शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांच्या गतीमुळे राष्ट्रीय महामार्ग बनलाय ‘मृत्यूमार्ग’

By admin | Updated: June 15, 2015 02:08 IST

सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा या अमरावती ते नागपूर रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले.

अनिल रिठे  तळेगाव (श्या.पं.)सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा या अमरावती ते नागपूर रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीसह वाहनांचा वेगही वाढला आहे. या अनियंत्रित व गतिमान वाहनांमुळे अपघातांचा आलेखही त्याच वेगाने वर चढत आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास ही बाब लक्षात येते. राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावर तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३२ अपघातांमध्ये २० जणांना प्राणास मुकावे लागले तर ३८ जण जखमी झाले. यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग आता मृत्यूमार्ग बनत चालला आहे. तळेगाव हे नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील वर्धा जिल्ह्यातील चौफुलीचे गाव आहे. याच गावातून आष्टी मार्गाने मध्यप्रदेश हे राज्य जोडले आहे. आर्वी मार्गाने आंध्रप्रदेश (हैद्राबाद) तसेच हा राष्ट्रीय महामार्ग मुंबई-कलकत्ता म्हणून ओळखला जातो. या मार्गावरून सर्वत्र जाणारी वाहने धावतात. या वाहनांत एसटी बसेस, खासगी प्रवासी ट्रॅव्हल्स, इतर प्रवासी वाहने, ट्रक, ट्रेलर, रेती, गिट्टी, मुरूम व इतर गौण खनिजांची वाहतूक करणारी ओव्हरलोड वाहने अव्याहत धावत असतात. आर्वी-पुलगाव व आष्टी-वरूड या महामार्गाची अक्षरश: वाट लागली आहे. या मार्गावरील खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढत चालले आहे. हा मार्ग राज्यमार्ग असला तरी त्याची रूंदी तंतोतंत आहे. यामुळे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात जड वाहने पायी चालणाऱ्यांना उडविण्याच्या घटना सामान्य झाल्या आहेत. रस्त्याच्या कडा भरल्या नसल्याने ट्रक, बस रस्त्याच्या खाली उतरवित नाही. या अपघातांतील अर्धे अपघात सुसाट वेग व मद्यधुंद अवस्थेत वाहने (टू-व्हिलर) चालविल्याने झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. नागपूर-अमरावती मार्गाचे चौपदरीकरण झाल्याने व रस्ता चांगला असल्याने अक्षरश: सर्वच वाहने सुसाट असतात. या वाहनांच्या वेगावर सध्या कुणाचेही नियंत्रण नाही. वाहन चालक वाहतुकीच्या नियंमाचे सर्रास उल्लंघन करतात. महामार्गावर तर ट्रक असो वा कार त्यांचा सुसाट वेग पाहून आश्चर्य व्यक्त केले जाते. ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ अंतर्गत वाहन चालकांची तपासणी केली जात नाही. आर्वी ते तळेगाव मार्गे आष्टीकडे जाणारे ट्रक व इतर वाहने गाव असून वेग कमी करत नाही. प्रादेशिक परिवहनचे अधिकारी केवळ महसूल गोळा करण्याच्या नावाखाली अधूनमधून वाहने चालान करतात. आष्टी टी-पॉर्इंटवर तर रोडवरच ट्रक उभे असतात. दोन महिन्यांपूर्वी एक ट्रेलर थेट हॉटेलमध्ये घुसला होता; पण जिवीत हानी झाली नव्हती. या महामार्गावर अपघात नित्याचेच झाले आहेत. वाहने अनियंत्रित होऊन उलटण्याच्या घटना दररोज घडतात. यामुळे या मृत्यूमार्गावरील वाहनांचा वेग आवरण्याकरिता कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे झाले आहे. पोलीस ठाण्यात अपुरा कर्मचारी वर्गतळेगाव पोलीस ठाण्यांतर्गत ३९ गावांचा समावेश असून पोलीस संख्या केवळ १७ आहे. या कर्मचाऱ्यांना ३९ गावांची सुव्यवस्था, राष्ट्रीय महामार्गाने पेट्रोलिंग, खडका बॉर्डर ते सारवाडीपर्यंत लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची सुरक्षा, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, अपघात झाल्यास तेथे धाव घेणे या सर्व बाबी पाहाव्या लागतात. यामुळे पोलीस बळ वाढविण्याची वारंवार मागणी होत आहे.