शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

अहो मी अजूनही जिवंत! मयत दाखवून डावलला जातोय पीएम किसानचा लाभ

By महेश सायखेडे | Updated: April 25, 2023 20:49 IST

शासकीय कर्मचाऱ्याच्या गौडबंगालाचा हवालदील शेतकऱ्याला फटका

दारोडा (वर्धा) : शासकीय काम बारा महिने थांब याची प्रचिती अनेकदा अनेकांना येते. पण जीवंत शेतकऱ्याला मयत दाखवून चक्क पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार हिंगणघाट तालुक्यातील दारोडा या गावात उघडकीस आला आहे.

संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचे तीन हप्ते जमा झाले. पण त्यानंतर शासकीय मदत का मिळाली नाही याची विचारणा करण्यासाठी शेतकरी संबंधिताकडे गेला असता तुमचा तर मृत्यू झाला. त्यामुळेच तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आल्याने अहो मी अजूनही जिवंत आहे हे पटवून देण्यासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. चुकी शासकीय कर्मचाऱ्याची आणि शेतकऱ्याच्या अडचणीत भर पडल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच आपल्याला पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी हवालदील शेतकरी रामसिंग हिरासिंग गहेरवार यांनी केली आहे.

गहेरवार यांच्याकडे वडिलोपार्जित १.११ हे. आर. शेतजमीनदारोडा येथील शेतकरी रामसिंग हिरासिंग गहेरवार यांची शेतजमीन दारोडा शिवारात असून ते याच वडिलोपार्जित शेतजमीन करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना ९ मार्च २०२० ला पीएम किसान योजनेचा पहिला, १५ एप्रिल २०२० ला दुसरा तर ९ ऑगस्ट २०२० ला तिसरा हप्ता मिळाला. पण मयत दर्शवित त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देणे बंद करण्यात आले आहे. शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवित संबंधिताला विचारणा केल्यावर आपल्याला जिवंतपणीच मृत घोषित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळाली.तहसीलदारांनीही उडविली थट्टासंबंधित गंभीर बाब शेतकरी गहरवार यांच्या लक्षात येताच त्यांनी हिंगणघाट येथील तहसील कार्यालय गाठून त्याबाबतची माहिती तहसीलदारांना दिली. पण तहसीलदारांनीही उडवा-उडवीचे उत्तर दिल्याने हवालदील शेतकरी रामसिंग गहरवार यांनी आ. समीर कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयाची पायरी चढली. आमदारांना आपबीती सांगितली. तेव्हा तू काळजी करू नकोस, तू तहसीलदाराकडे पुन्हा जा, तूझे काम होईल असे सांगितल्याने शेतकरी पुन्हा तहसीलदारांकडे आला. तेव्हा तू आमदार साहेबांकडून आला. तेव्हा तू जिवंत होतेच, काळजी करू नको असे म्हणत हवालदील शेतकऱ्याची थट्टाच केली. तालुका कचेरी ते आमदार आणि पुन्हा तालुका कचेरी अशी पायपीट करूनही समस्या निकाली निघाली नसल्याने शेतकऱ्याच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना