शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

वर्ध्यात चार तासांमध्ये व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची जबरजस्त लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 15:04 IST

किराणा व भाजीपाल्यांच्या दुकानात होणारी गर्दी मर्यादित ठेवण्याची जबाबदारी संबंधित दुकांदारावर असतांना सुद्धा या नियमाचे शहरात सर्रास उल्लंघन होत असून व्यापारी सुद्धा या संधीचा फायदा घेऊन ग्राहकांना चढ्या भावाने विकत असून ग्राहकांची लूट करीत असल्याचा अनुभव ग्राहकांना येत आहे.

ठळक मुद्देवाढीव भावाने जीवनावश्यक वस्तूंची विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: देशासह संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शासनाने देशासह राज्यात संचारबंदी लागू केली आहे. यात सामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी संचारबंदीमध्ये सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. याकाळात किराणा व भाजीपाल्यांच्या दुकानात होणारी गर्दी मर्यादित ठेवण्याची जबाबदारी संबंधित दुकांदारावर असतांना सुद्धा या नियमाचे शहरात सर्रास उल्लंघन होत असून व्यापारी सुद्धा या संधीचा फायदा घेऊन ग्राहकांना चढ्या भावाने विकत असून ग्राहकांची लूट करीत असल्याचा अनुभव ग्राहकांना येत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासनाकडून युद्ध पातळीवर उपाय योजना करण्यात येत आहेत. त्यानुसार १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यात किराणा, भाजीपाला, मेडिकल व दवाखाने यासारख्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी सामान्य जनतेला सोयीचे व्हावे म्हणून सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यात वस्तूंचा काळाबाजार करू नये, दुकानासमोर मर्यादित अंतरावर ग्राहकांना उभे करून माल द्यावा. दुकानासमोर पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांची गर्दी होऊ नये. तसेच ग्राहकाने तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधण्यावर लक्ष ठेवणे. दुकानासमोर ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण व पाण्याची व्यवस्था करणे आदी जबाबदाºया दुकानदारांना देण्यात आल्या असतांना शहरात संचारबंदीतील सुटी दरम्यान भाजीपाला व अन्य दुकानासमोर गर्दी होत आहे.दुचाकीसुद्धा थेट दुकानासमोर लावल्या जाते, परिणामी मोठ्या प्रमाणात ग्राहकाची गर्दी होत आहे. त्यातही साखरेचा कृत्रिम तुटवडा केल्या जात असल्याची ओरड होत आहे. तर काही किराणा दुकानदार खाण्याचे तेलसुद्धा १०० ते १५० रुपये प्रति डब्बा चढ्या भावाने विकल्या जात आहे. पशुखाद्य ढेप सुद्धा चढयाभावाने विकल्या जात आहे. याकडे संबंधित विभागाने चौकशी करून दुकांदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.संचारबंदीचा सुटीचा फायदा दुचाकीस्वार मोठ्या प्रमाणात उचलत असून याकाळात इतर होणाºया वाहतुकीपेक्षा दुचाकी वाहनांची रस्त्यावरील चहलपहल मोठ्या प्रमाणात दिसून येते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस