शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात चार तासांमध्ये व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची जबरजस्त लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 15:04 IST

किराणा व भाजीपाल्यांच्या दुकानात होणारी गर्दी मर्यादित ठेवण्याची जबाबदारी संबंधित दुकांदारावर असतांना सुद्धा या नियमाचे शहरात सर्रास उल्लंघन होत असून व्यापारी सुद्धा या संधीचा फायदा घेऊन ग्राहकांना चढ्या भावाने विकत असून ग्राहकांची लूट करीत असल्याचा अनुभव ग्राहकांना येत आहे.

ठळक मुद्देवाढीव भावाने जीवनावश्यक वस्तूंची विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: देशासह संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शासनाने देशासह राज्यात संचारबंदी लागू केली आहे. यात सामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी संचारबंदीमध्ये सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. याकाळात किराणा व भाजीपाल्यांच्या दुकानात होणारी गर्दी मर्यादित ठेवण्याची जबाबदारी संबंधित दुकांदारावर असतांना सुद्धा या नियमाचे शहरात सर्रास उल्लंघन होत असून व्यापारी सुद्धा या संधीचा फायदा घेऊन ग्राहकांना चढ्या भावाने विकत असून ग्राहकांची लूट करीत असल्याचा अनुभव ग्राहकांना येत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासनाकडून युद्ध पातळीवर उपाय योजना करण्यात येत आहेत. त्यानुसार १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यात किराणा, भाजीपाला, मेडिकल व दवाखाने यासारख्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी सामान्य जनतेला सोयीचे व्हावे म्हणून सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यात वस्तूंचा काळाबाजार करू नये, दुकानासमोर मर्यादित अंतरावर ग्राहकांना उभे करून माल द्यावा. दुकानासमोर पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांची गर्दी होऊ नये. तसेच ग्राहकाने तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधण्यावर लक्ष ठेवणे. दुकानासमोर ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण व पाण्याची व्यवस्था करणे आदी जबाबदाºया दुकानदारांना देण्यात आल्या असतांना शहरात संचारबंदीतील सुटी दरम्यान भाजीपाला व अन्य दुकानासमोर गर्दी होत आहे.दुचाकीसुद्धा थेट दुकानासमोर लावल्या जाते, परिणामी मोठ्या प्रमाणात ग्राहकाची गर्दी होत आहे. त्यातही साखरेचा कृत्रिम तुटवडा केल्या जात असल्याची ओरड होत आहे. तर काही किराणा दुकानदार खाण्याचे तेलसुद्धा १०० ते १५० रुपये प्रति डब्बा चढ्या भावाने विकल्या जात आहे. पशुखाद्य ढेप सुद्धा चढयाभावाने विकल्या जात आहे. याकडे संबंधित विभागाने चौकशी करून दुकांदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.संचारबंदीचा सुटीचा फायदा दुचाकीस्वार मोठ्या प्रमाणात उचलत असून याकाळात इतर होणाºया वाहतुकीपेक्षा दुचाकी वाहनांची रस्त्यावरील चहलपहल मोठ्या प्रमाणात दिसून येते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस