शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
3
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
4
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
5
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
6
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
7
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
8
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
9
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
10
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
11
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
12
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
13
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
14
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
15
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
16
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
17
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
18
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
19
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

वर्ध्यात चार तासांमध्ये व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची जबरजस्त लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 15:04 IST

किराणा व भाजीपाल्यांच्या दुकानात होणारी गर्दी मर्यादित ठेवण्याची जबाबदारी संबंधित दुकांदारावर असतांना सुद्धा या नियमाचे शहरात सर्रास उल्लंघन होत असून व्यापारी सुद्धा या संधीचा फायदा घेऊन ग्राहकांना चढ्या भावाने विकत असून ग्राहकांची लूट करीत असल्याचा अनुभव ग्राहकांना येत आहे.

ठळक मुद्देवाढीव भावाने जीवनावश्यक वस्तूंची विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: देशासह संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शासनाने देशासह राज्यात संचारबंदी लागू केली आहे. यात सामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी संचारबंदीमध्ये सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. याकाळात किराणा व भाजीपाल्यांच्या दुकानात होणारी गर्दी मर्यादित ठेवण्याची जबाबदारी संबंधित दुकांदारावर असतांना सुद्धा या नियमाचे शहरात सर्रास उल्लंघन होत असून व्यापारी सुद्धा या संधीचा फायदा घेऊन ग्राहकांना चढ्या भावाने विकत असून ग्राहकांची लूट करीत असल्याचा अनुभव ग्राहकांना येत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासनाकडून युद्ध पातळीवर उपाय योजना करण्यात येत आहेत. त्यानुसार १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यात किराणा, भाजीपाला, मेडिकल व दवाखाने यासारख्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी सामान्य जनतेला सोयीचे व्हावे म्हणून सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यात वस्तूंचा काळाबाजार करू नये, दुकानासमोर मर्यादित अंतरावर ग्राहकांना उभे करून माल द्यावा. दुकानासमोर पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांची गर्दी होऊ नये. तसेच ग्राहकाने तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधण्यावर लक्ष ठेवणे. दुकानासमोर ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण व पाण्याची व्यवस्था करणे आदी जबाबदाºया दुकानदारांना देण्यात आल्या असतांना शहरात संचारबंदीतील सुटी दरम्यान भाजीपाला व अन्य दुकानासमोर गर्दी होत आहे.दुचाकीसुद्धा थेट दुकानासमोर लावल्या जाते, परिणामी मोठ्या प्रमाणात ग्राहकाची गर्दी होत आहे. त्यातही साखरेचा कृत्रिम तुटवडा केल्या जात असल्याची ओरड होत आहे. तर काही किराणा दुकानदार खाण्याचे तेलसुद्धा १०० ते १५० रुपये प्रति डब्बा चढ्या भावाने विकल्या जात आहे. पशुखाद्य ढेप सुद्धा चढयाभावाने विकल्या जात आहे. याकडे संबंधित विभागाने चौकशी करून दुकांदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.संचारबंदीचा सुटीचा फायदा दुचाकीस्वार मोठ्या प्रमाणात उचलत असून याकाळात इतर होणाºया वाहतुकीपेक्षा दुचाकी वाहनांची रस्त्यावरील चहलपहल मोठ्या प्रमाणात दिसून येते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस