्रेक लागला होता. त्यामुळे कंत्राटदाराला नियमानुसार वाढीव मुदत देण्यात आली असून, लवकरच हे काम पूर्ण होणार असल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

राजकारणी काय म्हणतात...

जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम बऱ्याच दिवसांपासून सुरू असून, कुठेही कामामध्ये आठकाठी टाकून राजकारण केल्याचा प्रकार घडला नाही. जर कामात सदोषता असेल, कामामध्ये दिरंगाई होत असेल किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण होत असेल तर गावकऱ्यांच्या पुढाकाराने आंदोलन करून प्रशासनास अवगत करण्यात आले. पण, काम बंद पाडण्याचा प्रकार कुठेही घडला नाही. मनोज चांदूरकर, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

जिल्ह्यामध्ये गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या कामात काही अडचणी आल्या किंवा गावकऱ्यांना त्रास झाला तर त्यांनी लगेच संबंधित विभागाच्या लक्षात आणून दिले. परंतु जिल्ह्यात कुठेही काम अडविण्यात आले, काम बंद पाडण्यात आले, अशी एकही तक्रार अद्याप प्राप्त झालेली नाहीत आणि तसा प्रकारही कुठे निदर्शनास आला नाही.डॉ. शिरीष गोडे, जिल्हाध्यक्ष, भाजप

आर्वी-तळेगाव (श्या.)

- आर्वी ते तळेगाव (श्याम.पंत) या १३.७० किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाकरिता शासनाकडून ९९.४६ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या मार्गाचे काम सुरू झाले परंतु, कंत्राटदारांची मनमर्जी आणि संबंधित विभागाचे दुर्लक्ष यामुळे काम रखडले. अखेर या कामाची फेरनिविदा करावी लागली असून, आता नव्याने काम सुरू झाल्याने कामाची गती संथच असल्याचे दिसून येत आहे. 

सेलडोह-पवनार

- सेलडोह-सिंदी (रेल्वे)-सेवाग्राम-पवनार या ४८.६२ किलोमीटरच्या रस्त्याच्या कामाकरिता ४०४.३३ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. परंतु याही कामामध्ये पहिल्या कंत्राटदाराने हयगय केली. यामुळे नागरिकांचाही रोष वाढायला लागला. परिणामी याही मार्गाच्या फेरनिविदा करून नवीन कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली. परंतु आता तरी कामाला गती मिळणार का? हा प्रश्नच आहे. 

वर्धा-आर्वी

- वर्धा ते आर्वी या ५३.७० किलोमीटरच्या महामार्गाकरिता ३०६.२० कोटींचा निधी मंजूर झाला असून, गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून या महामार्गाचे काम सुरू आहे. या कामाची पद्धत सुरुवातीपासूनच त्रासदायक राहिल्याने अडचणींचा सामना करावा लागता. आता हे काम अंतिम टप्प्यात असून, अजूनही बऱ्याच ठिकाणचे काम बाकी आहे. आर्वीजवळच बरेच काम अद्याप होणे बाकी आहे. 

तळेगाव गोणापूर चौकी

- तळेगाव (श्याम.पंत) ते अमरावती जिल्ह्यातील गोणापूर चौकीपर्यंतच्या ४३.३० किलोमीटर मार्गाकरिता २६४.४९ निधी मंजूर झाला असून, या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून कामाला सुरुवात झाली पण, अद्यापही अपूर्ण असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

 

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्ग