शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दिल्लीच्या आंदोलनकर्त्यासाठी वर्ध्याहून सरसावले मदतीचे हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 14:19 IST

Wardha news केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे सध्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनकर्त्यांना जीवनावश्यक वस्तु पुरविण्याचे काम वर्धा व अमरावती जिल्ह्यातील शेतकरी कार्यकर्ते करीत आहे.

ठळक मुद्दे एकच मिशन शेतकरी आरक्षणचे सेवाकार्य

लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे सध्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनकर्त्यांना जीवनावश्यक वस्तु पुरविण्याचे काम वर्धा व अमरावती जिल्ह्यातील शेतकरी कार्यकर्ते करीत आहे. एकच मिशन शेतकरी आरक्षणच्या माध्यमातून हे सेवाकार्य मागील पाच दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. केंद्र सरकारने अलीकडेच केलेल्या तीनही कृषी कायद्याचा विरोध करण्यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहे. या आंदोलनात वर्धा व अमरावती जिल्ह्यातून एकच मिशन शेतकरी आरक्षणचे शेकडो कार्यकर्ते मिशनचे नेते शैलेश अग्रवाल यांच्या नेतृत्वात सहभागी झाले आहेत. या ठिकाणी टिकरी सिमेवर आंदोलकांना दुध, नास्ता, जेवन, औषध वाटप करण्याचे काम एकच मिशन शेतकरी आरक्षणने सुरू केले आहे.

देशभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सेवार्थ स्टाॅल लावण्यात आले आहे. भोजनाच्या स्टाॅलचे व्यवस्थापन निहाल पांडे, दुध, चहा, नास्ता स्टाॅलचे व्यवस्थापन स्वप्नील कामडी, वैद्यकीय तपासणी व औषध वाटपाची जबाबदारी विशाल इचपांडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. एकच मिशन शेतकरी आरक्षण २०१७ पासून देशव्यापी काम करित आहे. देशातील शेतकऱ्यांना शास्वत शेती विकासाची हमी मिळवून देण्यासाठी एकच मिशन शेतकरी आरक्षणने मातीला (शेती आरक्षण) आरक्षणाचा प्रस्ताव यापूर्वीच केंद्र सरकारला सादर केला आहे. शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने या प्रस्तावाच्या भूमिकेबाबतही देशभरातील शेतकऱ्यांना शैलेश अग्रवाल मार्गदर्शन करीत आहे.

देशभरातून आलेल्या या शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील शेतकरी व जनता उभी आहे. दुरचे अंतर व कोरोनाची अडचण यामुळे प्रवास शक्य नसल्याने अनेक शेतकरी आंदोलन स्थळी पोहचू शकले नसले तरी या सेवा कार्यातून त्यांचाही पाठींबा आंदोलनाला आहे. हा संदेश देशात पोहचविण्याचे काम हाेत आहे. याचे आपल्याला समाधान आहे.

- शैलेश अग्रवाल

नेते एकच मिशन शेतकरी आरक्षण

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप